Sunday, September 18, 2011

काजव्यांच्या प्रकाशात - १

खिडकीतून बाहेर दूरवर काळा आसमंत पसरला होता. खिडकीच्या कोनाड्यातल्या फटीतून थंड वारा सुर्र्रकन आत येवून चादारीमध्ये घुसत होता. रडून रडून लाल झालेले तिचे डोळे सुजल्यामुळे अजूनच दुखी वाटत होते. माझ्या सोबतच असं का, असं प्रश्न ती विचारू शकत नव्हती त्या देवाला, कारण आज पर्यंत देवाने जे दिले होते ते सर्वच भरभरून  दिले होते. तरीही तिची ओंजळ रिकामीच होती. त्या काळ्या आसमंताकडे पाहताना तिला अजून कसस झाल. चार चांदण्या कुठेतरी टीमकत होत्या, त्यासुद्धा विखुरलेल्याच होत्या.  ज्याला आपण दैवाच्या हाताचे खेळणे आहोत आणि जसे आपल्यासोबत होते तसेच किंबहुना अजूनच जास्त वाईट होत असेल याची जाणीव असते, अश्यांना आपल्यासोबतच असे का हा प्रश्न विचारून दुख करण्याची मुभाही नसते. तीसुद्धा हतबल झाल्यासारखी अशीच स्वताशीच विचार करत होती. 
'काय झालं? दुसऱ्यांच्या हातामध्ये आपल्या आयुष्याचे निर्णय जेव्हा आपण देतो, तेव्हा असच होणार ना. दुसऱ्यांना कसं कळणार कि आपला आनंद कशामध्ये आहे आणि जरी कळलं तरीही त्यांना त्या आनंदाची किमत कशी असणार. त्यांच्या लेखी कदाचित आनंदाची परिभाषाच वेगळी असेल. आजवर जे जे ठरवलं ते ते असच वाहवत गेल. खूप काही करायचं
राहून गेलं. लहानपणीच उलट मी दुसऱ्यासाठी जगत गेले. नाही वळवता आली लोकांची मन आपल्याला जे हव ते करून घेण्यासाठी. किवा कदाचित स्वताला इतरान्सारख जिद्दी म्हणून घेतलेलं आवडलं नसत म्हणूनही कशाचा अट्टहास केला नसावा. पण त्या होड्या पाण्यात सोडायचं राहून गेल्या ते गेल्याच. आता ते पावसाच पाणी इवल्या हातांसाठी थोडी ना थांबणार होत. आणि खर तर आता ते हातही इवले कुठे आहेत. हल्ली म्हणूनच कि काय प्रेम बीम असल्या गोष्टींवर विश्वास बसवत नाहीये. आयुष्य म्हणजे  फक्त आणि फक्त संघर्ष असतो. एका समूहाचा दुसऱ्या समूहाची, एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी, एका पेशीचा दुसऱ्या पेशीशी. बाकी सर्व झुठ. नश्वर आहे हे आयुष्य. इथे प्रत्येक क्षण हा दुसऱ्या क्षणाला मारून उभा राहतो. कत्तल केल्याशिवाय इथे कोणाचा जन्मच होत नाही. आणि हे सर्व कळत असतानाही या आयुष्यातल्या पराभवाची तीव्रता कमी होत नाही. कारण परिस्थितीसोबत आपण पटकन सावरू शकत नाहीत.'
थोडा वेळ तिचे डोकेसुद्धा विचार करून सुन्न झाले, तिचे डोळे लागतच होते तेवढ्यात कशामुळे तरी तिला जाग आली. खर तर तिला झोपायाचेच नव्हते, ती कसोशीने प्रयत्न करून स्वताला जागे ठेवण्याचा आणि गुंता सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. परत मागे सोडलेल्या विचारांच्या पाठी लागून तिला त्यातून काहीतरी मार्ग काढायचा होता. असा मार्ग जो तिच्यासाठी आनंद घेवून येणारा असेल. खर तर तिलाही हे खूप चांगल माहिती होत कि कितीही प्रयत्न केला तरी ती स्वताच्या आनंदासाठी दुसऱ्याला दुख देवू शकणार नाही, आणि जो आनंदाचा मार्ग ती शोधात आहे ते फक्त एक मृगजळ आहे. मृगजळ नेहमी दुरूनच आनंद देणार असतं. तिला क्षणभर वाटल कि देव बोलत असता तर त्याने काय बरोबर आणि काय चूक हे तरी सांगितलं असतं ना. पण परत तिच्या समजूतदार मनाने तिला समजावलं - कि चूक बरोबर हे आपल्या मनाला खूप चांगल माहिती असतं, आपण फक्त त्यावर पडदा पडून बसलेलो असतो. कारण एकतर जे बरोबर आहे ते आपल्या आवाक्यातला नसतं, म्हणजे जे बरोबर आहे ते करण्याची आपल्यामध्ये हिम्मत नसते किवा जे बरोबर आहे ते आपल्याला दुख देणार असतं. म्हणून आपण त्यावरचा पडदा उचलायचा धीरच करत नाहीत. तिची खरी अडचण हीच होती कि तिला सर्व परिस्थितीची जाणीव होती, तिचा त्रागा हा निरर्थक आहे याची तिला जाणीव होती. आणि त्याने कोणाला काही फरक पडणार नाही हेसुद्धा तिला खूप चांगले माहिती होते. आणि त्रास जर कोणाला होणार असेल तर तो फक्त तिला स्वताला - कारण ती आधीपासूनच स्वताची स्वप्न मारून जगात होती. तो धुमसणारा ज्वाला कधी ना कधी उसळणार हे तिला खूप चांगले माहिती होते. आणि ज्वालामुखी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा स्वतासोबत तो आजूबाजूचे जगही उध्वस्त करतो.तिला स्वतचे उध्वस्त होणे मान्य होते पण आजूबाजूंच्या लोकांचे त्यात होरपळणे मान्य होत नव्हते. पण नैसर्गिक आपत्तीवर आपलाही काही काबू नसतो. ती तरी काय करणार होती.
आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्यासाठी आधी राख तर तिला व्हावेच लागणार होते. आणि हि तिच्या पुढच्या विजयाची खरी वाटचाल सुरु झाली होती. आज तिची रात्र काळी होती पण उद्या तोच आसमंत ती तिच्या प्रकाशाने उजळवून टाकणार होती. कदाचित त्या लखलखत्या प्रकाशाचा सामना करायला जास्त हिम्मत लागणार होती तिला.


No comments:

Post a Comment