Tuesday, August 30, 2011

मित्रा तू प्रेमात बुडलास, हे मात्र खर..

आता तुला नक्कीच पावसाच्या कविता आवडत असतील,
कारण नेहमीच तुला पावसात भिजणारी ती दिसत असेल..
मित्रा तू प्रेमात बुडलास, हे मात्र खर...
आता तुझ्या मनामध्ये स्वप्नाचे डोंगर बनतील,
त्या डोंगरावर तुझ आणि तिचं छोटस घरट असेल,
घरात्यासमोर एक बाग असेल,
बागेत एक गुलाबच झाड असेल,
तू रोज त्या झाडाच एक गुलाब तिला देशील,
आणि ह्या ओळी वाचताना मंद मंद स्वतःशीच हसशील,
मित्रा तू प्रेमात बुडलास, हे मात्र खर...
आता तुला स्पर्शाचे वेगळे अर्थ उमगतील,
आसवांशी नवी ओळख होईल,
आणि त्या आल्हाददायक प्रेमाशी तुझ नात जुडेल..
कवी-चित्रकार तुला भावतील..
प्रत्येक चौकटीमध्ये तू स्वताला बसवू पाहशील,
तिचा हिरो आहेस अशी दिवसा ढवळ्या स्वप्न पाहशील,
मित्रा तू प्रेमात बुडलास, हे मात्र खर ...
आता तू सारखाच तिचा विचार करशील,
तिच्या अवती भवती तुझे विचार भुंग्यासारखे गुणगुणतील,
ती मात्र कमळासारखी पाकळी मिटून घेईल,
तेव्हा तू माझ्या मित्रा तिच्या एका कटाक्षासाठी धडपडशील,
"तुझे नि माझे नाते काय" या ओळींशी जुंपशील..
तुझेच प्रश्न आणि तुझीच उत्तर असतील..
तेव्हा तू मित्रा  प्रेमात पार बुडला असशील...


Friday, August 26, 2011

Revenge Day 2 - Happy Friendship Days !!!


रेस है सांसो कि म्हणत तिचा डान्स सुरु झाला. त्या डोंगरावरची लेणी संपली कि तिथून पुढे दाट झुडपं सुरु होत होती. त्या झुडूपा मधून रस्ता काढत ते तिथवर पोचले होते. जिथे छोटीशी मोकळी जागा होती, जिथून एक झरा निघून पुढे  लांबवर जावून लहानशा धबधब्याला मिळत होता, दाट झाडीमध्ये ती केवळ कदाचित एकच बसण्याजोगी मोकळी जागा होती. दहा बारा दगडांच्या मधून त्या झऱ्याच झुळझुळ पाणी वाहत होत आणि सोबत त्या १०-१२ जनाचा कल्ला. त्या झाडा झुडुपांमध्ये त्यांचा आवाज मिसळून जात होता. इतका कि जर तिथे कोणी डाकू-लुटेरे, किवा जंगलातले बरेच वाघ-चित्ते-सिंह आज काल शहरामध्ये येत असतात आणि जर का  त्यातलाच एखादा तिथे येवून त्याच्यावर हल्ला केला असता तरी कोणाला कळलेसुद्धा नसते. कोणी शोधायला तरी जाणार कुठे. नेहमी कॉलेजमधून पळ काढून अशा जागेवर जावून कल्ला करणाऱ्या तिच्या मैत्रिणी आणि ती, मग त्यांना तिथे त्या डोंगरामध्ये काही झाल असतं तरी शोधायला जाण्यासाठी कोणी जाणार तरी कुठे ना. पण अशा जागी जावून ठेले मांडताना कधीच म्हणजे कधीच त्यांनी असे वाईट विचार मनात सुद्धा आणले नाहीत. म्हणूनच तर तिथे जावून रेस है सांसो कि वर तिचे पाय बिनधास्त पाने ताल धरत होते.
१० मुली आणि २ मुल, असा त्यांचा ताफा त्या जंगल म्हणावं अशा ठिकाणी मजा करण्यात खूप मग्न होता. पहिल्यांदा धबधब्यामध्ये मनसोक्त भिजणे, मग धबधब्याच्या वरती चढून रस्ता काढत काढत त्या लेण्यापार्यंत पोचणे. सपाटून भूक लागलेली असल्यामुळे सर्वांनी डब्बे काढून ४ दिवसांच्या भूकेल्यान्सारखे ताव मारणे, आणि मग सुस्तावून गेले तरी पुढची वाटचाल सुरु करणे, भरपूर फोटो आणि फालतू विनोद्गिरी करत करत त्या लेण्यान्च्यापलीकडे जावून झाडा झुदुपामध्ये घुसून तिथे अंताक्षरी, डान्स, कल्ला करणे. मग घरी जायला उशीर होईल म्हणून लगबग करून तो डोंगर उतरणे, तिथेच पडलेल्या दारूच्या बाटल्या उचलून त्यासोबत फोटो काढणे, यामध्ये जे सुख आहे ते सुख स्वर्गामध्ये सुद्धा मिळणार नाही.
त्या लेण्यामध्ये तिच्या काही भाविक मैत्रिणीनी रुपयाची नाणी फेकून आपल्या इच्छा मागितल्या होत्या, कोणास ठावून त्यांना त्या इच्छा आज आठवत असतील कि नाही आणि आठवत असतील तर त्या पूर्ण झाल्या असतील कि नाही. पण जर काही पूर्ण झाले असेल तर ते आहे - मैत्री जगण्याचे स्वप्न. अशी मैत्री जी काळाच्या पुढे जावून एकमेकांना समजावून घेईल. अशी मैत्री जी मनाच्या पलीकडे जावून येईल. अशी मैत्री जी शक्याशक्य  गोष्टी मध्ये कधीच अडकणार नाही. अशी मैत्री जी फक्त आणि फक्त मैत्रीच आहे. 



 

Wednesday, August 17, 2011

कल, आज और कल !



१० मे १८५७, ब्रिटीश सेनेमध्ये काम करणाऱ्या भारतीयांमध्ये असंतोष पसरला आणि ठिणगी पेटली. त्या एका शिपायाने लावलेल्या ठिणगीमुळे हजारो लोक पेटले आणि तो उठाव झाला. प्लासी मध्ये झालेला पराभव आणि मग हळू हळू रक्तामध्ये पेरली गेलेली क्रांती मोठी होवून जंग पुकारायला त्यानंतर १०० वर्षे लागली. कोणतीही गोष्ट एका रात्रीमध्ये होत नाही. त्यासाठी हजारो रात्री काजव्यांच्या प्रकाशात धुमसत राहाव्या लागतात. आणि कोणतीही राक्षसी शक्ती समूळ नष्ट करण्यसाठी, राक्षसाच्या राज्यामध्ये घुसावे लागते. रामालाही नाही का लंकेपर्यंत जावे लागले. लंके पर्यंत जातानाही बराच खडतर प्रवास झाला होता आणि तिथे जावून जंगी झुंज पेटली होती. तीसुद्धा त्या खडतर प्रवासा इतकीच कठीण होती.अखेर विजय झाला, तो केवळ रामाच्या देव असण्यामुळे नाही किवा त्याच्या अपार शक्तीमुळे नाही तर अगदी छोट्या छोट्या जीवांच्या त्या लढाई मधल्या सहभागामुळे. तिथे केवळ राम नव्हता. तिथे संपूर्ण वानरसेना, सुग्रीव, लक्ष्मण, हनुमान, विभीषण, आणि अगदी छोटी खारू ताई सुद्धा होती. जेव्हा सर्वात छोट्या पातळीपर्यंत क्रांती जावून पोचते तेव्हा तिथून पुढे फक्त आणि फक्त विजय असतो. एका माणुसकीचा, एका चांगुलपणाचा, स्वातंत्र्याचा आणि एका वैभवशाली भविष्याचा विजय सुरु होतो. पण तिथवर जाण्यासाठी सहनशक्ती, सातत्यता, निष्ठा, आणि झोकून देणे हे सर्व करावे लागते. लंकेच युद्ध जिंकायला फक्त राम कधीच पुरला नसता, म्हणूनच तर बाकीच्या लोकांचा सहभाग होता. आणि कदाचित रामापेक्षाशी बाकीच्यांचेच योगदान कणभर का असेना पण जास्त असेल.
सरदार वल्लभभाई पटेल, चाचा नेहरू, गांधीजी, लोकमान्य टिळक, लाल लजपत राय आणि त्यानंतर इंदिरा गांधी यांना सर्व सुधारणा करायच्या होत्या म्हणून त्यांनी बाहेरून टीका किवा लांबून हल्ले केले नाहीत. त्यानाही त्या राजकारण नावाच्या लंकेमध्ये उतरावच लागल होत. गटारामाधली घाण पूर्ण साफ करायची असेल तर त्यामध्ये उतरूनच ती साफ करता येते. फक्त सुरुवात कोणीतरी करून द्यावी लागते.
बरोब्बर १५४ वर्षानंतर हि ठिणगी परत एकदा पेटली आहे. परत एकदा देशामध्ये क्रांती व्हायला हवी आहे. आणि हि क्रांती फक्त बाहेरून मोर्चे, फेऱ्या काढून पूर्ण होणार नाहीये तर आज आपल्यामधल्याच लोकांना राजकारणामध्ये उतरून हि घाण साफ करावी लागणार आहे. कारण कितीही केले तरी आपण पिंजऱ्याच्या बाहेर थांबून सिंहाला आपल्या तालावर नाचवू शकत नाही. जर आपल्या राष्ट्राच्या उद्धारासाठी, प्रगतीसाठी, गोर गरिबांना पूर्ण सुविधा मिळाव्या यासाठी काहीतरी करायचं असेल तर आपल्यापैकीच कोणालातरी हा देश चालवायला घ्यावा लागणारे.
अण्णा हजारे - आजचा नवा गांधी ! हि ठिणगी पेटवण्याची कामगिरी अव्याहतपणे करत आहेत. आज देश फक्त भ्रष्टाचारामुळेच ग्रासलेला नाहीये तर बेजबाबदार नागरिकांमुळे - जे मतदान करत नाहीत, जे लाच देतात, जे पोलिसांमध्ये जावून तक्रार द्यायला घाबरतात, जे संकट स्वताच्या दारात असेल तरच त्याचा विचार करतात, अशा लोकांमुळेही ग्रासलेला आहे. म्हणजेच आता खारू ताई लाही या लढाई मध्ये उतरावं लागणार आहे. साधारण नागरिकालाही आपल्या हक्काची जाणीव हवी आणि नुसतीच जाणीव नको तर आपले हक्क हे प्रसंगी शस्त्रासारखे वापरायची धमकहि हवी आहे.
फक्त चार दोन चित्रपटांचे डायलॉग १०-१० वेळा बोलण्याशिवाय आपण काही करू शकत नाहीत का? नाही , आपल्यात ती शक्ती आहे आणि आपण ती वापरणार आहे. आणि किती जणांना मारतील हे राक्षस ? असेही कितीतरी जन बॉम्बस्फोटामध्ये मरत असतातच. कितीतरी गरीब जनता अन्नावाचून प्राण सोडते. मग जर आपल्या उद्याच्या पिढीसाठी आपण मेलो तर काय हरकत आहे ? आपल्या पूर्वजांनी, आपल्या आधीच्या पिढीने आपल्याला स्वतंत्र भारत दिला - कशासाठी ? त्याला पाश्चात्य संस्कृतीचे चुकीचे मार्ग अवलंबून खराब करण्यसाठी? कि देशातल्या प्रत्तेक नागरिकाला हर एक सुविधा बहाल करण्यासाठी ? कि जात-पात, उच्च निच्च यावरून वाद घालून दंगली करण्यासाठी ? कि कुठेतरी valentine day  साजरा करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी आपण आपली शक्ती वापरणार आहे ?
हि क्रांती खर तर सामाजिक पातळीपर्यंतच सीमित नसून मानसिक पातळीपर्यंत गेली तरच कुठेतरी अमुलाग्र बदल होतील. आपली या देशाबद्दलची मानसिकताच आधी बदलली पाहिजे. जेव्हा आपण हा देश आपल घर माणू तेव्हा आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होईल.
पण हेही तितकाच खर आहे कि अजूनही आपल्या देशाचा आपल्याला अभिमान आहे, आदर आहे , गर्व आहे; असे अगणित लोक आहेत कि जे देशासाठी झटत आहेत, जे त्याग करून सीमेवर लढत आहेत, जे समाज कार्यामध्ये सहभागी होवून अनाथ-वृद्ध-अपंग लोकांसाठी काहीतरी मदत स्वछच मनाने करत आहेत, जे वर्तमान पत्रामध्ये कळकळीने मनापासून लिहून हि आग सतत जळत राहील यासाठी प्रयत्न करत आहेत, काहीजण देशासाठी अनेक क्षेत्रामध्ये प्रगती करून, नवनवीन संशोधन करून देशाची मान उंच नेत आहेत. आपल्या देशाचा आपल्याला अभिमान आहे, इतकाच नाही तर आपल्या झेंड्याचाही आपण खूप म्हणजे खूप आदर करतो. जेव्हा ब्रिटीश झेंडा त्यांच्या चपलीवर, शर्ट वर, टोपी वर , आणि इतकाच काय त्यांच्या अंतर्वस्त्रांवरही दिसतो तेव्हा वाटते आपण अजून खूप वरती आहोत. अजूनही आपल्या रक्तामध्ये आपल्या क्रांतिकारकांचे रक्त फिरत आहे. आणि म्हणूनच आपण एकमेकांना आवाहन करूयात - पुढे यायचे, भ्रष्टाचाराविरुद्ध फक्त आवाजच नाहीतर हातही उठवायचे, आपले हक्क बजावायचे. चला आता वेळ आली आहे रणांगणात उतरायची. तेव्हा रामायण झाले आता महाभारत होईल. रामायणामध्ये राम परकीय शत्रूंशी लढला, महाभारतामध्ये अर्जुन घरच्याच लोकांशी लढला. विजय हा नेहमी सत्याचाच होतो, आता आपल्याला आपल्या घरातल्याच लोकांशी लढायचे आहे.
पुन्हा एकदा क्रांती होवून जावूदेत.

भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

जय हिंद !!



Monday, August 15, 2011

जननी जन्मभूमी ...

[Sources : Internet ]

On the occasion of India's Independence Day, let's look at what scholars, historians and authors have to say about India.

  1. Will Durant, American historian: "India was the motherland of our race, and Sanskrit the mother of Europe's languages: she was the mother of our philosophy; mother, through the Arabs, of much of our mathematics; mother, through the Buddha, of the ideals embodied in Christianity; mother, through the village community, of self-government and democracy. Mother India is in many ways the mother of us all".
  2. Mark Twain, American author: "India is, the cradle of the human race, the birthplace of human speech, the mother of history, the grandmother of legend, and the great grand mother of tradition. our most valuable and most instructive materials in the history of man are treasured up in India only."
  3. Albert Einstein, American scientist: "We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made."
  4. Max Mueller, German scholar: If I were asked under what sky the human mind has most fully developed some of its choicest gifts, has most deeply pondered on the greatest problems of life, and has found solutions, I should point to India.
  5. Romain Rolland, French scholar : "If there is one place on the face of earth where all the dreams of living men have found a home from the very earliest days when man began the dream of existence, it is India."
  6. Henry David Thoreau, American Thinker & Author: Whenever I have read any part of the Vedas, I have felt that some unearthly and unknown light illuminated me. In the great teaching of the Vedas, there is no touch of sectarianism. It is of all ages, climbs, and nationalities and is the royal road for the attainment of the Great Knowledge. When I read it, I feel that I am under the spangled heavens of a summer night.
  7. R.W. Emerson, American Author: In the great books of India, an empire spoke to us, nothing small or unworthy, but large, serene, consistent, the voice of an old intelligence, which in another age and climate had pondered and thus disposed of the questions that exercise us.
  8. Hu Shih, former Ambassador of China to USA: "India conquered and dominated China culturally for 20 centuries without ever having to send a single soldier across her border."
  9. Keith Bellows, National Geographic Society : "There are some parts of the world that, once visited, get into your heart and won't go. For me, India is such a place. When I first visited, I was stunned by the richness of the land, by its lush beauty and exotic architecture, by its ability to overload the senses with the pure, concentrated intensity of its colors, smells, tastes, and sounds... I had been seeing the world in black & white and, when brought face-to-face with India, experienced everything re-rendered in brilliant technicolor."
  10. A Rough Guide to India: "It is impossible not to be astonished by India. Nowhere on Earth does humanity present itself in such a dizzying, creative burst of cultures and religions, races and tongues. Enriched by successive waves of migration and marauders from distant lands, every one of them left an indelible imprint which was absorbed into the Indian way of life. Every aspect of the country presents itself on a massive, exaggerated scale, worthy in comparison only to the superlative mountains that overshadow it. It is this variety which provides a breathtaking ensemble for experiences that is uniquely Indian. Perhaps the only thing more difficult than to be indifferent to India would be to describe or understand India completely. There are perhaps very few nations in the world with the enormous variety that India has to offer. Modern day India represents the largest democracy in the world with a seamless picture of unity in diversity unparalleled anywhere else."

 Salute to India !!!


Friday, August 12, 2011

Uncontacted Tribes


[Sources:
http://en.wikipedia.org/wiki/Uncontacted_peoples
http://www.uncontactedtribes.org
http://www.dailymail.co.uk]

Uncontacted people, also referred to as isolated people or lost tribes, are communities who live, or have lived, either by choice or by circumstance, without significant contact with globalised civilisation.
Few peoples have remained totally uncontacted by modern civilisation, and almost all current groups are in danger of being unwillingly contacted.[vague] Indigenous rights activists call for such groups to be left alone in respect of their right to self-determination. Some have chosen to make contact either exceedingly difficult or dangerous for those trying to reach them, such as the Sentinelese.
The majority of such communities are located in densely-forested areas in South America and New Guinea. Knowledge of the existence of these groups comes mostly from infrequent (and often violent) encounters by neighbouring tribes, and also from aerial footage. A major problem with contacting isolated people is that they will lack any immunity to common diseases, which can be devastating to a closely-contained population with no natural immunity.

One of Earth's last uncontacted tribes firing bows and arrows found in Envira region. (In the thick rainforest along the Brazilian-Peruvian frontier)

Their extraordinary body paint, precisely what they eat, how they construct their tent-like camp, their language, how their society operates - the life of these Amerindians remains a mystery! The jungle is fundamental to their lives and survival. It's their home, their source of food, the source of their culture etc. Without it, they could not exist as a people.
It is extraordinary to think that, in 2008, there remain about a hundred groups of people, scattered over the Earth, who know nothing of our world and we nothing of theirs, save a handful of brief encounters.
The uncontacted tribes, which are located in the jungles of South America, New Guinea and a remote and the beautiful and remote North Sentinel island in the Indian Ocean (the inhabitants of which have also responded to attempts at contact with extreme aggression) all have one thing in common - they want to be left alone. And for good reason. The history of contact, between indigenous tribes and the outside world, has always been an unhappy one.
In our overcrowded world their very future hangs in the balance. Almost all of these tribes are threatened by powerful outsiders who want their land. These outsiders - loggers, miners, cattle ranchers - are often willing to kill the tribe’s people to get what they want. Even where there is no violence, the tribes can be wiped out by diseases like the common cold to which they have no resistance.

Thought never to have had any contact with the outside world, everything about these people is, and hopefully will remain, a mystery. 


Image: Houses made from raw tree leaves hiding in the forest


Image: People from tribes looking surprisingly at the Air-Plane in the sky over their house, they might be thinking it as a Spirit or Large/Giant Bird



Image: Round shaped house of tribes


Image: Tribes people painted their bodies in red color with bow and arrows in hand




Thursday, August 11, 2011

ती अशीच अलगद अलगद आहे...

"ती" वर खूप जण लिहितात. खूप काही लिहितात. खोल, उथळ, शांत, उज्वल, मंद, नाजूक, सुंदर, गोड,निरागस, भावूक, सोज्वळ, हवीशी, नकोशी, सहज, आणि ती अलगद...
ती माहिती नाही कोण आहे, कुठून आलीये, कुठे जाणारे, किवा तिचा पत्ता, काहीच माहिती नाहीये. पण तरीही ती हवीशी वाटते, तिला ओळखत नाही पण जन्म जन्मांतरीच्या तिच्या कहाण्या, सर्व कहाण्या माहिती असल्यासारख्या वाटतात. तिची सोबत जणू श्वासासारखी भासते, हो भासतेच. कारण ह्या "ती" चा हा भासच आहे जो वेडावून सोडतो.
"ती" वर कोणाचा कब्जा नाहीये, कोणाची सत्ता नाहीये, कोणाची मालकी नाहीये, "ती" मुक्त आहे - जन्मापासून, मृत्युपासून, जगण्यापासून. ती अशीच अलगद अलगद आहे.
हवेवर स्वार आहे. स्वप्न तिचे गाव आहे. आणि "ती" हेच तिचे नाव आहे ..




ती कशी नेहमीच अलगद अलगद, हवेवार स्वार असते,
झुळूके ची दोर तिच्या हाती दिलेली असते,
कदाचित म्हणूनच  वेडे मन हे उगाच त्या वादळात उडी मारू पाहते..
तिच्या मनाच्या तळाशी जावू बघते..
ती अशीच अलगद अलगद, हवेवर स्वार असते..
बाकी कशाशी तिचे घेणे देणे नसते,
उगाच जगणे तिला मान्य नसते,
ती हसते तेव्हाही पाण्यावरती तरंग उमटते..
ती अशीच येते आणि झुळूक बनुनी जाते,
एका क्षणाची तिची मिठी त्या हवेत विरघळून जाते ...
ती त्याच हवेवर स्वार होवून अलगद निघून जाते ...
स्पर्श हवेचा आजही तिची कहाणी वदतो,
ती होती हा भासही मजला हुलकावणी देवून जातो,
ती कमळ आणि मग शब्द माझा भुंगा बनून जातो,
तिच्या भोवती गिरकी घेवून लांबूनच परतू येतो,
ती आपल्या पाकळ्या मिटून मूक निरोप घेते,
मजसोबत त्या हवेलाही ती वेड लावून  जाते...
ती मात्र अलगद अलगद स्वप्नात विरून जाते ....


कृष्णकळी...


Wednesday, August 10, 2011

Revenge Day 1 - Happy Friendship Days !!!


[ I am going to take revenge with my near and dear friends by writing something for them. Here we go ... with Day 1]

बस्स या राखी पौर्णिमेला सर्व मुलांना राख्या बांधायच्याच. बर झाल हा friendship  day  रविवारी येतो ते. तयारी झाली, आमचा ग्रुप म्हणजे धींकच्याक ग्रुप ! सर्व काही ठरवणार, अर्थाचे अनर्थ काढणार, drama  queens  सर्व ठासून भरलेला. मुलींच्या सर्व ग्रुप ने संगनमताने ठरवलं कि यावेळी सर्व मुलांना राख्या बांधायच्या. त्याप्रमाणे  मुलींच्या  मोनीटर ने मुलांच्या मोनीटर ला सांगितलं कि उद्या सर्वांनी शाळेमध्ये हजार राहा, आपण रक्षाबंधन साजरा करणार आहोत. मुलांचा मोनीटर ठीक आहे म्हणाला. झाल आम्ही आतुरतेने वाट पाहत असलेला तो दिवस आला - त्या दिवशी मधल्या सुट्टीमध्ये आम्ही सर्व मुलांना राख्या बांधल्या. मुली ३२ आणि मुल ३४.
आम्ही आमच मिशन पूर्ण केल म्हणून फारच खुशीमध्ये होतो. कि २-३ दिवसात आमच्या कानावर आलं कि, मुलीना फक्त राखी भेट वस्तू पाहिजे होत्या म्हणून त्यांनी राखी पोर्णिमा साजरी केली असा काही मुल म्हणत आहेत.
झाल, आम्हाला तर कारणच पाहिजे होत भांडण करायला. झाल सर्व मुलीनेमध्ये सूचना गेल्या - आपापल्या भेट वस्तू उद्या शाळेमध्ये घेवून या, आपण सर्व परत करून टाकणारे. त्याप्रमाणे सर्व मुलीनी आपापल्या भेटवस्तू आणल्या, एका पिशवीमध्ये गोळा झाल्या आणि मुलींची  मोनीटर मुलांच्या मोनीटर कडे गेली आणि साऱ्या वस्तूंची पिशवी त्याला देवून टाकली. ती पिशवी बघून मुलांना चेव चढला, त्यांनी ती समोरच्या टेबलावर ठेवून दिली. आता इकडून मुली ती पिशवी मुलांकडे ढकलत आहेत, तिकडून मुल ती पिशवी मुलींकडे ढकलत आहेत. झालं, भांडण पेटलं. वादावादी झाली. आणि राखीच्या (सावंत नव्हे, पोर्णिमा म्हणजे राखी पोर्णिमा ) निमित्ताने एकत्र आलेले भारत पाक परत  विभक्त झाले.
वर्गातला मुलगा समोर आलं कि मुली वाट बदलून चालू लागल्या.
दिवसावर दिवस जात होते आणि हे शीत युद्ध काही संपायच नाव घेईना. तसं हे भारत पाक युद्ध सर्व शाळेमध्ये माहिती होत. शिक्षक तर फार रागवायचे, पण आमच्या चित्रकलेच्या बाईनी ठरवलं कि या युद्धाची समाप्ती केली पाहिजे. हा वर्ग जर एकत्र आलं तर तो नक्कीच खूप चांगला किवा सर्वात चांगला असा ठरणार होता हे त्यांना खूप आधीच कळाल होत.
म्हणून त्यांनी चित्रकलेच्या तासाला वाटाघाटी करायचं ठरवलं. एक एक करून त्या सर्व मुलांच्या आणि मुलींच्या तक्रारी ऐकत होत्या. पण तक्रारी जेव्हा सांगितल्या जात होत्या तेव्हा, आम्हाला कळत होत कि या तक्रारी काही इतक्या मोठ्या नाहीत कि आम्ही मुला-मुलीनी इतका भांडल पाहिजे. आणि या शिखर परिषदेमध्ये भारत पाक पुन्हा एकत्र आले. त्यानंतर खेळांच्या स्पर्धेच्या निमित्ताने हे धागे अजून मजबूत झाले. जेव्हा आमचे मैत्रीचे धागे घट्ट व्हायला चालू झाले होते तेव्हा परत एकदा ठिणगी पेटली, ती सीमा रेषेवरून. आमचा बेंच मुलांनी ओढून नेला होता. खर काय ते देवालाच माहिती, पण आमचा मधल्या ओळीचा दुसऱ्या नंबरचा बेंच मुलांच्या ओळीमध्ये आम्हाला दिसला. आम्ही पेटून उठलो, तो बेंच आम्ही ओढून आणला परत आमच्या ओळीमध्ये.
शाळा भरली, आणि यावेळी मात्र मुलांनी हद्द केली. आमच्या दोन मैत्रिणी बेंच वर बसलेल्या असताना त्यांनी बेंच उचलायचा प्रयत्न केला. प्रयत्न काय, उचललाच होता. एक क्षणभरासाठी सर्वांचे ठोके चुकले होते कि आता त्या दोन मुली त्यावरून खाली धपकन आदळणार. पण हुश.. वाचल्या. अगदी वेळीच तो बेंच हवेतून जमिनीवर आल्याने त्या दोघीचा पात (जसे कि उल्कापात, हवेतून उल्का खाली पडणे) होता होता थांबला.
बस्स यावेळी मात्र आम्ही ठरवून टाकल होत, कि आता कध्धी म्हणजे कद्धीच मुलांशी बोलायचं नाही. आणि ज्वाला मुखी परत एकदा धुमसायला चालू झाला.
आता या वेळी कोणी काहीच करू शकणार नव्हत हे मात्र निश्चित झालं होत.
असेच शाळेमधले दिवस संपले आणि send -off ची तयारी चालू झाली. बस्स तेव्हा आणि शेवटच आम्ही एकत्र येणार असं सर्वांनाच वाटल होत. तेव्हा  कोणाला काय माहिती होत कि राखी पोर्णिमा साजऱ्या करणाऱ्या या मुली पुढे जावून friendship day ला  याच मुलांसोबत dance करतील, त्यांच्यासोबत मैत्रीच्या आणा भाका घेतील, आणि याच मुलांशी परत कधीही बोलायचं नाही असा प्रण घेणाऱ्या या पुढे त्यांची ओळख जिवलग मित्र म्हणून करून देतील.
बर झालं तेव्हा भांडलो, नाहीतर आज कदाचित इतके घट्ट धागे जुळले नसते.


[Disclaimer -  'All the characters, incidents and places in this story are fictitious. Resemblance to any person living or any incident or place is purely coincidental.'
इस कथा की सभी पात्र काल्पनिक है, इसका किसी भी जीवित व्यक्ति से और घटनासे कोई संबन्ध नहीं है. अगर कोई साधर्म्य दिखाई दे तो वो सिर्फ एक योगायोग समजावा.  धन्यवाद ! ]

Monday, August 8, 2011

Happy Friendship Days !!!

Decide  कर लिया  था मैने, इस बार किसी को call  नही करूंगी.. बघुयात किती मित्र गोळा केलेत आणि किती लोकांचे personally  email  येतात ते. कोणी फोन तर करणार नव्हतच, लांब राहते न सर्वांपासून, फोनला बिल जास्ती येत. पण साधे email  सुद्धा आले नाहीत. बस्स, फार फार तर कोणी कोणी facebook  वर tag  तेवढ केल होत. पण facebook  चे tag  म्हणजे तिसऱ्याच्याच स्वप्नामध्ये येवून चौथ्याने टपली मारण्यासारखे वाटते.
बाकी काही नाही. दोस्त दोस्त म्हणवणाऱ्यानीही साधी आठवण सुद्धा काढली असेल कि नाही शंकाच आहे, आणि मग दोस्तीच्या आणा भाका घेताना लावलेले नियम मात्र मलाच लागू केले होते जणू. आम्ही मात्र फोन करावा, email  करावा, facebook  वर जावून दहाबारा hi  hello  टाकावेत. कधी कधी आमच्या प्रिय वाटणाऱ्या दोस्तांवर चार शब्दही लहावेत. कविता कराव्यात त्यांच्या दोस्तीची मिसाल देणाऱ्या आणि सर्व काही करावे. आणि आमच्या दोस्त मंडळीनी ?? त्यांना काय वेळ नसतो. काहीना girl friend (s  ???) असतात. काहींचा दिवस फारच दिवस busy  असतो. बर आम्ही काहीच जमल नाही तर फकस्त एक miss काल द्यावा अशी विनंती सुद्धा करून पाहिलीये. पण कोणाला काही फरकच पडत नाही. हा, आणि मग आम्ही फोन केला नाही कि, सर्व बोलायला मोकळे , "लंडन गेल्यापासून फार बदलली आहे.", " आता काय बाबा, तुम्ही फॉरेनची मंडळी ", "अग जाम वैताग आलाय, weekend  ला मी फक्त आराम करतो. मस्त लोळतो." , "आरे यार, तू तरी कुठे फोन  केलास इतक्या दिवसात", "आम्हाला वाटले विसरली आम्हाला ", "अग माझ प्रोजेक्ट आहे", "माझी परीक्षा आहे ", " माझा आज over  time  होता "....... २५ हजार  किलो कारण असतात सर्वांकडे. थकत नाहीत कारण देता देता.

[break  : निरमा निरमा वॉशिंग पावडर निरमा... दुध सी सफेदी निरमा से लायी, रंगीन कपडा भी खिल खिल जाये..सबकी पसंद निरमा.]

माझ तर म्हणन आहे, कि खरच मनापासून एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्याला स्पर्श केला असेल, तर त्या व्यक्तीची आठवण काढल्याशिवाय राहवत नाही. आणि इच्छा तिथे मार्ग. पण इच्छाच नसेल तर मार्ग तरी कुठून येणार ? अरे माझ्या मित्र मैत्रीणीनो, घरामध्ये लोळत पडल्या पडल्याही तुम्ही तुमच्या मित्रांना वेळ देवू शकता. इच्छा पाहिजे फक्त.
मला मधूनच हिंदीची लहर येते. आणि जरा वेगळ्या भाषेमध्ये प्रण केल्यास त्याला जरा वजन येते, असा माझ्या मनाचा (गैर ) समज आहे. म्हणून यावेळी हिंदीमाढेच ठरवून टाकलं - "इस बार किसी को call  नाही करूंगी".
पण माझाच पोपट झाला आणि मग मी उडून गेले. (कृपया विनोद न कळल्यास डोक्याला त्रास करून घेवू नये.) कोणी म्हणजे कोणी म्हणजे कोणीच माझी साधी आठवणही काढली नाही. किवा माझ्यापर्यंत आलं नाही कि आठवण काढली आहे म्हणून.
फार फार राग आला ... पण करणार काय ?
मीसुद्धा एक साधं "Happy  Friendship  Day " असं status  facebook टाकलं होत, बस्स त्याला कोणी कोणी like केल होत. इतकच.
मगर मै इसका बदला लेके रहूंगी.



[अगले सप्ताह - देखते है कैसे बदला लेती ही ये दोस्त अपने करीबी दोस्तोंसे... इसीही जगह पर, इसीही ब्लॉग पर मिलते है अगले सप्ताह .. तब तक के लिये. शुक्रिया, अलविदा, शब्बा खैर, शुभ दिन/ रात्री, सायोनारा. C ya .. ]