Saturday, December 15, 2012

दारू देसी - २


ती आणि तिचे कुटुंब फिरायला गेले होते. तिचे अहो आणि तिची मुले आनंदात खेळत होती. 

मुल आता मोठी झाली होती. एकीच लग्न झाल होत आणि मुलगा नोकरी करत होता. 

मुलगा आणि वडील याचं बोलन सुरु होत. 
त्यांच्या भागामध्ये एक दारूचे दुकान उघडले होते त्यावरून. 
ती दुपारची विश्रांती घेत होती. वर्तमान पत्र वाचत होती. तिने डोळे झाकले, आणि पुनः तिचा स्वप्नातला प्रवास सुरु झाला.

तीच आयुष्य ती अशीच तर स्वप्नामध्ये जगात आलीये. प्रत्तेक वेळी आपल्या मनासारख घडत असेल स्वप्नामध्ये तर का नको न असा जगायला. आणि तीच मनही हलक होवून जाई . आणि मग तिला Theory of Quantum  आठवू लागली. जशा पदार्थाच्या निरनिराळ्या अवस्था असतात, जसे कि पाणी हे स्थायू, द्रव आणि वायू अशा तीन अवस्थामध्ये असते. जशी Transition Phase  असते तशीच आयुष्याच्या पण अवस्था असतात. एका अवस्थेमध्ये जर ती housewife  असेल तर दुसऱ्या कोणत्यातरी अवस्थेमध्ये कदाचित ती तिच्या मनाजोगी एखादी Corporate Woman असू शकेल. म्हणूनच तिला या स्वप्नाच्या जगामध्ये जायला खूपच आवडे.

मुलगा येवून तिला उठवू लागला पण तिची तंद्री लागली होती स्वप्नाच्या जगात. 
मुलगा जावून वडिलांना म्हणाला - "बाकी काही असो पप्पा. आपली आई मात्र खूपच लवकर नशेमध्ये जाते आणि दुसर्या दुनियेमध्ये रमते." 
वडील "अरे पण तिला दारूची गरज नाहीये. ती अशीच स्वताच्या इच्छा शक्तीवर नशेत जाते. तिची दारू एकदम देसी आहे. दारू देसी."

* * *           

                                

Saturday, September 29, 2012

विसर्जन - २


नारू एकदम दचकलाच. हडबडून तो उठून उभाच राहिला, त्याचा त्याच्या डोळ्यांवर क्षणभर विश्वासच बसेना. ती कसली तरी अवाढव्य व्यक्ती कि प्राणी कि अजून काही, जसं जमिनीवरून चालावं तसच अगदी उंच उंच ढांगा टाकत येत होत. हवेचा जोर वाढल्यामुळे ती अजब वस्तू नीटशी दिसतही नव्हती. नारू मात्र डोळे फाडून फाडून बघत होता. त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्याने स्वताच्या तोंडाचा वासही घेवून पहिला, कि आपल्याला चढली तर नाही ना, पण त्याने तर आज दारूचा एक घोटही घेतला नव्हता. त्याने वळून बाकीच्या मंडळीकडे एक कटाक्ष टाकला, ते पिऊन तर्रर झालेले आपल्याच गोंधळामध्ये मश्गुल होते. नारुला आता दरदरून घाम फुटला होता, त्याची हिम्मतच होत नव्हती परत समुद्राकडे पहायची, ती अगडबंब आकृती अजूनही तशीच ढंग टाकत पुढे पुढे येत होती. दीड माणूसभर उंचीची ती आकृती हेलकावत किनाऱ्याच्या दिशेने सरकत होती. 
बगल्या, शोमन आणि जीरम्या सर्व जन त्या आकृतीकडे बघून मोठे मोठे आवाज काढून नाचत होती. वाऱ्याचा वेग अजून वाढला, किनाऱ्यावरच्या लाईट अचानक चालू बंद होवून झपाककन बंद झाल्या. किनाऱ्यावर फक्त अंधार अंधार पसरला. नाही म्हणता, रोडवरच्या गाड्यांच्या लाईटचा प्रकाश पडत होता. पौर्णिमेच्या आधीचे दोन दिवस, चंद्र बराच मोठा होता आणि त्याचा प्रकाश पण लक्ख पडला होता. पण अचानक कुठूनसे ढग आले अन चंद्रालाही झाकोळून टाकल.
नारूची बोबडीच वळली होती. त्याने डोळे गच्च मिटून घेतले आणि बगल्या, जीराम्या, शोमनच्या दिशेने अंदाजेच पाऊल टाकू लागला. तेवढयात ढगांचा कडकडाट झाला, जोरदार पाऊस सुरु झाला. इतक्या दिवसांचा जमिनीचा ताप शमवण्यासाठी हा पाऊस होता. मुंबई पावसामध्ये न्हावून निघत होती. नारुने डोळे उघडले, जोरदार पावसामध्ये आता हातभर अंतरावरच पण दिसत नव्हत. लाटा १० फुट उंचीवर उसळत होत्या. इतका वेळ पाण्यावर चालत येणारी ती आकृती आता हळू हळू स्पष्ट होऊ लागली. पण ती आता चालत नसून ती तरंगत होती. नारुला जीवात जीव आल्यासारख झाल. बगल्या आणि बाकीची मंडळी इतक्या वेळात त्या किनाऱ्यावर आडवी झाली होती. ती आकृती एक मूर्ती होती. ६-७ फुट उंचीची ती मूर्ती गणपती सारखी दिसत होती. पाण्यामध्ये असल्यामुळे थोडा रंग गेल्यासारखं झालेला. पण त्याची सोंड पूर्णपणे तुटलेली होती. खूप उशीर झाला होता, तांबड फुटायची वेळ जवळ आली होती. नारू ला थोडा वेळापूर्वी आपण काय काय विचार करून किती घाबरलो याच हसू येवू लागल. एव्हाना ती मूर्ती किनाऱ्याला लागली होती. त्या मूर्तीच्या जवळ जावून पाहू लागला. अगडबंब पोट, खुडलेले कान, तुटलेली सोंड, आणि दोन सुळे दात. नारुने हळूच त्या मुतीला स्पर्श केला आणि झर्रकन हात मागे घेतला, ती मूर्ती बर्फासारखी थंडगार होती. नारुला एकदम शीर शिरी भरून आली. 
तो रात्रीच्या त्या प्रसंगामुळे थकून गेला होता, बगल्या च्या शेजारी जावून तोसुद्धा आडवा झाला. 

दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी सर्व मंडळी उठली आणि गप्पा करत बसली होती. नारू अजूनही झोपेतच होता. ती मूर्ती अजूनही तिथेच किनाऱ्याला पडली होती. किनारा पूर्णपणे सुकून गेला होता, रात्रीच्या पावसाचा कुठे मागमूसही नव्हता.

नारू, बगल्या, जीरम्या आणि शोमन नी मिळून ती मूर्ती जीरम्याच्या झोपडीमध्ये आणली. मूर्तीला साफ-सुफ केली. जेव्हा त्यांनी मूर्तीला पूर्ण साफ केल्यानंतर तीच निरीक्षण केल तेव्हा जीरम्याला असं वाटल कि त्या मूर्तीची सोंड तुटली नाहीये तर ती कधी बनवलीच नसावी. तसेच त्या मूर्तीचे कानही खुडल्यासारखे वाटत नसून ते मुळातच आखूड असावेत. जीरम्याच्या इतक्या वर्षांच्या नजरेत मोडक्या गणपतीच्या-देवीच्या मूर्ती बसल्यामुळे त्याला हे फरक पटकन जाणवले. पण तरीही त्याने जास्त विचार न करता त्या मूर्तीची डागडुजी सुरु केली. 

पहिल्याच दिवशी नारू ने त्या मूर्तीला तासायला सुरुवात केली. पूर्ण मूर्ती तासून त्यावरचा एक ठार उतरवला आणि मग ब्रश ने मूर्ती साफ करून घेतली. मूर्तीच्या हाताचे काम करताना नारुला खरी माणकाची अंगठी सापडली. त्याने लगेच स्वताच्या बोटात अडकवली. बागुल आणि जीरम्या शाडूच्या मातीचे वेगवेगळे नमुने तपासून त्या मूर्तीशी सुसंगत शाडू शोधण्यासाठी बाजारामध्ये गेले होते. शोमन आपल्या बापाच्या - मेहमूदच्या - दारूच्या गुत्त्यावर बसला होता. 

नारुने पूर्णपणे मूर्ती छान तासून ठेवली आणि तो त्याच्या मामाकडे जायला रवाना झाला. शेजारी त्याने निरोप ठेवले, कि तो मामाकडे जावून येतोय रात्री म्हणून.  
      

Friday, September 14, 2012

विसर्जन - १


सगळीकडे गणेश मूर्ती बनवायची तयारी सुरु झाली होती. ग्लोबल वॉर्मिंग मुळे 'ग्रीन गणेशा प्रोजेक्ट' सगळीकडे जोम धरत होते. पेपरच्या रद्दीपासून, घरातल्या अडगळीतल्या  सामानापासून गणेशा बनवायची जणू काही स्पर्धाच सुरु होती. खेतावाडीच्या गणपतीची यावर्षीपण जोरात उंचच्या उंच मूर्ती साकारत होती.
          खेतावाडी चाळ क्र. ९- नारू, बगल्या, जीरम्या आणि शोमन या चाळीतल्या पोरांची दादा मंडळी. चाळीतून त्यांची सरळ वाट चौपाटी ला जावून मिळते. रोज रात्री शोमन त्याच्या बापाला चढली कि त्याच्या दारूच्या २-३ बाटल्या पळवून आणत असे आणि मग त्यांची मैफिल त्या चौपाटीच्या उत्तरेला असलेल्या खोपच्यामध्ये रंगत असे. पैकी फक्त शोमनलाच घरदार होते, त्याच्या बापाच्या मेह्मुद्च्या दारूचा गुत्ता जोरदार गल्ला करत आणि शोमंसुद्धा रोज दुपारी गल्ल्यावर बसून आपली कमाई बाजूला ठेवत. शोमन - पांढरे शुभ्र वेगवेगळे शर्ट घालणार, खाली नेहमी निळी जीन्स. गोरापान रंग, कपाळावर सकाळ पासूनच कुंकवाचा नाम लावून फिरणार, आठवड्याला सिद्धिविनायक चे दर्शन. उंच आणि धडधाकट. त्याच्या नावाखेरीज त्याच्यात मुस्लीम जाणवण्यासारखे काहीच नव्हते. बगल्या मुळचा यु.पी.चा, सातव्या वर्षी पळून मुंबईला हिरो व्हायला आलेला. त्याचा आदर्श अमिताभ  बच्चन. पिक्चरचे सगळे डायलॉग पाठ. उंच पण हडकुळा, चेहरा तुकतुकीत. थोडा चांगला राहिला असता तर त्याला कोरस मध्ये तरी डान्स करायला घेतले असते, पण जितका शोमन नीट राहायचा तितकाच बगल्या गचाळ. अंघोळ पण चार दिवसाला करायचा. जीरम्या त्याच्या झोपडीतल्या घरात एकटाच राहायचा. आई होती, ती त्याला न कळत्या वयातच सोडून देवाघरी गेली होती. त्याच्या शेजारच्या रामाकाकुनीच त्याला लहानपणी सांभाळले होते. आता रमाकाकू पुण्याला राहायला गेल्या होत्या. कधी मधी त्यांचा फोन यायचा, बस तेवढंच.  बगल्या ची आणि जीरम्याची भेट स्टेशन ला झाली होती, तेव्हा पासून त्यांची जिगरी यारी होती. बगल्या जीरम्याला 'विरू' आणि स्वताला 'जय' म्हणायचं. दारू चढल्यावर तर बगल्याच्या डायलॉग ला उत यायचा. सर्वजणच चौथी पाचवी नंतर शाळा सोडलेले, फक्त नारू ने नववी गाठलेली. नारूला काही ठाव ठिकाणा नव्हता. भरपूर वेळा तर तो त्याच्या मामाकडे माहीम ला असायचा. गेला तरी रात्री झोपायला जायचा आणि सकाळी सकाळी शोमन सोबत चौपाटी वर लोळत पडलेला असायचा. कधी राहिला तर जीरम्याच्या झोपडीत मुक्काम असायचा. नाहीतर मग रात्र चौपाटीवर काढायचा. दुपारी शोमन सोबत गल्ल्यावर बसायचा. तो कसली कसली पुस्तक घेवून बसायचा. बाकी त्याला काशाच वेड नव्हत पण पुस्तकच भारी वेड. पुरण कथा, इतिहास, काठ-कादंबऱ्या भरपूर वाचायचा. तो काम काही करायचा नाही पण पाकीट मात्र खूप सफाई ने मारायचा. त्यातच त्याचा गुजरा होत असे. बगल्या आणि जीरम्या तर स्टेशनवर मिळेल ते काम करायचे. 
         गणपतीचे दिवस सुरु झाले कि मात्र सर्वांची चंगळ असायची. गणपतीपासून ते नवरात्री पर्यंत ए चौघे इतर बरेच धंदे करून बराच माल कमवून दिवाळी साजरी करायचे. त्यात जीरम्या गणपतीच्या मुर्त्या छान बनवायचा. त्याच्या त्या झोपडीमध्ये आदल्या वर्षीच्या विसर्जित केलेल्या मुर्त्यांचा खच पडलेला असायचा. त्यांनाच डागडुजी करून तो विकायचा. त्याला मदत नारू आणि बगल्या करायचे. गिऱ्हाईक मिळवून द्यायचं काम शोमनच असायचं. सर्व कार्टी १५-१६ वर्षे वयाच्या आसपासची होती. 

       जुलै महिना संपत आला होता तरीही पावसाचा पत्ता नव्हता. हे आता दर वर्षीच झालेलं, कधी पावूस आवाक्याच्या बाहेर जावून पडायचा तर कधी रुसून ढगांच्यावर कुठेतरी लांब लपून बसायचा. पावसाळ्याच्या सुरुवातीला थोडी जमीन ओली करून गेला पाऊस ते परत आलाच नाही. त्या दिवशी शोमन ने चार बाटल्यांची व्यवस्था केली होती. भटाच्या चंपीने त्याच्याकडे बघून smile केल होत त्याची पार्टी म्हणून. कधीतरीच असा चार बाटल्यांचा योग यायचा. नाहीतर २ किंवा ३ बस्स. नेहमीप्रमाणे नारू ने आपल्या हिस्स्याची दारू बगल्याला दिली. बगल्या आधीच खूप तर्रर होता त्यात अजून नारुने तेल ओतले. 

जीरम्या पण जोश मध्ये येवून बोलू लागला, "बागुल, ए बागुल. तू तो मेरा जिगरी यार  है  रे. ये ले मेरी बोतल भी पी ले. "
बगल्या फुल्ल मोठ्ठ्या आवाजात, "ओये, मै आज भी फेकी हुई दारू नही पिता... आय ... ले वो बोतल. और अपनी जेब मी रख, दम है तो मै खुदही निकाल लुंगा... है कोई मै का लाल..."
नारू शांतपणे तिथल्या लाईट च्या प्रकाशात कधीच कुठले तरी पुस्तक वाचण्यात मग्न झाला होता. शोमन बारीक डोळे करून समुद्राकडे पाहू लागला, "आरे दोस्त, ते काय तरंगत आहे?"
"तुला खूप चढलीये शोम्या " - बगल्या. 
"नाही, ते पांढर काहीतरी उंच पाण्या वर  तरंगत आहे. शोमन बरोबर बोलतोय." - जीरम्या.
"विरू, तुझे भी चढ गयी. कोई गल नही." - बगल्या असा बोलतो आणि समुद्राकडे तोड करून उभा राहतो. 
आणि एकदम बोलतो, "आरे हे काही तरंगत नाहीये. पाण्यावर चालत आहे कोणीतरी. हा हा हा.."
यांचा गोंधळ ऐकून नारू त्यांच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकतो आणि परत पुस्तकात डोक घालतो. 
"ए नारू, तू पण बघ... अरे पण तुला कस दिसणार. असले देखावे दिसायला तुम्हाला प्यावी लागते. " - शोमन. 
"ए नारू मोशाय. जरा इधर ये नजरा तो देख." - बागुल.
त्यांच्या या परत नारू च्या जयघोशामुळे नारू नाखुशीनेच त्यांच्याकडे पुन्हा एकदा बघतो आणि बागुल ने बोट केलेल्या दिशेकडे बघतो.
एकदम दचकतोच तो.     
 

Thursday, August 23, 2012

असेच काहीबाही, मनातले गोंधळ.


डोळे भिजून गेले होते ... पाण्याने उशी सुद्धा ओली ओली झाली होती. ती उठली आणि लिहायला बसली.. तेही काही सुचेना ...
खूप काही आठवत राहिले तिला, एकदम भार्काताल्यासारखे ती आठवणींमध्ये हरवून गेली - चांगल्या वाईट सर्वच.... 

रडताना तिला संदीप आणि सलील ची कविताही आठवत होती - 'गुलाबाची फुले दोन रोज रात्री डोळ्यांवर मुसु मुसु पाणी सांग भरतील काय...'
पण मधेच विचार करे कि काय फरक पडतोय आपण रडतोय याचा.. पण परत स्वताशीच म्हणे, निदान मनाला मोकळ तरी वाटत...

अगदी लहानपणीच आठवलं तिला - 
आई फ्रोक ची चेन बिघडली याचं दोषी तिलाच ठरवत होती. आणि ती बिचारी काहीही न बोलता गुपचूप डोळ्यांमधून टिपं गाळत उभी होती. 

बाहेर खेळायला गेली आणि धडपडून आली. गुढगा फुटला होता, आधी कुठे लागल हे बघायचं सोडून शब्दांचा मार मिळाला. मलम तर ती आधीच बाहेरूनच लावून आली होती- कसल्या तरी झुडुपाच्या पाल्याचा रस.
परत खेळायला गेली आणि परत पडून आली. मग तेव्हा तर तिने सांगितलेच नाही कि परत पडले आणि लागलं म्हणून. नशीब त्याच गुढग्यावर लागल्यामुळे दुसरीकडे कुठे जखम झाली नाही कि आईला समजलेही नाही. 
शाळेमध्ये कोणीच मैत्रीण नव्हत तिला. दुसरीमध्ये असताना तिच्या वर्गातल्या दोन जुळ्या बहिणींनी तिला बेंचवर बसण्यावरून बोचकारले होते. तिला खूप वाईट वाटले होते तेव्हा. 

कधीतरी पुढे पाचवीमध्ये तिला एक मैत्रीण भेटली. तिच्याशिवाय तिचं पान हलत नसे. तिचा अभ्यास सुधारला, तिने चित्र काढायला सुरुवात केली, कविता करायला सुरुवात केली. वर्गामध्ये ती लीडरशिप करू लागली आणि याचा सर्वात जास्त आनंद तिच्या मैत्रिणीला होई. आज तिला त्या मैत्रीणीचीही खूप तीव्र आठवण होऊ लागली होती. पण ती आता तिच्याशी बोलूही शकत नव्हती. कारण ती इतकी मऊ आणि मायाळू होती कि देवालाही तशी मैत्रीण जवळ ठेवायला आवडले. देवाने बोलावले आणि ती मैत्रीण निघून गेली. आज जे शब्द तिच्याजवळ होते ते फक्त आणि फक्त त्या मैत्रिणीची देण होते. म्हणून जेव्हा केव्हा ती लिहायला बसे तिला त्या प्रिय मैत्रिणीची आठवण झाल्याशिवाय राहवत नसे.

त्यानंतर तसं जवळच कोणीच बनू शकलं नाही. अगदी तिचा नवराही नाही, कि तिची आई सुद्धा तिच्या इतकी जवळ जावू शकली नव्हती. 
ती गेल्यापासून तिला खूपच एकट एकट वाटायचं. पण कोणाला सांगणार. देव पण असा असतो ना.

ती काहीतरी लिहायला सुरु करत होती आणि तिच्या डोळ्यातून टप टप धारा वाहू लागत. ती पुन्हा थांबे, विचारांच्या मागे पळत सुटे. गेल्या कित्तेक दिवसात ती हेच तर करत होती. 
अशा पळण्याने ती अक्षरशः खरोखरीच दमून जाई. तिला रात्री दिवसभर कुठल्यातरी खाणीमध्ये काम करून आल्यावर येतो तसा थकवा जाणावे. पण झोप मात्र येत नसे. पण याचा परिणाम म्हणजे घरातूनही तिने बाहेर पडायचे बंद केले होते.

तिला खरच कोणीतरी जवळच हव होत. पण कोणीच मिळत नव्हत किंवा कोणाचीच तिला झेलण्याची इच्छा होत नव्हती. तिला या रोज रोज विचारांच्या मागे धावण्याचा वैताग आला होता आणि खूप त्रास होत होता. कसलेतरी विचार करत बसायची आणि शेवटी रडून रडून थकून झोपून जायची. असलं जगण्यापेक्षा तिला मरून जावसं वाटायचं. 
पण परत एका मित्राची वाक्ये तिला आठवायची. कि आयुष्यामध्ये नेहमी आशावादी राहील पाहिजे - Optimist  असलं पाहिजे. आज तो तिच्याशी खूप तोडून वागतो हेही तिला लगेच त्यासोबत आठवायचे. आणि मग सगळ सगळ फोल फोल वाटायचं. सर्व खोट वाटायचं. आज तिने अशा बऱ्याच जणांना गमावलं होत. काही नियतीने हिरावून नेलं होत, काही नशिबाने तिच्यापासून दूर गेलं होत. पण देवालासुद्धा समजल नाही कि तिला खरच एका खूप समजूतदार मित्राची किंवा मैत्रिणीची गरज आहे. जो तिच्यावर मनापासून प्रेम करेल तिच्या सर्व गोष्टीमध्ये मनाने सोबत करेल. असा कोणीतरी मनकवडा, किंवा मनकवडी. 

तिने शेवटी कसबस लिहायला सुरु केलं -
'आज डोक्यामध्ये नेहमीसारखाच विचारांचा गोंधळ माजला आहे. नेहमीप्रमाणे मी विचारांच्या मागे धावत आहे आणि धावता धावता खूप थकली सुद्धा आहे. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच - "आपण कशासाठी जगत आहोत.आपल्याला नक्की काय करायचे आहे." हे असले प्रश्न आले कि परत विचारांची शृंखला सुरु होते. पण आता मला खरच या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. माणूस जन्म का घेतो? आई-वडील बाळाला जन्माला का घालतात? माणूस शिक्षण का घेतो? तो त्याची आयुष्याची काही ध्येये का ठरवतो? ती पूर्ण झाली तर तो आनंदित आणि नाही पूर्ण झाली तर दुखी का होतो? नोकरी का करतो? मैत्री का करतो? लग्न का करतो? आणि परत सर्व इथेच सोडून मारून का जातो?'
 'आई-वडिलांना खरच त्यांच्या प्रेमाचा अंश प्रत्यक्ष स्वरुपात या पृथ्वी वर आणून त्या प्रेमाला आणि प्रेमाच्या अंशाला वाढताना पाहायचे असते कि त्यांना खरतर त्यांचा वंश वाढवायचा असतो. कि खरतर हे काहीच खर नसून हा एक भावनिक खेळ मांडला आहे. जसा एक Reality Show , ज्यामध्ये आपण सर्व काम करतो पण ती खोटीच असतात शेवटी. आईच आणि बाळाच निस्वार्थ प्रेम असत तर मग आई का नाही आपल्या बाळाला सर्व काही निस्वार्थ पणे पाहायला शिकवत ? का तिचे विचार ती त्याच्यामध्ये रुजवते? माणूस हा प्रगत होत गेला तशी त्याची बुद्धी वाढली. म्हणजे तो विचार करू लागला, किंवा जास्त विचार करू लागला. 'विचार' म्हणजे त्याच मनसुद्धा हळू हळू निर्माण झाल आणि त्याचीही वाढ झाली, प्रगती झाली. प्रगती झाली म्हणजे वेग-वेगळ्या भावना अस्तित्वात आल्या. म्हणजे प्रेम-राग-द्वेष-उत्साह-दुखी या साऱ्या भावना सर्व नंतरच्या आहेत. मुळात एकच गोष्ट निरंतर राहिली - survival of fittest . म्हणजे हा मूळ विचार प्रक्टिकल आहे. आणि आज लोक सर्व प्रगती करून, सर्व भावभावना इतक्या वाढवून परत आपल्या मूळ विचाराकडेच जात आहेत. सोयीनुसार सर्वांशी वागायचं, सोयीनुसार प्रत्तेकाने एकमेकांशी संपर्क ठेवायचा, सोयीनुसार सर्वांच्या वागण्याचे अर्थ काढायचे आणि सोयीनुसार दुसऱ्यांच्या आयुष्याचे निर्णय घेवून मोकळे व्हायचे. आणि या सर्वामध्ये जर कोणी अप्रगत किंवा आदिवासी भागातले असतील तर त्यांना मात्र कोणाला एखाद वाईट वाक्य बोलल्याचासुद्धा त्रास होतो. अशा अप्रगत लोकांची प्रगती खुंटते आणि असे लोक मागे पडतात. खर तर असे लोक त्यांच्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा आजूबाजूच्या वस्तूंबद्दल जास्त जागरूक व्हायला हवेत. उदा. माझा जॉब कसा टिकेल, माझी कंपनी कशी पुढे जाईल, किंवा माझी इज्जत कशी वाढीस लागेल, मी अधिक पैसा कसा कमावेल. कारण हीच परिमाण आहेत सुखी जगण्याची, पुढे जाण्याची आणि प्रगती करण्याची. '

ती खरच चिडली होती तिच्या आजू-बाजूच्या सर्व लोकांवर - ज्यांनी ज्यांनी तिला मनाने खूप छळलं होत. ज्यांच्यासाठी तिने जीवाचं रान केल होत त्यांना आज तिची काडीची किंमत सोडाच पण त्यांच्या आयुष्यात ती होती याची आठवणसुद्धा राहिली नव्हती. असे बरेच मित्र मैत्रिणी होते. ती फिरून फिरून मित्र मैत्रिणींवर का यायची याच कारण म्हणजे ती तिच्या मित्र मैत्रिणीवरच तर जगत होती. होत तिला कोण जवळच त्यांच्याशिवाय. घरातलं आणि नातेवाइकामध्ये तर जवळच कोणीच नाही. मग राहिले मित्र-मैत्रिणीच. त्यात पण मैत्रिणीच जास्ती. कारण मित्र तर पुढे कोलेज मध्ये बनलेले. 

ती पुढे लिहायला सुरुवात करते - 
'पण सारे सगळे स्वार्थी आणि ढोंगी. ज्यांना मी माझ्या आयुष्यात इतकी महत्वाची स्थान दिली ती अशी माझ आयुष्य उजाड करून, मला एकटीला सोडून निघून गेली. जाताना त्यांना काहीच कस वाटल नाही याच मला आश्चर्य वाटतंय. का तेसुद्धा Survial of the fittest च्या तत्वामध्ये अडकले होते कोण जाणे. लोकांना माणस महत्वाची का वाटत नाहीत याच मला खूप आश्चर्य वाटत. अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे - लग्न. लोक लग्न का करतात हे सुद्धा एक मोठ कोडंच आहे. काही जन सर्व करतात म्हणून करतात, काहीना माहिती असत कि शरीराची गरज भागवायची असेल तर लग्नाशिवाय कुठला नैतिक मार्ग नाहीये,  कोणालातरी आपल्या आई वडिलांसाठी लग्न करायचं असतं, कोणाला उगाच हौस किंवा मज्जा म्हणून, कोणाला हुंड्यासाठी, कोणाला वंश पुढे चालवण्यासाठी, कोणी प्रेम करतो म्हणून, तर कोणी एक काम उरकून टाकायचं म्हणून लग्न करतात. पण अजून हे लग्नाचं कोड मला तरी उलगडलेलं नाहीये. लोक प्रेम करतात म्हणजे काय हेही मला ना उलगडलेलं अजून एक कोड आहे. किंवा आधी मला वाटायचं कि प्रेम म्हणजे एकमेकांची मनापासून वाटलेली काळजी. त्या काळजी पोटी आपण ज्यावर प्रेम करतो त्याला खुश ठेवण्याची धडपड. त्या खुशीसाठी काहीही करायची तयारी. आणि काहीही करताना त्याचा मोबदला मिळावा असे मनातही न येणे. प्रेम म्हणजे एका मैत्रिणीवरही असू शकते, भावावरही असते, आई वर असते, काकांवर असते, आजोबा-आजीवरही असू शकते, आयुष्याच्या जोडीदारावरही असते, आणि ते स्वतावारही असू शकते. पण जेव्हा मला यांपैकी बऱ्याच जणांनी माझी हि व्याख्या चुकीची ठरवली, यातली काही लोक मला प्रेम करायला जवळ लाभलीच नाहीत आणि काहींच्या जवळ मी जावू शकले नाही. तेव्हापासून मला फक्त शेवटच वाक्य पटत कि - प्रेम हे फक्त स्वतावरच असू शकत. आणि कोणावरच नाही. आई-वडीलसुद्धा आपल्या मुलांकडून अपेक्षा करतातच कि. आणि अपेक्षा भंग झाली कि त्यांना दुखही होते आणि ते दुख वेग-वेगळ्या मार्गाने व्यक्तही होते. आणि माझ्या आजूबाजूच्या या लोकांनीच मला माझी प्रेमाची व्याख्या बदलायला लावली. '

'हे असंच होत. आजकाल मी असेच विचार करत बसते. मधूनच काहीबाही आठवत रहात आणि बर्रोब्बर वेळेलाच मला आठवत. आणि मग असेच रागाचे ज्वालामुखी मनामध्ये आणि डोक्यामध्ये धुमसत राहतात. सर्व लोकांचा राग राग येत राहतो. आणि मग माझंही मन नकळतपणे ठरवू लागत, कि सर्वाना एकदा अद्दल घडली आणि घडवली पाहिजे. माझे दिवस सुरु झाले कि एकेकाची अश्शी जिरवेल ना मग कळेल या सर्वाना कि मी काय चीज आहे. आणि अगदीच नकळतपणे मीसुद्धा त्या नियमाला माझ आयुष्य जगण्याच परिमाण करू पाहते - Survival of the fittest .' 


P . S . - 'असंच विचारांच्या मागे धावून धावून मी थकून जाते. इतका वेळ निद्रादेवीची केलेली आराधना फळास येते. आणि हळू हळू झोप मला येण्यास सुरुवात होते. .........   

शब्द मनीचे

आज काल मी फिरत असते वाऱ्याच्या रस्त्यावर,
शोधात असते आठवणी पाला पाचोळ्यावर,
मन माझे कुठे तरी पळून गेले आहे,
आणि मी फक्त जागतिये काही उधार श्वासांवर...  

हट्टाने बाधलेले घरटे आणि मांडलेला संसार,
उधळलेल्या  सावल्या अन घुसमटलेला हुंकार,
काहूर जेव्हा उठते ठायी,
तेव्हा पटते, हाताचे सोडून आहे मी पळत्याच्या मागावर...
बस्स जागतिये काही उधार श्वासांवर...

आता काय विचार करते कळेनासे होते,
हसण्याच्या वेळी उगाच भरून येते..
गुलाबाचे सुगंध आता सरू लागले,
मागे उरले काटेच काटे...

दूर पाहते आकाशाच्या वर,
कुठून कानी पडतो का आशेचा स्वर,
जोवर आहे त्या विधात्याचा आधार,
तोवर माझ्या प्रयत्नाचा भार..
बाकी स्व-सोडून आता सर्व काही,
त्या जन्मदात्याच्या ऋणाची होऊ कशी मी उतराई.. 
     

Sunday, August 19, 2012

विश्लेषणात्मक


(आदरणीय राजीव उपद्ध्ये यांनी त्यांच्या ब्लोग वर जो लेख प्रसिद्ध केला त्यावरील संश्लेषण. ब्लॉगची लिंक दिली आहे खाली. आधी त्यांचा लेख वाचा म्हणजे खालील टिप्पणी समजण्यास मदत होईल. )

http://rajeev-upadhye.blogspot.in/2009/07/blog-post_30.html


सर, तुमचा अनुभव आणि कार्य खूप मोठे आहे. पण तरीही मला काही मुद्दे इथे नमूद करावेसे वाटतात. 
तुमचे लिखाण, माझ्या मताप्रमाणे मला, सार्वत्रिक वाटत नाही. मी तुम्हाला पुरुषप्रधान आहात असे कुठेही म्हणणार नाही. पण तुम्ही ज्याप्रमाणे "मुक्त स्त्री" ची जी व्याख्या केली आहे ती थोडीशी चुकीची वाटते. तुमचा आधार कदाचित Metropolitian Cities मधल्या स्त्रियांबद्दल असेल तर ठीकच आहे. भारत हा अजूनही खेड्यांचा देश आहे, इथे हजारो गावांमध्ये अजूनही लाईट पोचलेली नाहीये. त्यामुळे जेव्हा आपण 'स्त्री' किंवा 'पुरुष' यांच्याबद्दल सार्वत्रिकपणे बोलतो तेव्हा फक्त शहरातल्या लोकसंख्येचा  विचार करून बोलणे चुकीचे ठरेल. 'घटस्फोट' हा शब्द आज शहरी भागामध्ये रुळला जरी असला तरी मोठी शहरे सोडली, पुणे-मुंबई-चेन्नई-नागपूर-दिल्ली इ.इ., तर बाकी तर अजूनही ग्रामीण भागच आहे. आणि या भागामधील स्त्रियांचा विचार करणेही गरजेचे आहे असे मला वाटते. अजूनही स्त्री हि उपभोगाची एक 'वस्तू' म्हणून जेव्हा पुरुष तिच्याकडे पाहतो तेव्हा समाज हा २०० वर्षेच काय पण १००० वर्षे मागे असल्याचा पुरावा सापडतो.  

" आजची स्त्री मात्र पूर्ण वेगळी आहे. ती एक तर मुक्त आहे किंवा मुक्त होण्यासाठी धडपडत आहे, मग ती समाजाच्या कोणत्याही थरातील असो." 
तुमचे म्हणणे कदाचित एखाद्या दुसऱ्या देशाबाब्तीत जसे कि यु.के., अमेरिका,  १००% खरे होईल. पण भारत आणि भारतासारख्या, कांगो, आफ्रिकेतील बरेच मागास देश यांच्याबाबतीत आपले विधान चुकीचे ठरेल असे म्हणण्यास मला खेद वाटतो. आपल्या या वाक्याचे संदर्भ तुम्ही विस्तृत केले तर वस्तुस्थिती लक्षात येईल. आजची स्त्री पुरुषापासून, किंवा कोणत्याही जबाबदारीपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत नसून; तिला ज्याप्रमाणे 'चूल आणि मुल' या गोष्टीला जखडलेले आहे आणि स्त्रीने फक्त हेच करावे हि जी समाजाची मानसिकता आहे त्या मानासिक्तेपासून ती मुक्त होऊ पाहत आहे. जी मानसिकता स्त्रीला आखाड्पणे बोच्कारते आहे. आणि या समाज म्हणवणाऱ्या लोकांमध्ये जसे पुरुष आहेत तशा काही स्त्रिया खुद्द आहेत ज्या दुसऱ्या स्त्रीच्या मार्गात अडसर बनत आहेत. त्यामुळे मी कुठेच असे म्हणणार नाही कि 'पुरुष' सर्व गोष्टीला जबाबदार आहेत. जबाबदार आहे ती - मानसिकता, जी अजूनही १००% बदललेली नाहीये. तुम्ही म्हंटल्याप्रमाणे जेव्हा माणूस जंगलामध्ये राहत होता तेव्हा जंगली प्राण्यांपासून रक्षण करणे, शिकार करणे, शत्रूपासून रक्षण करणे हि कामे पुरुषाने स्वीकारली किंवा त्यांच्या जास्त शारीरिक क्षमतेमुळे त्यांना हि कामे निसर्गदत्त मिळाली आणि त्याच वेळी प्रजोत्पादन, मुलांचे संगोपन, घराची साफसफाई (त्यावेळी गुहेत माणूस राहायचा), आणि इतर कमी कष्टाची कामे स्त्रीने स्वीकारली किंवा तिला ती निसर्गदत मिळाली. पण आज पुरुष हा फक्त काही शारीर कष्टाचीच कामे करतो असे नाही, जिथे बुद्धीची आवश्यकता असते अशी बरीच कामे आहेत. आणि जस - जशी प्रगती होऊ लागली तशी स्त्रीला जेव्हा ती करायची इच्चा निर्माण झाली  तेव्हा या गोष्टी कुठेतरी नाकारल्या गेल्या त्या जंगलात राहण्याच्या मानासिक्तेवारच ना. माणूस खूप पुढे आला, पण स्त्रीबद्दलचे विचार आणि पुरुषाबद्दलचे विचार हे कदाचित आपल्या जनुकामध्ये खोलपर्यंत रुजले आहेत. आपण आज घरात राहतो, बंगल्यात राहतो, खेड्यांचा विचार केला तर वाड्यामध्ये किंवा झोपाद्यामध्ये राहतो. माणसाने शिक्षण पद्धती निर्माण केली त्याचे मूळ म्हणजे माणसाने स्वताला आणि समाजाला सुसंस्कृत, आरोग्यपूर्ण, भावी पिढीला जगण्यास सुसज्ज आणि स्वताला समृद्ध बनवावे यासाठी. आणि स्त्री सुद्धा माणूसच आहे, समाजाचा भाग आहे. जेव्हा तिला हे नाकारले जाते तेव्हा ती कुठेतरी या नाकारण्याच्या मानसिकतेपासून मुक्त होऊ पाहते, मुक्त होण्यास बंड करते. पण तिचे हे बंड फक्त एका पुरुषाशी नसून, समाजाशी आहे. 
आज शहरांमध्ये तुम्ही म्हंटल्याप्रमाणे परिस्थिती आहे. स्त्री हि तिला मिळालेल्या कायद्यांचा दुरुपयोग करत आहे, घटस्फोटासारखा निर्णय चुटकीसरशी घेते, तिच्या बिदागीसाठी ती कोर्टामध्ये केस फायली करते. जोब करणारी स्त्री असेल तर ती तिच्या स्त्रीत्वाच्या जोरावर आणि सहानुभूतीवर कदाचित यशाच्या पायऱ्या चढत असते, किती वेळा यामुळे खर्या खुर्या कष्टाळू पुरुषाच्या मार्गामध्ये अशीच एखादी स्त्री येत असेल, सुखवस्तू घरातून जेव्हा लग्न होवून स्त्री आपल्या सासरी जाते आणि जेव्हा तिच्या मनाप्रमाणे काही झाले नाही तर ती त्याला 'छळ झाला' असे म्हणून माहेरी निघून जाते. 
बऱ्याच सुना किंवा सासवा आपली जबाबदारी झटकून वागत असतात. आणि कदाचित एका सुनेच्या विचारसरणीला दुसरीच सासुच कारण असेल. पण हे सर्व जास्तीत जास्त शहरांमधली बाजू दर्शवते. ग्रामीण भागात आत्ता कुठे मुली दहावीपर्यंत शिक्षण घेवू लागल्या आहेत. त्या आत्ता कुठे खऱ्या स्वातंत्र्याला समजू लागल्या आहेत. त्यांच्याबद्दल हे विधान चुकीचे ठरते. 
केवळ शहर्यातल्या लोकसंखेच्या आधारावर आपण पूर्ण प्रदेशाचे सामिक्षीकरण करू शकत नाही. 
आणि काही गोष्टीला केवळ स्त्री जबाबदार आहे असे म्हणता येणार नाही, आज जी छोटी कुटुंबे असतात, व्यापारीकरण, मॉल संस्कृती, आई-वडिलांनी आपल्या मुलांना सहज उपलब्ध करून दिलेल्या गोष्टी यामुळे पुढे जावून अशा वातावरणात वाढलेली मुलगी सासरी जावून तशीच वागू शकते. याला केवळ तिचे स्त्रीत्व जबाबदार नसते. 
आणि राहिली गोष्ट विवाह बाह्य संबंधांची, तर तुमचे विधान मी पूर्णपणे नाही पण अर्धे चुकीचे आहे असे म्हणेल- माझ्या या म्हणण्याला माझ्याकडे आधार आहेत आणि हे विधान मी Generalisation पद्धतीने करत आहे.

बाकी तुम्ही खऱ्या सप्तपदीचे महत्व, त्याचा इतिहास, किंवा त्याचे धार्मिक महत्व आधी काय होते आणि आत्ता काय असायला हवे, किंवा जी सात वचन आहेत त्यामागचे विवेचन,  ते आज का करावे किंवा करू नये याची माहिती लेखामध्ये दिली असती तर लेख अजून उपयुक्त झाला असता. आणि ज्यावेळी तुम्ही पुरुषाची बाजू मांडलीत त्यावेळी स्त्रीसाठी याचे महत्व, समाजामध्ये या रिती-रिवाजांचे स्थान  हे सुद्धा मांडायला हवे होते. म्हणजे हा लेख बराच त्रयस्थ पद्धतीचा वाटला असता.

असो. सर तुम्ही खूप अनुभवी आहात, त्यामानाने मी खूपच लहान आहे. तुमच्या लेखात काय असायला हवे हे मी ठरवू शकत नाही. पण जेव्हा लेखक काही लिहितो तेव्हा त्या विषयाला अनुसरून वाचकाच्याही काही अपेक्षा असतात. कदाचित या अपेक्षेतूनच मी हा लेख लिहिला. पण शेवटी त्यावरून आपण आपले विचार बदलू शकत नाहीत आणि लेखनही. पण वाचकांच्या विचारांचे स्वागत नक्कीच करू शकतो. आणि आपल्या जेव्हा मनापासून पटेल तेव्हा आपण अंगिकारू शकतो.  आणि जर आपल्या लेखनाचा काही चुकीचा अर्थ कोणत्या वाचकाने घेतला असेल तर त्यातील मुल मुद्दा आपण वाचकाला समजावून सांगू शकतो. मी माझे विचार व्यक्त करताना कुठे चुकून तुमच्या भावनांना दुखावले असेल तर क्षमस्व. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे.  
धन्यवाद.     

(माझ्या या लेखात मी थोड स्त्री आणि पुरुष या दोन जातींविषयी लिहायचा प्रयत्न केला होता. ते अवश्य वाचावे.
'याला जीवन ऐसे नाव'.)

Friday, August 17, 2012

गडबड गोंधळ

कधी कधी सहज सुंदर
नयन मनोहर

उगाच हुरहूर
अखंड बडबड
मनात काहूर
क्षणात भण भण
हसू मण मण

पाण्यात तरंग
आकाशाचे रंग
उशीत डोके
डोळ्यात झोप
झोपेत स्वप्न
स्वप्नात जग

येणे झपझप 
जाणे झर झर 
हाताशी हात
स्पर्शात बात
उरात धडधड 
डोक्यात पडझड

उगीच लोळणे 
मधूनच हसणे 
शून्यात जाणे

गर्दीत शांत
एकट्यात वाद

पंख्यात वारा
पावसात गारा
उषेचा सूर्य
चंद्राचा पसारा
उजळू पाहे 
आसमंत सारा

अजून काही
मनात बाही
ओठात नाही
नजरेत पाही
ओळखून घेई

घडी हाती
नाही म्हणता
रुसनेच बहुदा
गुस्सा नाही
रागाचा तोरा

अजून पुढे
क्षितिजाच्या इथे
धरती जिथे
मिळे आकाशाशी
हितगुज चाले
कधी न कळले
नाहीच उमगले
जवळच गवसले

पाण्याचा झरा
फुलांचा सडा
रांगोळी वेलीची
सळसळ पानांची

असाच एकांत 
पकडण्या चिमटीत 
प्रयत्नले.

अजून पुढे,
पडली गाठ
तरी न आठव
आसवांची
जिकडे प्रकाश
तोच माझा प्रांत 
कहाणी गडबडलेली 
जन्माची भ्रांत ...


Friday, August 10, 2012

डायरीच पान


(सन १९०२, वय १४ वर्षे,  पान नं. ७६ )
शेजारच्या काकू सांगतात कि मी इथे ७ वर्षाची असताना लग्न करून आले, तेव्हा खूपच खोडकर आणि सारखी खेळायला पळणारी होते, पण आता मी खूपच शांत झालीये. मला नाही वाटत कि मी शांत झालीये. अजूनपण मी मंगळागौरीला, पंचमीला खूप खेळते. खूप मज्जा येते पंचमीला आई कडे जायला. आज मी शंकरपाळे बनवले, आत्याबाईना आवडले आणि मला मस्त वाटलं. उद्या करंजी शिकणारे मी त्यांच्याकडून. ह्यानापण खूप आवडते करंजी. मोठ्या वाहिनी आणि मी यावर्षी पंढरपूरला जाणारेत. खूप मज्जा येईल. हे आले तर अजूनच मज्जा येईल. काल ह्यांना मी जेवायला वाढले तेव्हा त्यांच्याकडे पाहता पाहता मी आमटी ताटामधेच वाढली. मामंजींनी एकदम रागानेच पाहिलं माझ्याकडे. पण मज्जा आली यांच्याकडे पाहताना. उद्या सकाळी आत्याबाई नी द्यायच्या आधी मीच यांना चहा नेवून देणारे. चला आता झोपते पटकन.

(सन १९४२, वय १९ वर्षे, पान नं. १४९ )
आई आणि अण्णा खूपच काळजीत आहेत, लग्नच जमत नाहीये म्हणून. आई तर म्हणते आता कोणी विधुर किंवा मोठ्या वयाचा असेल तरी चालेल, पोरीला उजवून टाकली पाहिजे. पण मला काही चिंता नाहीये. शेजारच्या टेंभी सारखा फुकटा नवरा करून घेण्यापेक्षा असाच राहील तरी चालेल. म्हणजे मला चालेल, आई  अण्णांना नाही चालणार.
पण मला तर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी लढनाराच नवरा हवा, आई अण्णांना कस सांगू हे. एकदम तगडा, सतत कुठल्या ना कुठल्या चळवळीत मग्न असणारा, मी त्याच्या साथीने भाग घेईन या लढाई मध्ये. मला तर कधी एकदा त्या मोर्च्यामध्ये जाते असं होतंय. त्या पलीकडच्या आळीतल्या बायका नाही का जात त्यांच्या घराच्या पुरुष मंडळींसोबत. आमचे अण्णा म्हणजे मुळचेच घाबरट आहेत. मी एकदा हिम्मत करून विचारलं तर तेव्हापासून आई ने लग्नाचा चंगच बांधलाय. आता नक्कीच आत्त्याच्या मुलाशी, ज्याची एक बायको आधीच स्वर्गवासी झालीये, त्याच्याशी लग्न लावून देतील. एवढ वय झालाय म्हणून मला बाहेरही पडायची भीती.  अरे बापरे, अण्णा आले वाटत. चला झोपते नाहीतर काय लिहिते ते येवून बघतील.

(सन १९६२, वय १२ वर्षे, पान नं. ४३)
आज शकुच्या हळदीचा कार्यक्रम होता. किती छान दिसत होती ती. मीसुद्धा हट्ट धरला आई जवळ कि मलापण लग्न करायचं. तर भाऊ हसायलाच लागले, मला म्हणाले, "सुमे, तुला रमाबाई सारख डॉक्टर व्हायचं. इतक्यात लग्न नाही. अजून उशीर आहे. " पण गाव सोडून इकडे आल्यानंतर फक्त शकूच ती काय माझी मैत्रीण होती. आता तीपण लग्न करून जाणार म्हणजे मी एकटीच पडणार. गावी कित्ती कित्ती मज्जा यायची. इथे या शहरात तसे काहीच नाही. 
आणि आई काय म्हणाली माहितीये, "सुमन तुला लग्न म्हणजे काय ते तरी कळत का? आणि तू लहान आहेस अजून." ती कधी शाळेत नाही गेली, मग माझ्या का मागे लागते शाळेत जा म्हणून. आणि तिला काय माहिती, मला माहितीये लग्न म्हणजे काय ते. गावी असताना भाऊ कसे आई साठी शेतातून येताना गुपचूप मोरपीस घेवून यायचे. मेहंदीच्या झाडाची पान घेवून यायचे, आईला मेहंदी खूप आवडते म्हणून. मग आई ती पान वाटून कुटून त्याची नागमोडी नक्षी तिच्या आणि आम्हा सर्वांच्या हातावर रंगवत असे पंचमीला. आई आणि भाऊ, दर वर्षी गावाच्या जत्रेत दोघंच मिळून जायचे. आम्हा पोरांना घरीच ठेवून. आणि आई सुद्धा आज्जीने कितीही रागवल तरी जायची. खंडोबाला जेव्हा भाऊ जायचे तेव्हा आई एकदा खूप आजारी होती तरीसुद्धा तेव्हा तिने फराळ बनवून दिला होता भाऊ सोबत. मग असं आई आणि भाऊ सारख राहाण, फिरणं, सोबत करणं, एकमेकांच्या आवडी निवडी जपण म्हणजेच लग्न ना. आता शकीला पण तिचा नवरा गुपचूप बाहेरून वडापाव आणून देईल. आणि तीच आणि माझ वय तर सारखंच आहे. तरी म्हणे कि मी लहान आहे. नाही मला लग्न करायचंच आहे.

(सन १९८२, वय २०, पान नं. ३११)
आज तो दिसला नाही कोलेज मध्ये. मन लगेच अस्वस्थ होत, तो नाही दिसला तर. कुठेतरी कादंबरीमध्ये हे असं झाल कि याला प्रेम म्हणतात, असं वाचलंय. पण छे, मला नाही वाटत. कदाचित मला सवय लागलीये त्याला रोज पहायची, दिसला नाहीतर शोधायची. एकदा तो दिसला कि कस शांत शांत वाटत. कधीतरी वाटत कि त्याने येवून बोलाव, मी त्याला माझ्या नोट्स द्याव्यात. सोबत अभ्यास करावा. त्याच्यासोबत केला तर किती अभ्यास होईल नाही माझा, उगाच लायब्ररी मध्ये त्याला शोधायचा वेळ तरी वाचेल. खरच यालाच प्रेम म्हणतात का? पण काय उपयोग ! जर हे प्रेम असेल तर त्यालापण माझ्याबद्दल असं काहीतरी वाटलं पाहिजे तर मज्जा आहे. नाहीतर एकाच बाजूने काही उपयोग नाही. अरे मी विसरलेच, कि मला कळणार कस कि त्याला पण मी आवडते का ते. मी त्याच्याशी असं काही जावून विचारू शकत नाही. आणि जरी काही त्याला वाटत असलं तरी आमचे पिताश्री, आजोबा, काका, आत्या, मातोश्री या सर्व मिळून मला आणि त्याला सुळावरच चढवतील. बरंय, हे असाच छान आहे. त्याला रोज रोज शोधण. यातपण मज्जा येते. 


(सन २००१, वय २४, पान नं. ६३४)
आता घरी लग्नाचे विषय सुरु झालेत. डिग्री झालीये, जॉब शोधत आहे. पण घरी अजून अनुजबद्दल बोलले नाही. एकदा त्याला जॉब मिळू देत मग बोलेन. असे दिवस उडून गेले ते कळलहि नाही. आत्ता परवा तर अनुजची आणि माझी भेट झाली होती. 
मला असं वाटायचं कि, हात हातात पकडून कधीच न सोडून जाणारा जीवन साथी हवा. अखंड सोबत करणारा. जो फक्त असं नाही म्हणणार, "हे बघ, हा रस्ता आहे यावरून तुला चालायचं आहे." पण तो अखंडपणे त्या रस्त्यावर माझ्यासोबत चालत राहील. मी कुठे अडखळले तर मला सावरून घेईल. त्याच्या आणि माझ्या वाटा एक आहेत असं कोणीतरी पाहिजे होत मला. हवेवर माझे केस उडताना माझा चेहरा झाकून टाकतील, मी पुन पुनः केसांच्या बटा कानाच्या मागे करेन आणि तरीही वारा हट्टाने परत केसांची उलथापालथ करेल. आणि असं वाऱ्याशी झगडताना त्याने माझ्याकडे एकटक पाहत राहावं. मी दिलेल्या पत्राचे दिवसातून चार वेळा पठण करणारा, मला रोज पाहिल्याशिवाय त्याचा दिवस सुरूच झाला नाही असं मानणारा.  मी जेव्हा त्याच्यासाठी कर्वा चौथ च व्रत पकडेन तेव्हा ऑफिस वरून धवत पळत माझ्यासाठी घरी लवकर येणारा. मी रुसले, आणि जेवले नाही तर तोही न जेवणारा. एकमेकांकडे तासनतास पाहण्यात किती मज्जा येते नाही.
त्या सर्व गोष्टी माझ्यासोबत उत्साहाने करणारा ज्या मला करायच्या होत्या पण मी आजपर्यंत केल्या नाहीत- कारण माझी आई म्हणायची कि जे करायचं ते नवऱ्याच्या घरी जावून करायचं, म्हणून मी इतकी वाट पाहिलेली त्या सर्व गोष्टी करण्याची.
माझ्यासोबत मस्ती घालणारा. आयुष्य एक जगायची गोष्ट समजणारा, ना कि रेटायची. 
जो त्याची प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करणारा. त्याच्या सुखाचा आणि दुखाचा खरोखर भागीदार मला म्हणणारा. 
असं कोणीतरी, कि ज्याच्यासोबत मलाही रहावस वाटावं. असं कोणीतरी हव होत कि ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा. त्याने प्राण जरी मागितला तरी मी तयार होईल, असा कोणीतरी. ज्याच्यासाठी मला माझ सर्वस्व विसरून त्याच्यात विलीन होण्यात दुख किंवा परोपकार वाटू नये, तर आनंद व्हावा असा. ज्याची स्वप्न पूर्ण करण्यात मला हातभार लावायचा होता, आणि त्याची स्वप्न पूर्ण होताना मला त्याला हसताना पाहायचं होत, असा कोणीतरी. 
रात्री १ वाजता मला बाहेर बाईक वर फिरायला घेवून जाणारा, थोडक्यात आयुष्य फुल्टू जगणारा. आयुष्यातले छोटे छोटे आनंद जगण्यासाठी सदैव तयार असणारा, ना कि विकेंड ला घरी घोरत पडणारा. मला त्याची जिवाभावाची मैत्रीण बनवणारा. असा कोणीतरी.

आणि तो अनुज भेटला. अगदी तसाच, किंवा याच्या दोन पावलं पुढेच. 
घरून लग्नाला विरोध होणार हे माहितीये मला. पण मी तयार आहे. सगळ्यांना पटवून दाखवेन कि अनुजच तो आहे ज्यासोबत मी लग्न केल पाहिजे. आई - पप्पांना पण पटेल हे आणि ते नाकी हसत हसत मला परवानगी देतील.

(सन २०१२, वय २७ वर्षे, पान नं. ३४)
आज परत ब्रेक अप झाल. last time प्रतोत सोबत, त्या आधी विजय. आणि आता राहुल सोबत पण. साले सर्वाना फक्त कीस पाहिजे असत. पण, यांच्यापैकी कोणी तरी त्या लायकीच तरी होत का. Now enough is enough . इथून पुढे मी डेटिंग करणारच नाही. आणि आरे लग्न करायचं आहे मला, ते काही फक्त शरीर सुखासाठी नाही. ते तर माझ्या boyfriend कडून पण मला मिळू शकलं असत. मला नवरा हवाय. जो आयुष्यभराचा वादा करेल. ज्याच्यासोबत मला माझ यश-अपयश सुखानं वाटायचं आहे. मी bold आहे, याचा अर्थ असा नव्हे कि माझ्यासोबत काहीही चालत. मी पण एक मुलगीच आहे. मलाही कुठेतरी जावून स्थिर वायचं आहे. I agree , कि मी काही perfect नाहीये. आणि मला Mr Perfect नकोय पण. पण जो माझ्यावर मनापासून प्रेम करेल, आणि मीसुद्धा ज्याच्यावर. खूप प्रेम करेल असा मुलगा हवाय. मिळेल का मला असा मुलगा ? 

विजय ने मला डिच केल ना तेव्हाच मी ठरवलं होत कि आता no boyfriends . पण मग मम्मा मागे लागली, आता लग्न कर म्हणून. मग तो प्रतोत. तो मॉम च्या मैत्रिणीचा मुलगा. तोही तसलाच. and Rahul was height of all this bloody shit . मला आता लग्नच करायचं नाही. 
खरच मम्माचा time किती चांगला होता, atleast विश्वास तरी ठेवण्यासारखी लोक होती तेव्हा. पण आता. no hopes at all ...

-----------------------------------

(सन २०१२, वय ७३ वर्षे, डायरी नं. ४ किंवा ५, पान नं. २१०)

खरच आयुष्याची उजळणी करताना आता जाणवतंय कि सुखाचे क्षण कोणते असतात ते. आपल्या जोडीदाराचा शोध हा कोणताही मोठा जॉब मिळवण्यापेक्षा आणि कॅरिअर पेक्षा किती महत्वाचा असतो ते समजतंय.
लग्नानंतर दोन वेग-वेगळे जीवन जगणारी लोक एकत्र येतात कशी, आणि एकमेकांचे होवून जातात कशी हे जेव्हा या अशा उतार वयात समजत नाही तेव्हा त्या लग्नांना यशस्वी लग्न म्हणता येईल. आणि आत्ताच प्रेम म्हणजे काय हे उमगेल. आत्ता लक्षात राहतात ते फक्त पहिल्या वहिल्या हातात हात घेतल्याचे स्पर्श. पहिल्यांदा ओठांनी ओठांशी केलेल्या सलगीचे स्पर्श कुठे स्मरणात पण राहत नाहीत. 
थोडक्यात शरीराची गरज एका वयापुरती असते. पण मनाच्या सोबतीची गरज हि निरंतर असते. त्या उपभोगाचा मागमूसही आता आपल्या गावी नसतो. आठवतो तो फक्त प्रेमाचा स्पर्श - कधी आठवतो तो नवीन लग्न झाल्यानंतर नवऱ्याचे आपले फोटो काढण्याचे वेड, तर कधी त्या मंडपातून आई वडिलांना सोडताना वाहत असलेल्या अश्रुना पुसलेला हात, कधी गर्दीमध्ये चुकामुक होऊ नये म्हणून एकमेकांचा घटत पकडलेला हात. बसमध्ये तिच्या खांद्यावर ठेवलेलं डोक आणि त्या निवांत झोपेचा क्षण. कधीतरी स्वताच्याशी नकळत जोडीदाराच्या आवडीच्या केलेल्या गोष्टी. ती समुद्र किनारी चंद्राला पाहत गप्पा मारत घालवलेली रात्र. 

खरच, आज मला यांच्या अशाच कितीतरी गोष्टी आठवत राहिल्या, ज्या कदाचित मी इथे या डायरीच्या पानावर शब्दामध्ये मांडू शकणार नाही. आणि खरच मी खूप आभारी असेल त्या देवाची, त्या विधात्याची ज्याने माझ्या आयुष्यामध्ये असे क्षण लिहून ठेवले. आणि माझ्या या जोडीदाराची ज्याने माझी अखंड सोबत केली, आणि अजून करत आहे. मी खूप सुखी आहे. 
आज खूपच छान वाटत होत. आणि जेव्हा त्यांनी नोकराकडून चहा मागवला, तेव्हा अगदीच क्वचित व्हीलचेअर वरून काम करणाऱ्या माझ्या शरीराने ठरवलं कि 'आज अपने यार के लिये एक अद्रक वाली चाय तो बनती है - उसके प्यार के लिये एक बडिया चाय उसके पसंद वाली.'     


Tuesday, August 7, 2012

चांदणं - ८


"मराठी पुस्तक प्रदर्शन आणि संमेलन - नवोदित लेखक आणि लेखिकेंसाठी. "
जान्हवी pamplet वरची जाहिरात मोठ्याने वाचून दाखवत असते.
"ए आपण जायचं का? शनिवारी आहे. पण आदी तुला सुट्टी घ्यायला जमेल का? कारण तू नवीन जॉईन झालास ना."
"खर तर नाही जमणार मला आता. ट्रेनिंग आहे ना त्यात अजून. सुट्टी घेण म्हणजे आपल्या पायावर दगड मारून घेण. आणि आई येणारे या शुक्रवारी. चार पाच दिवस असेल ती. मग नाहीच जमणार. काय वेळ काय आहे प्रदर्शनाची ?"
"जावूदेत ना तुला जमणार नाही तर कशाला हवीये वेळ. सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आहे. मी हाफ डे घेवून २.३० वाजता जाईन. तुला कोणता पुस्तक हव असेल तर सांग घेवून येते. " 
"अग नको, सध्या वेळच नाही वाचायला. तू ये जावून."
(जान्हवी स्वागत - 'जस काही जॉब यालाच लागलाय आणि जगामध्ये हा एकटाच जॉब करतो. आई येणारे तर साध घरी पण बोलावलं नाही. जावूदे. मीपण बघ तुला दाखवते कशी बिझी असते ते.')
.........

"हेलो जानु, अगं आज प्रदर्शन आहे ना? तू जातीयेस ना? "
"हो मी पोचालीये तिकडेच. का रे? "
"अग मला एक पुस्तक हवाय, तुला तिथे सापडलं तर पाहशील का?"
जान्हवी प्रदर्शनाच्या दाराकडे चालता चालता विचारते - "कोणत पुस्तक?"
"आम्ही दारात उभे आहोत तुमच्या स्वागतासाठी "
"हे कसले पुस्तक?"
"अगं कवितेच पुस्तक आहे. बघ सापडताय का ते."
आणि फोन वर बोलता बोलता ती एका माणसाला जोरात धडकते. सॉरी म्हणायला ती वर बघते तर - आदित्य साहेब.
ती एक क्षण आश्चर्याने तर दुसर्या क्षणी रागाने बघू लागते. 
"अच्चा हे आहे का तुझ पुस्तक."
प्रदर्शनामध्ये भूश्या, अडीच बी.कॉम. चा मित्र भेटतो. कॉलेजनंतर इतक्या दिवसानंतर आदीच्या आणि भूश्याच्या खूप गप्पा रंगतात. त्या पुरुशोत्तामच्या नाटकाची, त्या कवितेची आणि जान्हवीची ओळख या सर्व गप्पा होतात. जान्हविचीही ओळख होते भूषण सोबत. 
"मग आदि पुढचे प्लान आहेत काय तुम्हा दोघांचे ?"
आदी आणि जानु एकमेकांकडे पाहून नुसते हसतात. 

प्रदर्शनातून जानूच्या स्कुटी वरून दोघ घरी यायला निघतात. जानु गाडी चालवत असते, तिचे केस वाऱ्यावर भुरभुरत आदीच्या चेहऱ्यावर गुदगुली करत असतात. आणि असे क्षण आदिला जगातल्या सर्वांत सुखाच्या क्षणांसारखे वाटत. तो स्वताशीच मंद मंद हसत असतो. जानुची मात्र अखंड बडबड सुरु होती. आदीच मात्र त्याकडे अजिबात लक्ष नव्हत, त्याच्या कानावर तिचे शब्द पडत होते आणि चेहऱ्यावर वाऱ्याच्या तालावर ताल धरणारे केस,  मधूनच तिची ओढणी. तेवढ्यात ती विचारते, "तुझी मम्मी कधी पर्यंत आहे घरी?" आणि आदीच लक्ष नसल्यामुळे तो काहीच बोलत नाही. ती परत तोच प्रश्न विचारते पण त्याला लक्षातच येत नाही. तो असाच गाल्यातल्या गालात हसत असतो. ती गाडीच्या आरश्यामध्ये त्याला हसताना पाहते आणि जाम भडकते. त्याला गाडी चालवत असतानाच जोरात चिमटा काढून विचारते कि का हसतोस म्हणून. मग आदिला लक्षात येत कि ती काहीतरी विचारात होती. पण आता वेळ निघून गेलेली असते, कारण जानु काही शांत होणार नाही हे त्याला लक्षात येत. मग तो तिच्यासाठी काही ओळी गुणगुणतो -

तुझ्या चिडण्याचे प्रकार निराळे,
प्रेमाचीही तीच गम्मत,
केसांच्या बटामध्ये गुंतून जावे,
अन बोलण्यातले लक्ष थिजावे..
क्षणो-क्षणी का भिरभिरते मन माझ माझे - अर्थ काही उमगले नाही...   
ओढ कशी लागली तुझी मजला कळले नाही,
खंत आता हीच फक्त कि तू जवळ नाहीस,
उगाच काहूर का माजे सांजवेळी,
समोर तू असूनही कासावीस मन माझे - कारण मात्र समजले नाही..

त्याच शेवटच वाक्य संपत आणि ती खळखळून हसायला लागते. "बाकी काही म्हण हा तू आदी, तुझी हीच अदा आपल्याला जाम आवडते."
"ए , अदा हि मुलीना असते. मुलांना style असते. हे अदा बिदा असलं मला म्हणायचं नाही." 

चांदणं - ७



"हे बर आहे, आमच्या जोरावर तुम्ही पुस्तक पण छापायला लागलात, हं ??" स्टेज वर चढता चढताच गर्दीतून मागून कोणीतरी आदित्य ला हटकल  होत. तो मागे वळून त्या गोंगाटातून येणाऱ्या ओळखीच्या आवाजाच्या दिशेने पाहतो तर जान्हवी होती मागे. तेवढ्यात गर्दीतून धक्काबुक्की करत प्रेस वाले लोक आले, आदित्य स्टेजवर गेला. त्याच्या पहिल्या कवितेच्या पुस्तकाला पुरस्कार भेटला होता. पुरस्कार घेवून, आणि आभाराचे दोन शब्द बोलून तो लागलीच खाली आला. स्टेजच्या मागे जान्हवी त्याची वाट पाहत होती. तो येताच तिने तिच्या पर्स मधून एक गुलाबाचे फुल आणि एक ग्रीटिंग कार्ड काढले. "अभिनंदन आदी."
"काय हे जानु, तू पण ना. पण तू तर अजिबात येणार नव्हतीस ना. मग कशी आलीस? मी इतका वाईट आहे कि तू इतकी चिडलीस आणि इथे माझ्यासाठी येण्यास नकार पण दिलास. मग अशी कशी उगवलीस?"
"तू गप्प बैस आता. मी येणार नाही असं कस होईल. बर हे घे तुझ्यासाठी आणलंय." 
आदित्य फुल घेतो. "thanks ".
पुरस्कार सोहळा संपताच दोघे सोबतच निघतात.
"खर तर आज सेलिब्रेशन पाहिजे. चल आपण पाणीपुरी खावूयात. "
"ओ बाईसाहेब, तुमच्या दहाव्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला तरी पार्टी दिली नव्हती तुम्ही आणि आता माझ्या पहिल्याच पुस्तकाला पुरस्कार मिळाला आर लग्गेच त्या पुस्तकच क्रेडीट पण तुम्हालाच आणि वरून पार्टी पण तुम्हालाच. हे चांगल आहे."
"खरच .. मला खर वाटत नाहीये. त्यादिवशी आपण पावसात भेटलो नसतो आणि तुला त्या दिवशी एखादा जोब भेटला असता तर आपण असे भेटत राहिलो नसतो. ना मी माझी पुस्तक लिहायची हौस पुढे नेली नसती ना आज माझे इतके सारे पुस्तक प्रकाशित झाले असते." जान्हवी एकदम भूतकाळात मग्न होते...
तेवढ्यात आदित्य तिची तंद्री तोडत म्हणतो,"आणि ना आज माझ्या कवितेच्या नायिकेला घेवून मी इथे पाणीपुरी खाल्ली नसती."
"खरच जानु , तुला पाहिलं ना कि मला कविता सुचू लागते. हे अगदी पहिल्यापासूनच आहे पण मला खूप उशिरा कळलं कि माझ्या कवितेचा उगम तुझ्यामध्ये आहे ते. खरच माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर. "
"खूप म्हणजे किती?"
"खूप म्हणजे ... म्हणजे २५ किलो. २५००००० किलो.. "
दोघेही हसू लागतात.
"ए आपण आभाला खूप दिवसात भेटलो नाही बघ. या सुट्टीच्या दिवशी आपण पक्का भेटूयात हं."
"अगं आत्ताच नाही जमायचं, आता माझी परीक्षा पण आहे दोन आठवड्यावर. असं करूयात माझी परीक्षा झाली कि आपण सर्वांनाच भेटूयात. छान प्लान करू. अगस्तीपण येतोय दीड वर्षानंतर ओस्ट्रेलिया तून. आपण संजूला फोने करून बोलवून घेवू. श्रेयू तर आहेच इथे. ती येईल. आभाशी तू बोलून घे ."
"ओके ."
.......
"हेलो, काकू आभा आहे का? "
"अग ती बाहेर गेलीये. तू ?"
"काकू मी जान्हवी बोलतेय. आभाला सांगा या रविवारी सर्वांनी भेटायचा प्लान केलाय ते. आणि तिला फोन पण करायला सांगा."
"ठीक आहे. सांगेन तिला. ठेवते."

"हेलो .."
"बोला जान्हवी madam , मग फिक्स झाला का वेन्यु? कुठे जमायचं ?"
"अग हो हो... तू तर लगेच सुरु होतेस. श्रेयू मला सांग तुला रविवारी तर सुट्टी असतेच, पण यावेळी सोमवारी-मंगळवारी पण सुट्टी घे. ३ दिवस आपण धम्माल करणार आहोत. संजू बाबा आलाय कालच."
"काय्य्य .. संज्या आला? आणि मला सल्याने एकपण फोन नाही केला. चंपक. थांब मी त्याला फोन लावते."
"अग अग, चिडू नकोस. त्याच्या आई पप्पा सोबत तो मुलगी पाहायला जाणार होता आज. म्हणून त्याने तुला फोन केला नसेल ग. आणि त्याच आणि माझ पण बोलन नाही झालाय. ते तर मी त्याच्या फेसबुक वर स्टेटस पाहिलं. म्हणून सगतीये. आणि मुलगी पाहायचं मला आदित्य बोलला. कदाचित आदीच आणि त्याच बोलन झालाय. चिल. तो भेटणारे ना तेव्हा त्याची खेच हवी तेवढी."
"हो तुला बर इतका पुळका आलाय त्या संजूचा. पण वेट वेट ... संजय कर्वा आणि मुलगी पाहायला ?? अरेरे अडकला बिचारा. हा हा हा हा."
"तू हसू नकोस. हे मारवाडी लोकांमध्ये मुलगा-मुलगी भेद नाही करत. दोघांची लग्न लवकर करून टाकतात. हे हे. पण खरच संजू अडकला बिचारा. "
"ए जानु, बर तुझ आणि आभाच बोलन झाल का? ती येतीये ना ? "
"हो. म्हणजे आधी तिच्या मम्मी सोबत झाल होत बोलन पण नंतर तिने फोन केला होता. तीपण येतीये."
"आभा तर एकदम हिरोईन झाली आता. तीच काय बाबा.."
"श्रेयू , बस झाल बर का आता. किती खेचनारेस सर्वांची. बर चल मी ठेवते फोन नाहीतर तू काही थांबणार नाहीस. "

गुरुवारी सकाळी अगस्ती ओस्ट्रेलिया तून निघतो ते शुक्रवारी पोचतो. शनिवारी संध्याकाळी सर्व जन दिवे आगार ला जायला निघतात. सुमो मध्ये नुसता सर्वांचा धिंगाणा चाललेला असतो. आदी आणि अगस्ती दोघ सुरात सूर मिळवून संजूच्या मुलगी पहायच्या प्रोग्राम ची बातमी विस्तृत पाने सर्वांसमोर मांडत असतात. आणि बाकी सर्व त्याला चिडवण्यात कमी सोडत नसतात. ३ दिवस भरपूर मज्जा करून सर्व जन परत येतात.
अगस्तीच पी.एच.डी. च सबमिशन झालेलं असत. त्यामुळे त्याला आता रिझल्ट ची वाट पाहण्यात दिवस घालवायचे असतात. बाकी आभा आपल्या शुटींग मध्ये बिझी होवून जाते. जान्हवी पण तिच्या जॉब, प्रोजेक्ट आणि पुस्तक लेखनामध्ये. संजू दिल्ली ला निघून जातो. श्रेयू मात्र बर्यापैकी रिकामी असते. ऑफिस सुटल कि ती, अगस्ती, आणि आदित्य भटकत असतात. 

आदित्यचा पण रिझल्ट लागतो, तो यावेळी सी.ए. च्या सर्व परीक्षा पास होतो.  आणि त्याला मोठ्या कंपनीतून ऑफर येते. तो तिथे जॉईन होतो तसा श्रेयू आणि अगस्तीच भटकायला उरतात.




Wednesday, June 20, 2012

दारू देसी

सायकल वरून उतरून ती सायकल हातामध्ये पकडून गेटमधून आत आली. उडणारी ओढणी हळूच तिने सावरली. सायकल ला लॉक करून ती तिच्या कॉलेजच्या बिल्डींग च्या दिशेने चालू लागली. तो भला मोठा कॉलेजचा  पसारा पाहून तीच मन खूप खुश झाल. त्या बिल्डींग ची मोठी लाईन ती एक क्षण थांबून पाहू लागली. तिने तिचे डोळे झाकले.
कोलेजला जायच्या आदल्या दिवशी जी खूप सारी शोप्पिंग केली होती त्यातून एक फाडू टोप आणि स्कर्ट तिने  काढला. हातामध्ये मेटल, प्लास्टिक, फायबर च्या मिक्स केलेल्या रावडी बांगड्या, एकाच हातामध्ये. आणि दुसर्या हातामध्ये एक मोठ्ठ फ्रेन्डशिप band . तिच्या त्या बाईक वरून ऐटीत उतरून तिच्या कोलेजच्या बिल्डींग कडे ती जावू लागली. पहिल्याच दिवशी तिचा फक्कड ग्रुप जमला. खूप सारे गेम्स खेळले, प्रोग्राम ला डान्स केले. इवेन्ट्स लीड केले. चार वर्ष फुल धमाल करून भरपूर अभ्यासही तिने केला. कोलेजच्या शेवटच्या वर्षी तिला मस्तपैकी जॉबसुद्धा मिळाला. आणि तीच मन खूप खुश झाल. आणि तिने पटकन डोळे उघडले. ओढणी सावरत ती कोलेजच्या पायऱ्या चढू लागली.

कोलेज संपल, रिझल्ट लागला ; कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षी खूप तयारी करूनही तिला जॉब मिळाला नाही तसा तिचा कोलेज संपल्यावर जॉबसाठी शोध सुरु झाला. त्या दिवशी ती पहिल्या interview ला त्या काचेच्या आवरनातल्या बिल्डींगमध्ये गेली होती. काचेच्या लिफ्ट मधून सातव्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये जाताना तिला खालचे  लोक, साफसफाई करणाऱ्या बायका दिसू लागल्या. तिला खूप गम्मत वाटली. आता रोज आपल्याला या काचेच्या लिफ्ट मधून यायला भेटणार म्हणून ती खूप खुश झाली. interview झाला. ती ऑफिसच्या लॉबी मध्ये येवून रिझल्टची वाट पाहत बसली. तिथे बसल्या बसल्या तिला ऑफिसमध्ये येत-जात असलेले एम्प्लोयी दिसले. त्यांच्या गळ्यामध्ये ऑफिसचा आय डी कार्ड अडकवलेला होता. त्या ओफिसाच दार ती सर्व लोकं त्या गळ्यातल्या कार्ड नेच उघडत होती. आता तिला तिच्या रिझल्टच टेन्शनच येत होत. तेवढ्यात ओफिस्माढले सर आले आणि तिथे आलेल्या सर्वांचे रिझल्ट त्याने सांगितले. ती जड पावलाने तिथून निघाली. 
चार सहा महिने ती अशीच सगळीकडे interview साठी फिरत होती. त्या दिवशीसुद्धा ती अशीच एका छोट्याशा कंपनीमध्ये interview साठी गेली होती. टेस्ट झाली आणि त्या कंपनीच्या लॉबी मध्ये ती रिझल्ट ची वाट पाहत बसली होती. टेन्शन ने तीच मन खूप जड झाल्या सारख वाटत होत. तिथे समोरच कृष्णाची मूर्ती होती, त्या मूर्तीकडे पाहून डोळे झाकले.
ती त्या ब्लेझर मध्ये खूपच मस्त वाटत होती. भराभर पायऱ्या चढून तिने दुसरा मजला गाठला. जेवढी ती बाहेरून मस्त वाटत होती तेवढाच तिला आतूनपण खूप मस्त मस्त वाटत होत. ऑफिसमध्ये जायच्या आधी ती वॉशरूम मध्ये गेली, तिच्या पर्स मधून तिने परफ्युम काढाल आणि मस्त पैकी मारलं. थोडस पावडर लावून ती बाहेर आली. गळ्यातल्या आय डी कार्ड ने तिने ऑफिस च दार उघडल. ती आत गेली आणि सर्वाना गुड मोर्निंग म्हणत आपल्या क्युबिकल मध्ये जावून बसली. फायलींचा पसारा आणि भरपूर काम यात तिला वेळेच भानही राहील नाही. आज तिला जॉब मिळून एक महिना झाला होता आणि तिचा पगार होणार होता. ऑफिस वरून येताना ती जवळच्याच मॉल मध्ये गेली. पप्पांना वॉच, मम्मी ला साडी, बहिणीला ड्रेस, शेजारच्यांना वाटायला स्वीट्स, मित्र-मैत्रीणीना एक एक डेरी मिल्क अशी पहिल्या पगारातली शोप्पिंग करून घरी आली. घरी आईने पहिला पेढा देवापुढे ठेवून नमस्कार करायला सांगितला. तिने देवासमोर दिवा लावला, पेढा ठेवला आणि हा संपन्न दिवस दाखवला म्हणून देवाला आभार मानण्यासाठी डोळे झाकले. 
प्रार्थना करून तिने डोळे उघडले. तिला आता जरा हलक हलक वाटू लागल. घड्याळात तिने पाहिलं तर दीड तास वगैरे होवून गेला होता. अजून कोणीच रिझल्ट बद्दल काही सांगत नव्हत. पण टेन्शन ने जड झालेलं तीच मन आता बरच हलक झाल होत.     

तिला आज पाहायला येणार होते. ती तयार होत होती, तिची एक मैत्रीण तिला मेक-अप करून देत होती. आय लायनर लावून घ्यायला तिने डोळे झाकले.
बाहेर मुलगा, त्याचे आई वडील, भावू ,काका, काकू, आत्या सर्व जन आले होते. चहा पाणी झाल्यावर तिला बाहेर बोलावले. थोडे फार प्रश्न झाले, मुलाच्या आई ने तिला जवळ बसवून घेतले. अगदी अनौपचारिक पणे तिच्याशी बोलताना एकदम मुलाच्या आई म्हणाली, " ए तुला पिक्चर पाहायला आवडत का?" ती एकदम शॉक झाली. पण त्यानंतर तिची आणि त्या मुलाच्या आईची गट्टी जमली. तिने हळूच मुलाकडे पाहिले तर तोही तिच्याकडे पाहत होता. तिने गोड हसून प्रतिसाद दिला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी "killing smile " अस तिला सांगून गेले. तीच मन सुखावलं.
 जाता जाता त्या मुलाच्या आई ने तिचा फोन नंबर घेतला आणि म्हणाली, "लग्न जमल नाही तरी आपण दोघी पिक्चर पाहायला सोबत जावू बर का." आणि सर्व घर हास्य कल्लोळाने भरून गेल. तेवढ्यात तिची मैत्रीण म्हणाली, "डोळे उघड आता, झाल लावून आय लायनर." तिने डोळे उघडले. ती तयार झाली. तेवढ्यात तिच्या बहिणीने येवून सांगितलं कि पाहुणे आले.
तिला अनुरूप वर पाहून मम्मी-पप्पानी लग्न ठरवलं. तिचा लग्नाचा दिवस उजाडला. सगळीकडे गडबड होती, त्या गडबडीत ती बुजून गेली होती. तिच्या मैत्रिणींची तिला आठवण येत होती. हातावरची मेहंदी तिने एकटीनेच एन्जोय केली होती. तिच्या मैत्रीणीना जॉब मुळे येता आलं नव्हत, कोणाला सुट्टी मिळाली नव्हती. नाही म्हणायला दोघीजणी अक्षतेच्या वेळी आल्या होत्या. लग्न लागल. जेवताना नवरदेवाने भरवला तेवढाच घास तिच्या पोटात गेला होता. विदाई च्या वेळी ती जेव्हा आई ला भेटायला आली तेव्हा आई आत्त्याला आहेर करत होती. ती तशीच उभी राहिली तिथे. पण ती पारदर्शक असल्याप्रमाणे त्या रूम मधले सर्व वावरत होते. तिच्या बहिणी पण लांब बसून होत्या. तीला अजूनच दाटून आल. तिने तसाच सर्वांचा निरोप घेतला. गाडीतून तिच्या आयुष्याच्या साथीदाराबरोबर जाताना ती खूप रडत होती. आणि कशासाठी हेच तिला कळत नव्हत. नवीन घरात प्रवेश केल्यावर लक्ष्मी पूजन वगैरे आटोपून ती तिच्यासाठी असलेल्या खोलीमध्ये गेली तिच्या करवलीसोबत. गादीवर पडल्यावर तिने डोळे झाकले. दुसऱ्यादिवशी संध्याकाळी तिचा नवरा आणि ती दोघे फिरायला गेले. तेव्हाच मम्मी पप्पांचा फोन आला, त्यांना त्यांच्या लाडकीची आठवण येत होती. त्यांनी तिला २ मि. येवून भेटून जाण्याची विनंती केली पण तिच्या नवऱ्याने ते मान्य केले नाही. तिने उदासवाणे तिचे डोळे मिटून घेतले.
लग्नाचा दिवस उजाडला. तिच्या मैत्रिणी, तिची लाडली बहिण, आत्या मामा सर्व जन जमले होते. हळदीचा डाग तिच्या आवडत्या रूमलाला लागला म्हणून तिला वाईट वाटत होत. तिच्या नवऱ्याने तिच्याकडे आणि रुमालाकडे पाहून हळूच स्वताचा पांढरा शुभ्र रुमाल तिच्या हाती टिकवला.तिच्या मैत्रिणी जॉब मधून अगदी चार दिवस सुट्टी काढून आल्या होत्या, ती सगळ्यांसाठी खूप खास अशी होती ना. मेहंदीच्या दिवशी तिच्या मैत्रिणी तिला इतक्या चिडवत होत्या. ती लाजून चूर होत होती. सर्व जणींनी डान्स केला, तिनेही नंतर डान्स केला. तिची आई अगदी कौतुकाने लेकीकडे बघत होती. मेक अप साठी पार्लर मध्ये गेली होती तेव्हा तिच्या नवरोबाचा सारखा फोन येत होता. आणि तिच्या मैत्रीणीना अजून चेव चढत होता. 
नटून थटून नवरी पाटावर चढली. अंतरपाट पडला, तिने गोड हसून नवरोबाला हार घातला आणि आणि त्याने तिला. तिच्या जीवनाची गोड सुरुवात झाली होती. जेवताना तिच्या नवऱ्याने कौतुकाने पूर्ण ताट संपेपर्यंत खावू घातलं आणि तिनेही त्याला खावू घातलं. सर्व विधी आटोपले, निरोपाची वेळ जवळ आली. तिच्या आई ने तीच सुवासिनिच रूप डोळे भरून पाहून घेतलं. आनंदान पण अश्रू भरल्या डोळ्यांनी सर्वांनी तिचा निरोप घेतला. नवरोबासोबत सासरी जाताना ती जेव्हा रडत होती, तेव्हा तीच हात तो अखंडपणे आपल्या हातात घेवून थोपटत होता. जणू काही त्याला म्हण्याचाय कि सखे हे तुझे अखेरचे अश्रू असतील, इथून पुढे तुझ्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त हसू असेल, सदाफुलीच हसू.तिने तिच्या नवीन घरात वाजत गाजतच प्रवेश केला. लक्ष्मी पूजन होवून ती तिच्या करवलीसोबत खोलीत आराम करण्यासाठी गेली. तेवढ्यात तिचा नवरोबा तिची कृष्णाची मूर्ती घेवून हजर झाला. तिला त्या मूर्तीकडे पाहून खूप बर वाटल. ती त्या मूर्तीसमोर नतमस्तक झाली आणि डोळे उघडले तेव्हा ती गाडीत होती नवऱ्यासोबत. ती आणि तिचा नवरा फिरून घरी गेले.  
क्रमशः 

Sunday, June 10, 2012

कृष्ण उवाच



"ती पुनः भेटली मला. वर्षानु वर्षांपूर्वी ती मला मीरा म्हणून भेटली होती. आणि त्याही आधी युगांपूर्वी राधा म्हणून. आणि आता ती वेडी पुनः भेटली. राधे इतकी आतुर नक्कीच नाही, ना मीरेइतकी थोरही नाही ती. पण तीच गोड हसू मात्र तसंच आहे. यमुनेच्या प्रवाहासारख. एकदा आली होती द्वारकेला, आणि तीच वेड मलाही देवून गेली. तेव्हापासून तिच्याविना काही सुचेना. खरतर त्या आधीच कधीतरी तिने मला तिच्या आयुष्याच सारथ्य दिलेलं होत, तिच्या स्वताच्याही नकळत. "
"मी एक पती झालो, भ्राता झालो, सखा बनलो, मित्र बनलो, पुत्र बनलो, मार्गदर्शक बनलो, सारथी झालो, वडील झालो, माझ्या राज्याला सांभाळायचे होते मला - एक राजाही होतो ना मी. सर्वांकडून आयुष्यभर प्रेम गोळा केले. माझ्या चुकानाही प्रजेने 'लीला' म्हणून पदरात घेतले. जे काही आधीच होते, तेच मी सर्वाना वाटल्याबद्दल मला खूप उच्च स्थान दिले. पण यात मी माझे स्वताचे काही केले नाही. जे काही होते ते इथेच होते आधीपासून, मी फक्त मार्ग दाखवला. म्हणून मला 'देव' संबोधले. पण या सर्वांमध्ये नक्कीच थोर राधा होती. तिने तर तिच्या जवळचे सर्वस्व दिले आणि त्यापलीकडेही जावून देत राहिली. माझ्याजवळ करण्यासारखे भरपूर होते, मी संसारात पूर्ण गुरफटून गेलो पण राधेजवळ तर फक्त माझ्या आठवणी होत्या, मीसुद्धा नव्हतो. पण त्या देवीने कधीच खंत म्हणून कशाची बाळगली नाही. नंतर आली ती 'मीरा' ! ती आली अन सारा आसमंत तिच्या ओवीनी उजळून गेला. तिची थोरता तर मलाही भारावून गेली. कधीकधी वाटत कि मी स्वतः बनून राधेला जवळ केल असतं, मीरेला आपल्या गाठी बांधल असतं तर खूप बर वाटल असत मलाही. "

"पण म्हणूनच कि काय ती वेडी पुनः भेटली मला. तिच्या ठायी मोह आहे, इच्छा आहेत , आकांक्षा आहेत. पण मला बोलते कशी, 'कृष्णा तूच सांग बर. जर मला मोह नसता तर तुझा मोह कसा धरला असता. मी स्वार्थी नसते तर स्वताच्या स्वार्थासाठी मी तुझ्यावर प्रेम कसे केले असते.' असे प्रश्न तिने विचारला सुरुवात केली कि मग माझी उत्तरे संपतात. आणि मग ती गोड हसू लागते. मग सारी सृष्टी या नारीच्या त्या हास्यापुढे फिकी पडते. मग वाटते कि प्रत्तेक प्रियकराने आपल्या प्रेयसीला असंच हसू दिल, एखाद्या पतीने त्याच्या रुक्मीणीला असंच सुखी केल तर माझ राधेला एकट टाकल्याच दुख थोड कमी होईल."

"मी तिला माझी गीता ऐकवायला गेलो एकदा तिला 'कोणत्या गोष्टीचा मोह धरू नये, मोहाने आपण संसारात अडकत जातो. फळाची अपेक्षा ना करता कर्म करत रहावे. सृष्टीतल्या सर्व गोष्टी अशाश्वत स्वरुपात आहेत, सर्वकाही नश्वर आहे म्हणून कशाच्या मोहात पडू नये.' तर लगेच तिचे उत्तर हजर, ' देवा, जर का चराचरात तू सामावले आहेस, जर का कणा-कणा मध्ये तुझे अस्तित्व आहे ; तर का त्या कणा-कणाचा मोह धरू नये? आणि फळाची अपेक्षा धरो वा ना धरो कर्म तर करायचेच आहे, पण फळ म्हणून जर तुझी इच्छा धरली तर ? ' आणि मग पुन्हा ती मला अनुत्तरीत करते. तिच्या ठायी राग आहे लोभ आहेत, स्वार्थ आहे; पण तरीही ती माझी आहे, माझा अंश आहे. तिच्या मनामध्ये मी भरून उरलो आहे. त्यामुळे तिच्या मनात येणाऱ्या प्रत्तेक मोहाचा, स्वार्थाचा मी साक्षीदार आहे. ती जेव्हा स्वताशी बोलते तेव्हा ती माझ्याशीच बोलत असते नकळतपणे. खरच ती वेडी आहे. जेव्हा मी तिच्या आणि तिने माझ्या गळ्यात माळ घातली तेव्हा मला वाटले खरच मी तृप्त झालो. पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पहिला तर तो माझ्या तृप्तीपेक्षाही कित्तेक पटींनी जास्ती होता. माझे समाधान तर राधेला प्राप्त केल्यासारखे होते, पण तिचा आनंद तर विश्वाच्या सर्वे सर्वा असलेल्या विश्व्कार्त्याच्या प्राप्तीचा आनंद नव्हता तर तिच्या प्रेमाचा, वेडेपणाचा विजय होता तो. ती कितीक सुंदर हळवी, रागीट. मग काय झाले, राग तर देवाधिदेव महादेवाला पण आहे. तिला भेटल्यावर वाटल कि गीता परत एकदा लिहावी, ज्यामध्ये खरच तिच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी तिला देवू शकेल." 

" माझ्या प्रिय वेडीला प्राणाहून प्रिय बनवले आहे - या प्राणहीन कृष्णाने."


Wednesday, June 6, 2012

भूर्रर ....


तिचा नवरा तिला स्टेशन वर सोडायला आला होता. खर तर त्याला AirPort वर जायचं होत सोडायला, पण तिनेच मनाई केली होती. तिची ऑफिसची टूर होती - जर्मनी ला. ती स्टेशन वरून ट्रेन मध्ये बसली. AirPort वर पोचेपर्यंत तिच्या मनात हेच होत कि आपण जे करतोय ते चुकीच तर नाही न ? केवळ आपल्या इच्छेसाठी आपण ईशान ला फसवत तर नाही ना, पण लगेच तिच्या दुसऱ्या मानाने समजूत काढली कि, 'जरी तू तुझ्या मनाची इच्चा पूर्ण करत आहेस तरीही त्यात तुझ पाऊल कुठेहीवाकड पडणार नाहीये. तू फक्त आणि फक्त निर्भेळ आनंद घेण्यासाठी हे टूर च नाटक केलंस. त्यामध्ये कोणाला फसवण्याचा उद्देश तर येतंच नाहीये. '
'पण मग कोणी मला पाहिलं तर?' 'कस पाहील अगं, म्हणून तर तू जर्मनी निवडलस ना जायला.' 'पण माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या नवऱ्याने कधीच नाही म्हंटल नसतं मला असा आनंद घ्यायला'
'पण मग त्यामध्ये मज्जा आली नसती ना. तुला तो आनंद कदाचित मिळाला नसता' 'पण तरीही कुठेतरी मनामध्ये वाईट वाटतंय' ' अगं वाईट वाटण्यासारख काहीच नाहीये त्यात, तू तिथून आलीस ना परत कि तुला वाटेल कि आपण केल ते बरोबरच केल. आणि पुन्हा कधीतरी दहा बारा वर्षांनी सांगून तक ना ईशान ला' 
शेवटी तिच्या एका मनाने दुसऱ्या मनावर विजय मिळवला आणि तिच्या मनातले सर्व वाईट विचार निघून गेले. खर वाईट विचार नेमके कोणते हेसुद्धा एक कोडंच होत तिच्यासाठी.
ती घरी ना सांगता जातीये हे वाईट होत कि ती स्वतासाठी जातीये हे वाईट होत तिलाच काळात नव्हत. म्हणूनच हा दोन मनांचा झगडा सारखाच चालू होता तिच्या मनात जेव्हापासून तिच्या मनात ती आईडिया आली होती.
*   *   *   *
त्या दिवशी ऑफिसवरून येताना  तिने तो कॉलेजचा ग्रुप पाहिला आणि मनोमन तिच्या कॉलेजच्या कट्ट्या पर्यंत जावून पोचली.  तो कट्टा, त्या खुसखुशीत गप्पा, ती कच्छी दाबेली, ती कैलास ची शेवपुरी, तो कॉलेज जवळचा टनेल. सगळ काही क्षणात तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेल होत. आणि नाही म्हणायला तिचा कॉलेजचा ग्रुप किंवा शाळेचा ग्रुप काही लीप वर्षाला नाही भेटायचे तर आठवड्या दोन आठवड्याला त्यांची एखादी भेट ठरलेली असायची. पण तरीही तो आठवड्याचा काळ म्हणजे सर्व मित्र मंडळीसाठी लीप यीअर सारखाच असायचा. कितीही भेटा, मज्जा करा तरी सर्वाना कमीच पडायचं.
आणि तिथेच तिला हि भन्नाट आईडिया सुचली. कि सर्वांनी मिळून जर्मनी ट्रीप करायची तेही न सांगता.  कोणालाही न सांगता. 
त्यानंतर वर्ष भरातच सर्वांच गलबत होवून जर्मनीचा प्लान तयार झाला होता. डॉन नेही केला नसेल इतका भारी प्लान केला होता सर्वांनी.
*  *  *  *
तीच स्टेशन प्लान मध्ये पहिलं होत. पुढच्या स्टेशन वरून निमो आणि बबली दोघीजणी चढल्या. पुढे दगडूशेठ बाबा, सिंघम, पांडा, सिल्क, जादूची मम्मी, एक्शन काका, लकी मावशी, एच के, मि. बिन सार्वजन ठरल्याप्रमाणे आपल्या आपल्या जागेवरून स्टेशन वर बसले.
ट्रेन AirPort जवळच्या स्टेशन वर थांबली. तशी सर्वजण आपल्या आपल्या सुटकेस घेवून उतरली. तसं AirPort जवळ होत, चालत जाण्या इतक जवळ. सर्वजण तिकीट खिडकी ला जावून तिकीट दाखवून आत शिरली. सर्वांनी  चेक इन केल आणि वेटिंग लॉबी मध्ये येवून बसले. आपापल्या घरी फोन करून AirPort वर पोचल्याचा निरोप दिला. ज्यांची बच्चे मंडळी होती त्यांनी त्यांना चोकलेट चे प्रोमीस करून फोन ठेवून दिले. तेवढ्यात सर्वांच्या फोन  वर मेसेज आला - "Gate No 7 ". सर्वांनी एकंच रिप्लाय केला "Roger that ".

सर्व जणांनी एकदम गलका केला गेट नंबर ७ वर.  आणि त्याचं विमान आकाशात झेपावल जर्मनी कडे. 
भुर्र्रर्रर ...... 


   

Tuesday, June 5, 2012

चांदणं - ६

आदित्य अवाक होवून जान्हवीच काम बघत राहिला आणि नाटक कधी संपलं याचा पत्तापण लागला नाही त्याला. नाटक झाल्या झाल्या तो पळतच जान्हवीच्या रूम कडे जायला निघाला. संजय ला ५ मिनिटात येतो म्हणून आदित्य जान्हवीला शोधात निघाला खरा पण वाटेत त्याला अभाच भेटली. आभा शी एक दोन शब्द बोलून ती काय बोलते आहे याकडे लक्ष न देता त्याने तिलाच विचारलं, " अग ती तुझी मुख्य नायिका कुठे आहे. तीच माझी बारावीची मैत्रीण. आपल नाटक झाल होत न, त्यामध्ये मी ती कविता घेतली होती त्या कवितेची लेखिका." अभाने प्रश्नांचा भडीमार करायच्या आधीच आदित्य ने सारा निबंध सुनावला. अभाने त्या कोपऱ्यातल्या खोलीकडे बोट केल आणि समोर बघते तो तो कधीच त्या रूम कडे झेपावला होता. आदित्य ला तिने इतका आसुसलेलं कधी पाहिलं नव्हता, पण जास्ती विचार न करता ती तिच्या रूम मध्ये आवरायला गेली.
आदित्य ने रूम च दार ठोठावल. जान्हवीने आतूनच कोण आहे, आत या म्हणून सांगितलं. 
तो आत गेला, जान्हवीने आरशातूनच आदित्य कडे पाहून एक मोठ्ठ स्मित केल आणि त्याला बोलायला वळली तेवढ्यात वळताना तिचा धक्का लागून तिथला काचेचा flower pot पडला. आणि ती हसायलाच लागली. आदित्य ला कळेना कि काय झाल नेमक, पण तिला हसताना पाहून त्याच्या मनात सहजच ओळी स्फुरल्या,

"आज अचानक मला कळेना,
उदय कुणाचा- सूर्याचा कि तुझा 
रात्र कोणाची चंद्राची कि तुझी 
मग तुझ्याच ठिकाणी उषःकाल अन 
कसा चांदण्यांचा पसारा ?
पावूस कोणाचा ढगाचा कि तुझा
पण तुझ्याच ओठी गडगडात सारा .. "

एकदम जान्हवीच्या आवाजाने तो जागेवर आला, "आरे सॉरी हं, माझ्याकडून हे नेहमीच घडत. मी आत्तापर्यंत शंभर एक flower pot तरी फोडले असतील, तरी मी सरांना सांगितलं होत कि माझ्या रूम मध्ये तुम्ही ते फुलांना कोंडून नका ठेवत जावू."
इतक बोलेपर्यंत आदित्य त्याच्या कवितेच्या विश्वातून पूर्ण बाहेर आला होता. आणि एकदम ओशाळून पण गेला होता, कारण जान्हवी कडून एकदम असा मोकळेपण त्याला अपेक्षित नव्हतं. 
तिची बडबड मात्र चालूच होती. 
"हो पण आदित्य राव , तुम्ही माझी कविता चोरली याबद्दल तुम्हाला शिक्षा तर झालीच पाहिजे. "
आदित्य एकदम गडबडून गेला आणि बोलू लागला - "अग मी त्यावेळी नाटक सुरु व्हायच्या आधी मुद्दामूनच प्रस्तावनेत सांगितलं होत तसं. पण तुला वाईट वाटल असेल तर मी .."
त्याच वाक्य मधेच तोडून ती लग्गेच बोलली "हो मला वाईट तर खूपच वाटलाय आणि त्याची नुकसान भरपाई म्हणून तू पुढच्यावेळी येताना माझ्यासाठी चोकलेट चा मोठा बॉक्स आणि फोडायला एक flower pot घेवून ये ."
"पुढच्या वेळी ??" आदित्य एकदम बोलला. 
"का ?? आपण आता इथेच बाय करणारे का? आता आपण भेटत राहणारे. आणि हो तुझा फोन नंबर पण दे मला."
"घ्या जान्हवी बाई इथेच आहेत अजून. आम्ही मात्र पूर्ण गाव शोधून आलो. आणि तू इथे काय करतीयेस." इति अक्षय जान्हवीचा सहकलाकार आणि मित्रसुद्धा.
"अरे अक्षु हा आदित्य माझा बारावीचा मित्र. म्हणायला मित्र आत्ताचा जेव्हा त्याने माझी कविता चोरली तेव्हापासूनच. कारण कॉलेजमध्ये कधी आम्ही बोललोही नाही."
"आरे हाय आदित्य आणि please तू जानू कडे लक्ष देवू नकोस ती अशीच खेचत असते सर्वांची. खर तर तुझ्या त्या नाटकामध्ये तिची कविता ऐकून ती अशी वेड्यासारखी पळत सुटली होती स्टेज कडे. ती एकदम शोक झाली होती कि ती कविता तिला सापडली म्हणून."
"सापडली ??? म्हणजे ?", आदित्य.
"अरे तुला तिने सांगितलं नाही का अजून? तिच्या कविता संग्रहामध्ये ती कविताच तिला सापडत नव्हती."
"आरे अक्षय तो त्यानंतर आत्ता मला भेटलाय. पण अरे हो मी विसरलेच आदित्य तू कसा काय नाटक पाहायला? तुला नाटकांची आवड आहे का?"
"अग तुझ्यासोबत काम करते न ती आभा, ती माझी मैत्रीण आहे. आज तिच्यासाठी आम्ही आलो होतो आणि .."
"आणि काय ?", जान्हवी.
"अरे हो मी विसरलोच. मला आता लवकर गेल पाहिजे, कारण आज आम्ही कॉलेजची मित्रमंडळी खूप दिवसांनी एकत्र भेटलो आहोत आणि आम्ही आभा सोबत बाहेर जायचा प्लान केलाय. त्यामुळे मी आता निघतो." हे बोलता बोलताच तो रूम मधून बाहेर पडतो.
"ठीक आहे, पण भेट नक्की. बाय." जान्हवी.
"बाय जान्हवी आणि अक्षय तुलापण बाय."

त्यानंतर त्यादिवशी सर्व जणांनी खूप दिवसानंतर धम्माल केली. सर्व जनाच खूप खुश होते. एकटी आभा सोडून, तिला आदित्य ने जान्हवीला असा इतका वेळ जावून भेटलेल मुळीच आवडलं नव्हत. 
' आदित्य माझ्यासाठी आला होता न नाटक पाहायला मग तो इतका वेळ असा का तिच्याबरोबर गप्पा मारत होता कोणास ठावूक." हाच विचार पूर्ण वेळ आभा करत होती. पण नंतर मजा करता करता तीसुद्धा हे विसरली.

नंतर बरेच दिवस  आणि सर्वच जन आपल्या कामामध्ये बिझी होती. इतके कि कोणाचा कोणाला पत्ता नव्हता.
श्रेयू ला एका कंपनीत चांगला जॉब मिळाला होता, ती आता पार्ट टाइम कॉलेज करत होती. परीक्षेपुर्तच कॉलेजला जायचं होत तिला. 
संजय ला दिल्लीच्या एका विद्यापीठाचा कॉल आला होता सायाकोलोजी मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी, त्यामुळे तो तिकडे जायची तयारी करत होता.
अगस्ती च्या पी एच डी च पाहिलंच वर्ष होत, पण तो खूपच नेटाने अभ्यास करत होता. त्याला ऑस्ट्रेलियामधून तिथे त्याच पी एच डी पूर्ण करण्यावाषयी विचारणा झाली होती.
आदित्य मात्र मागे पडत होता. CA च्या पहिल्या परीक्षेमध्ये नापास झाला होता. अभासुद्धा मुंबई ला शिफ्ट झाली होती, आताशा तिला मराठी हिंदी मालिकेमध्ये काम करण्याविषयी विचारणा झाली होती आणि एका मराठी मालिकेमध्ये ती कामही करू लागली होती. तिने नाटक कारण सोडून दिल होत. पण ती महिन्याचा एका रविवारी खास आदित्य ला भेटण्यासाठी घरी येवून जायची. हल्ली तिला आदित्य बद्दल वेगळ फिलिंग येत होत. तिलाच काळात नव्हत, पण तो आता मित्रापेक्षाही जास्त कोणीतरी बनू लागला होता. आदित्य मात्र त्याच्या अपयशामुळे सर्वांपासून दूर राहू लागला होता. 
आदित्य ने आता नोकरी शोधायला चालू केल होत. 
पावसाळा सुरु झाला होता. एके दिवशी असाच क्लास वरून रात्री उशिरा येताना आदित्य बस स्टोप वर थांबला होता. एकदमच पावसाला सुरुवात झाली, आधी रिमझिम आणि दहा पंधरा मिनिटातच धो धो पडायला लागला होता. तेवढ्यात दूरवरून कोणीतरी पळत पळत स्टोप कडे येताना त्याला दिसलं. आदित्य पूर्ण भिजला होता पण बस येवूपर्यंत त्याच्याकडे दुसरा पर्यायाच नव्हता.
ती पळत येणारी व्यक्ती आता दृष्टीक्षेपामध्ये आली होती. आणि आदित्यने चमकून पाहिलं तर ती जान्हवीच होती. 
ती आली स्टोप वर आणि स्टोप च्या एका कोपऱ्यात आडोशाला उभी राहिली. तीच लक्ष नव्हता आदित्य कडे. स्टोप वर अजून एक दोन जन होते. 
आदित्य तिच्या जवळ जावून थांबला आणि बोलला " सॉरी मी चोकलेट आणि flower pot नाही आणलाय. " आणि जान्हवीने आश्चर्य भरल्या नजरेने शेजारी पाहिलं.
दोघेही एकदमच बोलले " कुठे आहेस तू ??"
जान्हवीने हात करून आदित्य ला थांबवलं आणि तिने बोलायला सुरु केल , "आरे काय हे कुठे होतास इतके दिवस. मी नाटक सोडलं आणि त्यामुळे अभाकडून तुझा पत्ता घ्यायचा सुद्धा राहिला. तू तेव्हा फोन नंबर द्यायाचाही विसरून गेलास. .."
आणि आदित्य ला कळलं कि आता हिची बडबड काही थांबणारी नाहीये. आणि त्याला ती थांबू नये असंही वाटू लागल. कारण त्या दिवशी त्याने चार पाच ठिकाणी नोकरी साठी interview दिले होते सगळीकडे निराशा होती. आणि मग त्यामुळे त्याच लक्ष क्लास मधेही लागत नव्हत. आणि त्याला जान्हवी दिसली इथे, त्याला इतकं बर वाटल कि बस्स तिची बडबड ऐकत राहावी. 
आणि जान्हवी होतीच तशी. बडबडी.
त्या पावसामध्ये आदित्यला पुन्हा काही ओळी सुचल्या -
"मुसळधार पावूस आहे कि हिची बडबड
मलाच उमजेना,
ठाव मनीचा घेत 
तिचे शब्द मनातून परत फिरेना,
"
आणि आदित्य एकदम थबकला. कारण त्याला जाणवलं कि जान्हवी जेव्हा जेव्हा समोर येते तेव्हा तेव्हा तिच्यासोबत ती हि कविता आणि कवितेचे शद्बही घेवून येते.

एव्हाना पाऊस निवळला होता. रस्त्यावरच्या दिव्यात ते रात्रीचे रंग सुरेख दिसत होते. रस्त्यावरचे दिवे जणु पावसात धुतले गेल्यामुळे अजून शुभ्र प्रकाश फेकत होते.