Friday, August 17, 2012

गडबड गोंधळ

कधी कधी सहज सुंदर
नयन मनोहर

उगाच हुरहूर
अखंड बडबड
मनात काहूर
क्षणात भण भण
हसू मण मण

पाण्यात तरंग
आकाशाचे रंग
उशीत डोके
डोळ्यात झोप
झोपेत स्वप्न
स्वप्नात जग

येणे झपझप 
जाणे झर झर 
हाताशी हात
स्पर्शात बात
उरात धडधड 
डोक्यात पडझड

उगीच लोळणे 
मधूनच हसणे 
शून्यात जाणे

गर्दीत शांत
एकट्यात वाद

पंख्यात वारा
पावसात गारा
उषेचा सूर्य
चंद्राचा पसारा
उजळू पाहे 
आसमंत सारा

अजून काही
मनात बाही
ओठात नाही
नजरेत पाही
ओळखून घेई

घडी हाती
नाही म्हणता
रुसनेच बहुदा
गुस्सा नाही
रागाचा तोरा

अजून पुढे
क्षितिजाच्या इथे
धरती जिथे
मिळे आकाशाशी
हितगुज चाले
कधी न कळले
नाहीच उमगले
जवळच गवसले

पाण्याचा झरा
फुलांचा सडा
रांगोळी वेलीची
सळसळ पानांची

असाच एकांत 
पकडण्या चिमटीत 
प्रयत्नले.

अजून पुढे,
पडली गाठ
तरी न आठव
आसवांची
जिकडे प्रकाश
तोच माझा प्रांत 
कहाणी गडबडलेली 
जन्माची भ्रांत ...


Friday, August 10, 2012

डायरीच पान


(सन १९०२, वय १४ वर्षे,  पान नं. ७६ )
शेजारच्या काकू सांगतात कि मी इथे ७ वर्षाची असताना लग्न करून आले, तेव्हा खूपच खोडकर आणि सारखी खेळायला पळणारी होते, पण आता मी खूपच शांत झालीये. मला नाही वाटत कि मी शांत झालीये. अजूनपण मी मंगळागौरीला, पंचमीला खूप खेळते. खूप मज्जा येते पंचमीला आई कडे जायला. आज मी शंकरपाळे बनवले, आत्याबाईना आवडले आणि मला मस्त वाटलं. उद्या करंजी शिकणारे मी त्यांच्याकडून. ह्यानापण खूप आवडते करंजी. मोठ्या वाहिनी आणि मी यावर्षी पंढरपूरला जाणारेत. खूप मज्जा येईल. हे आले तर अजूनच मज्जा येईल. काल ह्यांना मी जेवायला वाढले तेव्हा त्यांच्याकडे पाहता पाहता मी आमटी ताटामधेच वाढली. मामंजींनी एकदम रागानेच पाहिलं माझ्याकडे. पण मज्जा आली यांच्याकडे पाहताना. उद्या सकाळी आत्याबाई नी द्यायच्या आधी मीच यांना चहा नेवून देणारे. चला आता झोपते पटकन.

(सन १९४२, वय १९ वर्षे, पान नं. १४९ )
आई आणि अण्णा खूपच काळजीत आहेत, लग्नच जमत नाहीये म्हणून. आई तर म्हणते आता कोणी विधुर किंवा मोठ्या वयाचा असेल तरी चालेल, पोरीला उजवून टाकली पाहिजे. पण मला काही चिंता नाहीये. शेजारच्या टेंभी सारखा फुकटा नवरा करून घेण्यापेक्षा असाच राहील तरी चालेल. म्हणजे मला चालेल, आई  अण्णांना नाही चालणार.
पण मला तर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी लढनाराच नवरा हवा, आई अण्णांना कस सांगू हे. एकदम तगडा, सतत कुठल्या ना कुठल्या चळवळीत मग्न असणारा, मी त्याच्या साथीने भाग घेईन या लढाई मध्ये. मला तर कधी एकदा त्या मोर्च्यामध्ये जाते असं होतंय. त्या पलीकडच्या आळीतल्या बायका नाही का जात त्यांच्या घराच्या पुरुष मंडळींसोबत. आमचे अण्णा म्हणजे मुळचेच घाबरट आहेत. मी एकदा हिम्मत करून विचारलं तर तेव्हापासून आई ने लग्नाचा चंगच बांधलाय. आता नक्कीच आत्त्याच्या मुलाशी, ज्याची एक बायको आधीच स्वर्गवासी झालीये, त्याच्याशी लग्न लावून देतील. एवढ वय झालाय म्हणून मला बाहेरही पडायची भीती.  अरे बापरे, अण्णा आले वाटत. चला झोपते नाहीतर काय लिहिते ते येवून बघतील.

(सन १९६२, वय १२ वर्षे, पान नं. ४३)
आज शकुच्या हळदीचा कार्यक्रम होता. किती छान दिसत होती ती. मीसुद्धा हट्ट धरला आई जवळ कि मलापण लग्न करायचं. तर भाऊ हसायलाच लागले, मला म्हणाले, "सुमे, तुला रमाबाई सारख डॉक्टर व्हायचं. इतक्यात लग्न नाही. अजून उशीर आहे. " पण गाव सोडून इकडे आल्यानंतर फक्त शकूच ती काय माझी मैत्रीण होती. आता तीपण लग्न करून जाणार म्हणजे मी एकटीच पडणार. गावी कित्ती कित्ती मज्जा यायची. इथे या शहरात तसे काहीच नाही. 
आणि आई काय म्हणाली माहितीये, "सुमन तुला लग्न म्हणजे काय ते तरी कळत का? आणि तू लहान आहेस अजून." ती कधी शाळेत नाही गेली, मग माझ्या का मागे लागते शाळेत जा म्हणून. आणि तिला काय माहिती, मला माहितीये लग्न म्हणजे काय ते. गावी असताना भाऊ कसे आई साठी शेतातून येताना गुपचूप मोरपीस घेवून यायचे. मेहंदीच्या झाडाची पान घेवून यायचे, आईला मेहंदी खूप आवडते म्हणून. मग आई ती पान वाटून कुटून त्याची नागमोडी नक्षी तिच्या आणि आम्हा सर्वांच्या हातावर रंगवत असे पंचमीला. आई आणि भाऊ, दर वर्षी गावाच्या जत्रेत दोघंच मिळून जायचे. आम्हा पोरांना घरीच ठेवून. आणि आई सुद्धा आज्जीने कितीही रागवल तरी जायची. खंडोबाला जेव्हा भाऊ जायचे तेव्हा आई एकदा खूप आजारी होती तरीसुद्धा तेव्हा तिने फराळ बनवून दिला होता भाऊ सोबत. मग असं आई आणि भाऊ सारख राहाण, फिरणं, सोबत करणं, एकमेकांच्या आवडी निवडी जपण म्हणजेच लग्न ना. आता शकीला पण तिचा नवरा गुपचूप बाहेरून वडापाव आणून देईल. आणि तीच आणि माझ वय तर सारखंच आहे. तरी म्हणे कि मी लहान आहे. नाही मला लग्न करायचंच आहे.

(सन १९८२, वय २०, पान नं. ३११)
आज तो दिसला नाही कोलेज मध्ये. मन लगेच अस्वस्थ होत, तो नाही दिसला तर. कुठेतरी कादंबरीमध्ये हे असं झाल कि याला प्रेम म्हणतात, असं वाचलंय. पण छे, मला नाही वाटत. कदाचित मला सवय लागलीये त्याला रोज पहायची, दिसला नाहीतर शोधायची. एकदा तो दिसला कि कस शांत शांत वाटत. कधीतरी वाटत कि त्याने येवून बोलाव, मी त्याला माझ्या नोट्स द्याव्यात. सोबत अभ्यास करावा. त्याच्यासोबत केला तर किती अभ्यास होईल नाही माझा, उगाच लायब्ररी मध्ये त्याला शोधायचा वेळ तरी वाचेल. खरच यालाच प्रेम म्हणतात का? पण काय उपयोग ! जर हे प्रेम असेल तर त्यालापण माझ्याबद्दल असं काहीतरी वाटलं पाहिजे तर मज्जा आहे. नाहीतर एकाच बाजूने काही उपयोग नाही. अरे मी विसरलेच, कि मला कळणार कस कि त्याला पण मी आवडते का ते. मी त्याच्याशी असं काही जावून विचारू शकत नाही. आणि जरी काही त्याला वाटत असलं तरी आमचे पिताश्री, आजोबा, काका, आत्या, मातोश्री या सर्व मिळून मला आणि त्याला सुळावरच चढवतील. बरंय, हे असाच छान आहे. त्याला रोज रोज शोधण. यातपण मज्जा येते. 


(सन २००१, वय २४, पान नं. ६३४)
आता घरी लग्नाचे विषय सुरु झालेत. डिग्री झालीये, जॉब शोधत आहे. पण घरी अजून अनुजबद्दल बोलले नाही. एकदा त्याला जॉब मिळू देत मग बोलेन. असे दिवस उडून गेले ते कळलहि नाही. आत्ता परवा तर अनुजची आणि माझी भेट झाली होती. 
मला असं वाटायचं कि, हात हातात पकडून कधीच न सोडून जाणारा जीवन साथी हवा. अखंड सोबत करणारा. जो फक्त असं नाही म्हणणार, "हे बघ, हा रस्ता आहे यावरून तुला चालायचं आहे." पण तो अखंडपणे त्या रस्त्यावर माझ्यासोबत चालत राहील. मी कुठे अडखळले तर मला सावरून घेईल. त्याच्या आणि माझ्या वाटा एक आहेत असं कोणीतरी पाहिजे होत मला. हवेवर माझे केस उडताना माझा चेहरा झाकून टाकतील, मी पुन पुनः केसांच्या बटा कानाच्या मागे करेन आणि तरीही वारा हट्टाने परत केसांची उलथापालथ करेल. आणि असं वाऱ्याशी झगडताना त्याने माझ्याकडे एकटक पाहत राहावं. मी दिलेल्या पत्राचे दिवसातून चार वेळा पठण करणारा, मला रोज पाहिल्याशिवाय त्याचा दिवस सुरूच झाला नाही असं मानणारा.  मी जेव्हा त्याच्यासाठी कर्वा चौथ च व्रत पकडेन तेव्हा ऑफिस वरून धवत पळत माझ्यासाठी घरी लवकर येणारा. मी रुसले, आणि जेवले नाही तर तोही न जेवणारा. एकमेकांकडे तासनतास पाहण्यात किती मज्जा येते नाही.
त्या सर्व गोष्टी माझ्यासोबत उत्साहाने करणारा ज्या मला करायच्या होत्या पण मी आजपर्यंत केल्या नाहीत- कारण माझी आई म्हणायची कि जे करायचं ते नवऱ्याच्या घरी जावून करायचं, म्हणून मी इतकी वाट पाहिलेली त्या सर्व गोष्टी करण्याची.
माझ्यासोबत मस्ती घालणारा. आयुष्य एक जगायची गोष्ट समजणारा, ना कि रेटायची. 
जो त्याची प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करणारा. त्याच्या सुखाचा आणि दुखाचा खरोखर भागीदार मला म्हणणारा. 
असं कोणीतरी, कि ज्याच्यासोबत मलाही रहावस वाटावं. असं कोणीतरी हव होत कि ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा. त्याने प्राण जरी मागितला तरी मी तयार होईल, असा कोणीतरी. ज्याच्यासाठी मला माझ सर्वस्व विसरून त्याच्यात विलीन होण्यात दुख किंवा परोपकार वाटू नये, तर आनंद व्हावा असा. ज्याची स्वप्न पूर्ण करण्यात मला हातभार लावायचा होता, आणि त्याची स्वप्न पूर्ण होताना मला त्याला हसताना पाहायचं होत, असा कोणीतरी. 
रात्री १ वाजता मला बाहेर बाईक वर फिरायला घेवून जाणारा, थोडक्यात आयुष्य फुल्टू जगणारा. आयुष्यातले छोटे छोटे आनंद जगण्यासाठी सदैव तयार असणारा, ना कि विकेंड ला घरी घोरत पडणारा. मला त्याची जिवाभावाची मैत्रीण बनवणारा. असा कोणीतरी.

आणि तो अनुज भेटला. अगदी तसाच, किंवा याच्या दोन पावलं पुढेच. 
घरून लग्नाला विरोध होणार हे माहितीये मला. पण मी तयार आहे. सगळ्यांना पटवून दाखवेन कि अनुजच तो आहे ज्यासोबत मी लग्न केल पाहिजे. आई - पप्पांना पण पटेल हे आणि ते नाकी हसत हसत मला परवानगी देतील.

(सन २०१२, वय २७ वर्षे, पान नं. ३४)
आज परत ब्रेक अप झाल. last time प्रतोत सोबत, त्या आधी विजय. आणि आता राहुल सोबत पण. साले सर्वाना फक्त कीस पाहिजे असत. पण, यांच्यापैकी कोणी तरी त्या लायकीच तरी होत का. Now enough is enough . इथून पुढे मी डेटिंग करणारच नाही. आणि आरे लग्न करायचं आहे मला, ते काही फक्त शरीर सुखासाठी नाही. ते तर माझ्या boyfriend कडून पण मला मिळू शकलं असत. मला नवरा हवाय. जो आयुष्यभराचा वादा करेल. ज्याच्यासोबत मला माझ यश-अपयश सुखानं वाटायचं आहे. मी bold आहे, याचा अर्थ असा नव्हे कि माझ्यासोबत काहीही चालत. मी पण एक मुलगीच आहे. मलाही कुठेतरी जावून स्थिर वायचं आहे. I agree , कि मी काही perfect नाहीये. आणि मला Mr Perfect नकोय पण. पण जो माझ्यावर मनापासून प्रेम करेल, आणि मीसुद्धा ज्याच्यावर. खूप प्रेम करेल असा मुलगा हवाय. मिळेल का मला असा मुलगा ? 

विजय ने मला डिच केल ना तेव्हाच मी ठरवलं होत कि आता no boyfriends . पण मग मम्मा मागे लागली, आता लग्न कर म्हणून. मग तो प्रतोत. तो मॉम च्या मैत्रिणीचा मुलगा. तोही तसलाच. and Rahul was height of all this bloody shit . मला आता लग्नच करायचं नाही. 
खरच मम्माचा time किती चांगला होता, atleast विश्वास तरी ठेवण्यासारखी लोक होती तेव्हा. पण आता. no hopes at all ...

-----------------------------------

(सन २०१२, वय ७३ वर्षे, डायरी नं. ४ किंवा ५, पान नं. २१०)

खरच आयुष्याची उजळणी करताना आता जाणवतंय कि सुखाचे क्षण कोणते असतात ते. आपल्या जोडीदाराचा शोध हा कोणताही मोठा जॉब मिळवण्यापेक्षा आणि कॅरिअर पेक्षा किती महत्वाचा असतो ते समजतंय.
लग्नानंतर दोन वेग-वेगळे जीवन जगणारी लोक एकत्र येतात कशी, आणि एकमेकांचे होवून जातात कशी हे जेव्हा या अशा उतार वयात समजत नाही तेव्हा त्या लग्नांना यशस्वी लग्न म्हणता येईल. आणि आत्ताच प्रेम म्हणजे काय हे उमगेल. आत्ता लक्षात राहतात ते फक्त पहिल्या वहिल्या हातात हात घेतल्याचे स्पर्श. पहिल्यांदा ओठांनी ओठांशी केलेल्या सलगीचे स्पर्श कुठे स्मरणात पण राहत नाहीत. 
थोडक्यात शरीराची गरज एका वयापुरती असते. पण मनाच्या सोबतीची गरज हि निरंतर असते. त्या उपभोगाचा मागमूसही आता आपल्या गावी नसतो. आठवतो तो फक्त प्रेमाचा स्पर्श - कधी आठवतो तो नवीन लग्न झाल्यानंतर नवऱ्याचे आपले फोटो काढण्याचे वेड, तर कधी त्या मंडपातून आई वडिलांना सोडताना वाहत असलेल्या अश्रुना पुसलेला हात, कधी गर्दीमध्ये चुकामुक होऊ नये म्हणून एकमेकांचा घटत पकडलेला हात. बसमध्ये तिच्या खांद्यावर ठेवलेलं डोक आणि त्या निवांत झोपेचा क्षण. कधीतरी स्वताच्याशी नकळत जोडीदाराच्या आवडीच्या केलेल्या गोष्टी. ती समुद्र किनारी चंद्राला पाहत गप्पा मारत घालवलेली रात्र. 

खरच, आज मला यांच्या अशाच कितीतरी गोष्टी आठवत राहिल्या, ज्या कदाचित मी इथे या डायरीच्या पानावर शब्दामध्ये मांडू शकणार नाही. आणि खरच मी खूप आभारी असेल त्या देवाची, त्या विधात्याची ज्याने माझ्या आयुष्यामध्ये असे क्षण लिहून ठेवले. आणि माझ्या या जोडीदाराची ज्याने माझी अखंड सोबत केली, आणि अजून करत आहे. मी खूप सुखी आहे. 
आज खूपच छान वाटत होत. आणि जेव्हा त्यांनी नोकराकडून चहा मागवला, तेव्हा अगदीच क्वचित व्हीलचेअर वरून काम करणाऱ्या माझ्या शरीराने ठरवलं कि 'आज अपने यार के लिये एक अद्रक वाली चाय तो बनती है - उसके प्यार के लिये एक बडिया चाय उसके पसंद वाली.'     


Tuesday, August 7, 2012

चांदणं - ८


"मराठी पुस्तक प्रदर्शन आणि संमेलन - नवोदित लेखक आणि लेखिकेंसाठी. "
जान्हवी pamplet वरची जाहिरात मोठ्याने वाचून दाखवत असते.
"ए आपण जायचं का? शनिवारी आहे. पण आदी तुला सुट्टी घ्यायला जमेल का? कारण तू नवीन जॉईन झालास ना."
"खर तर नाही जमणार मला आता. ट्रेनिंग आहे ना त्यात अजून. सुट्टी घेण म्हणजे आपल्या पायावर दगड मारून घेण. आणि आई येणारे या शुक्रवारी. चार पाच दिवस असेल ती. मग नाहीच जमणार. काय वेळ काय आहे प्रदर्शनाची ?"
"जावूदेत ना तुला जमणार नाही तर कशाला हवीये वेळ. सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आहे. मी हाफ डे घेवून २.३० वाजता जाईन. तुला कोणता पुस्तक हव असेल तर सांग घेवून येते. " 
"अग नको, सध्या वेळच नाही वाचायला. तू ये जावून."
(जान्हवी स्वागत - 'जस काही जॉब यालाच लागलाय आणि जगामध्ये हा एकटाच जॉब करतो. आई येणारे तर साध घरी पण बोलावलं नाही. जावूदे. मीपण बघ तुला दाखवते कशी बिझी असते ते.')
.........

"हेलो जानु, अगं आज प्रदर्शन आहे ना? तू जातीयेस ना? "
"हो मी पोचालीये तिकडेच. का रे? "
"अग मला एक पुस्तक हवाय, तुला तिथे सापडलं तर पाहशील का?"
जान्हवी प्रदर्शनाच्या दाराकडे चालता चालता विचारते - "कोणत पुस्तक?"
"आम्ही दारात उभे आहोत तुमच्या स्वागतासाठी "
"हे कसले पुस्तक?"
"अगं कवितेच पुस्तक आहे. बघ सापडताय का ते."
आणि फोन वर बोलता बोलता ती एका माणसाला जोरात धडकते. सॉरी म्हणायला ती वर बघते तर - आदित्य साहेब.
ती एक क्षण आश्चर्याने तर दुसर्या क्षणी रागाने बघू लागते. 
"अच्चा हे आहे का तुझ पुस्तक."
प्रदर्शनामध्ये भूश्या, अडीच बी.कॉम. चा मित्र भेटतो. कॉलेजनंतर इतक्या दिवसानंतर आदीच्या आणि भूश्याच्या खूप गप्पा रंगतात. त्या पुरुशोत्तामच्या नाटकाची, त्या कवितेची आणि जान्हवीची ओळख या सर्व गप्पा होतात. जान्हविचीही ओळख होते भूषण सोबत. 
"मग आदि पुढचे प्लान आहेत काय तुम्हा दोघांचे ?"
आदी आणि जानु एकमेकांकडे पाहून नुसते हसतात. 

प्रदर्शनातून जानूच्या स्कुटी वरून दोघ घरी यायला निघतात. जानु गाडी चालवत असते, तिचे केस वाऱ्यावर भुरभुरत आदीच्या चेहऱ्यावर गुदगुली करत असतात. आणि असे क्षण आदिला जगातल्या सर्वांत सुखाच्या क्षणांसारखे वाटत. तो स्वताशीच मंद मंद हसत असतो. जानुची मात्र अखंड बडबड सुरु होती. आदीच मात्र त्याकडे अजिबात लक्ष नव्हत, त्याच्या कानावर तिचे शब्द पडत होते आणि चेहऱ्यावर वाऱ्याच्या तालावर ताल धरणारे केस,  मधूनच तिची ओढणी. तेवढ्यात ती विचारते, "तुझी मम्मी कधी पर्यंत आहे घरी?" आणि आदीच लक्ष नसल्यामुळे तो काहीच बोलत नाही. ती परत तोच प्रश्न विचारते पण त्याला लक्षातच येत नाही. तो असाच गाल्यातल्या गालात हसत असतो. ती गाडीच्या आरश्यामध्ये त्याला हसताना पाहते आणि जाम भडकते. त्याला गाडी चालवत असतानाच जोरात चिमटा काढून विचारते कि का हसतोस म्हणून. मग आदिला लक्षात येत कि ती काहीतरी विचारात होती. पण आता वेळ निघून गेलेली असते, कारण जानु काही शांत होणार नाही हे त्याला लक्षात येत. मग तो तिच्यासाठी काही ओळी गुणगुणतो -

तुझ्या चिडण्याचे प्रकार निराळे,
प्रेमाचीही तीच गम्मत,
केसांच्या बटामध्ये गुंतून जावे,
अन बोलण्यातले लक्ष थिजावे..
क्षणो-क्षणी का भिरभिरते मन माझ माझे - अर्थ काही उमगले नाही...   
ओढ कशी लागली तुझी मजला कळले नाही,
खंत आता हीच फक्त कि तू जवळ नाहीस,
उगाच काहूर का माजे सांजवेळी,
समोर तू असूनही कासावीस मन माझे - कारण मात्र समजले नाही..

त्याच शेवटच वाक्य संपत आणि ती खळखळून हसायला लागते. "बाकी काही म्हण हा तू आदी, तुझी हीच अदा आपल्याला जाम आवडते."
"ए , अदा हि मुलीना असते. मुलांना style असते. हे अदा बिदा असलं मला म्हणायचं नाही." 

चांदणं - ७



"हे बर आहे, आमच्या जोरावर तुम्ही पुस्तक पण छापायला लागलात, हं ??" स्टेज वर चढता चढताच गर्दीतून मागून कोणीतरी आदित्य ला हटकल  होत. तो मागे वळून त्या गोंगाटातून येणाऱ्या ओळखीच्या आवाजाच्या दिशेने पाहतो तर जान्हवी होती मागे. तेवढ्यात गर्दीतून धक्काबुक्की करत प्रेस वाले लोक आले, आदित्य स्टेजवर गेला. त्याच्या पहिल्या कवितेच्या पुस्तकाला पुरस्कार भेटला होता. पुरस्कार घेवून, आणि आभाराचे दोन शब्द बोलून तो लागलीच खाली आला. स्टेजच्या मागे जान्हवी त्याची वाट पाहत होती. तो येताच तिने तिच्या पर्स मधून एक गुलाबाचे फुल आणि एक ग्रीटिंग कार्ड काढले. "अभिनंदन आदी."
"काय हे जानु, तू पण ना. पण तू तर अजिबात येणार नव्हतीस ना. मग कशी आलीस? मी इतका वाईट आहे कि तू इतकी चिडलीस आणि इथे माझ्यासाठी येण्यास नकार पण दिलास. मग अशी कशी उगवलीस?"
"तू गप्प बैस आता. मी येणार नाही असं कस होईल. बर हे घे तुझ्यासाठी आणलंय." 
आदित्य फुल घेतो. "thanks ".
पुरस्कार सोहळा संपताच दोघे सोबतच निघतात.
"खर तर आज सेलिब्रेशन पाहिजे. चल आपण पाणीपुरी खावूयात. "
"ओ बाईसाहेब, तुमच्या दहाव्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला तरी पार्टी दिली नव्हती तुम्ही आणि आता माझ्या पहिल्याच पुस्तकाला पुरस्कार मिळाला आर लग्गेच त्या पुस्तकच क्रेडीट पण तुम्हालाच आणि वरून पार्टी पण तुम्हालाच. हे चांगल आहे."
"खरच .. मला खर वाटत नाहीये. त्यादिवशी आपण पावसात भेटलो नसतो आणि तुला त्या दिवशी एखादा जोब भेटला असता तर आपण असे भेटत राहिलो नसतो. ना मी माझी पुस्तक लिहायची हौस पुढे नेली नसती ना आज माझे इतके सारे पुस्तक प्रकाशित झाले असते." जान्हवी एकदम भूतकाळात मग्न होते...
तेवढ्यात आदित्य तिची तंद्री तोडत म्हणतो,"आणि ना आज माझ्या कवितेच्या नायिकेला घेवून मी इथे पाणीपुरी खाल्ली नसती."
"खरच जानु , तुला पाहिलं ना कि मला कविता सुचू लागते. हे अगदी पहिल्यापासूनच आहे पण मला खूप उशिरा कळलं कि माझ्या कवितेचा उगम तुझ्यामध्ये आहे ते. खरच माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर. "
"खूप म्हणजे किती?"
"खूप म्हणजे ... म्हणजे २५ किलो. २५००००० किलो.. "
दोघेही हसू लागतात.
"ए आपण आभाला खूप दिवसात भेटलो नाही बघ. या सुट्टीच्या दिवशी आपण पक्का भेटूयात हं."
"अगं आत्ताच नाही जमायचं, आता माझी परीक्षा पण आहे दोन आठवड्यावर. असं करूयात माझी परीक्षा झाली कि आपण सर्वांनाच भेटूयात. छान प्लान करू. अगस्तीपण येतोय दीड वर्षानंतर ओस्ट्रेलिया तून. आपण संजूला फोने करून बोलवून घेवू. श्रेयू तर आहेच इथे. ती येईल. आभाशी तू बोलून घे ."
"ओके ."
.......
"हेलो, काकू आभा आहे का? "
"अग ती बाहेर गेलीये. तू ?"
"काकू मी जान्हवी बोलतेय. आभाला सांगा या रविवारी सर्वांनी भेटायचा प्लान केलाय ते. आणि तिला फोन पण करायला सांगा."
"ठीक आहे. सांगेन तिला. ठेवते."

"हेलो .."
"बोला जान्हवी madam , मग फिक्स झाला का वेन्यु? कुठे जमायचं ?"
"अग हो हो... तू तर लगेच सुरु होतेस. श्रेयू मला सांग तुला रविवारी तर सुट्टी असतेच, पण यावेळी सोमवारी-मंगळवारी पण सुट्टी घे. ३ दिवस आपण धम्माल करणार आहोत. संजू बाबा आलाय कालच."
"काय्य्य .. संज्या आला? आणि मला सल्याने एकपण फोन नाही केला. चंपक. थांब मी त्याला फोन लावते."
"अग अग, चिडू नकोस. त्याच्या आई पप्पा सोबत तो मुलगी पाहायला जाणार होता आज. म्हणून त्याने तुला फोन केला नसेल ग. आणि त्याच आणि माझ पण बोलन नाही झालाय. ते तर मी त्याच्या फेसबुक वर स्टेटस पाहिलं. म्हणून सगतीये. आणि मुलगी पाहायचं मला आदित्य बोलला. कदाचित आदीच आणि त्याच बोलन झालाय. चिल. तो भेटणारे ना तेव्हा त्याची खेच हवी तेवढी."
"हो तुला बर इतका पुळका आलाय त्या संजूचा. पण वेट वेट ... संजय कर्वा आणि मुलगी पाहायला ?? अरेरे अडकला बिचारा. हा हा हा हा."
"तू हसू नकोस. हे मारवाडी लोकांमध्ये मुलगा-मुलगी भेद नाही करत. दोघांची लग्न लवकर करून टाकतात. हे हे. पण खरच संजू अडकला बिचारा. "
"ए जानु, बर तुझ आणि आभाच बोलन झाल का? ती येतीये ना ? "
"हो. म्हणजे आधी तिच्या मम्मी सोबत झाल होत बोलन पण नंतर तिने फोन केला होता. तीपण येतीये."
"आभा तर एकदम हिरोईन झाली आता. तीच काय बाबा.."
"श्रेयू , बस झाल बर का आता. किती खेचनारेस सर्वांची. बर चल मी ठेवते फोन नाहीतर तू काही थांबणार नाहीस. "

गुरुवारी सकाळी अगस्ती ओस्ट्रेलिया तून निघतो ते शुक्रवारी पोचतो. शनिवारी संध्याकाळी सर्व जन दिवे आगार ला जायला निघतात. सुमो मध्ये नुसता सर्वांचा धिंगाणा चाललेला असतो. आदी आणि अगस्ती दोघ सुरात सूर मिळवून संजूच्या मुलगी पहायच्या प्रोग्राम ची बातमी विस्तृत पाने सर्वांसमोर मांडत असतात. आणि बाकी सर्व त्याला चिडवण्यात कमी सोडत नसतात. ३ दिवस भरपूर मज्जा करून सर्व जन परत येतात.
अगस्तीच पी.एच.डी. च सबमिशन झालेलं असत. त्यामुळे त्याला आता रिझल्ट ची वाट पाहण्यात दिवस घालवायचे असतात. बाकी आभा आपल्या शुटींग मध्ये बिझी होवून जाते. जान्हवी पण तिच्या जॉब, प्रोजेक्ट आणि पुस्तक लेखनामध्ये. संजू दिल्ली ला निघून जातो. श्रेयू मात्र बर्यापैकी रिकामी असते. ऑफिस सुटल कि ती, अगस्ती, आणि आदित्य भटकत असतात. 

आदित्यचा पण रिझल्ट लागतो, तो यावेळी सी.ए. च्या सर्व परीक्षा पास होतो.  आणि त्याला मोठ्या कंपनीतून ऑफर येते. तो तिथे जॉईन होतो तसा श्रेयू आणि अगस्तीच भटकायला उरतात.




Wednesday, June 20, 2012

दारू देसी

सायकल वरून उतरून ती सायकल हातामध्ये पकडून गेटमधून आत आली. उडणारी ओढणी हळूच तिने सावरली. सायकल ला लॉक करून ती तिच्या कॉलेजच्या बिल्डींग च्या दिशेने चालू लागली. तो भला मोठा कॉलेजचा  पसारा पाहून तीच मन खूप खुश झाल. त्या बिल्डींग ची मोठी लाईन ती एक क्षण थांबून पाहू लागली. तिने तिचे डोळे झाकले.
कोलेजला जायच्या आदल्या दिवशी जी खूप सारी शोप्पिंग केली होती त्यातून एक फाडू टोप आणि स्कर्ट तिने  काढला. हातामध्ये मेटल, प्लास्टिक, फायबर च्या मिक्स केलेल्या रावडी बांगड्या, एकाच हातामध्ये. आणि दुसर्या हातामध्ये एक मोठ्ठ फ्रेन्डशिप band . तिच्या त्या बाईक वरून ऐटीत उतरून तिच्या कोलेजच्या बिल्डींग कडे ती जावू लागली. पहिल्याच दिवशी तिचा फक्कड ग्रुप जमला. खूप सारे गेम्स खेळले, प्रोग्राम ला डान्स केले. इवेन्ट्स लीड केले. चार वर्ष फुल धमाल करून भरपूर अभ्यासही तिने केला. कोलेजच्या शेवटच्या वर्षी तिला मस्तपैकी जॉबसुद्धा मिळाला. आणि तीच मन खूप खुश झाल. आणि तिने पटकन डोळे उघडले. ओढणी सावरत ती कोलेजच्या पायऱ्या चढू लागली.

कोलेज संपल, रिझल्ट लागला ; कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षी खूप तयारी करूनही तिला जॉब मिळाला नाही तसा तिचा कोलेज संपल्यावर जॉबसाठी शोध सुरु झाला. त्या दिवशी ती पहिल्या interview ला त्या काचेच्या आवरनातल्या बिल्डींगमध्ये गेली होती. काचेच्या लिफ्ट मधून सातव्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये जाताना तिला खालचे  लोक, साफसफाई करणाऱ्या बायका दिसू लागल्या. तिला खूप गम्मत वाटली. आता रोज आपल्याला या काचेच्या लिफ्ट मधून यायला भेटणार म्हणून ती खूप खुश झाली. interview झाला. ती ऑफिसच्या लॉबी मध्ये येवून रिझल्टची वाट पाहत बसली. तिथे बसल्या बसल्या तिला ऑफिसमध्ये येत-जात असलेले एम्प्लोयी दिसले. त्यांच्या गळ्यामध्ये ऑफिसचा आय डी कार्ड अडकवलेला होता. त्या ओफिसाच दार ती सर्व लोकं त्या गळ्यातल्या कार्ड नेच उघडत होती. आता तिला तिच्या रिझल्टच टेन्शनच येत होत. तेवढ्यात ओफिस्माढले सर आले आणि तिथे आलेल्या सर्वांचे रिझल्ट त्याने सांगितले. ती जड पावलाने तिथून निघाली. 
चार सहा महिने ती अशीच सगळीकडे interview साठी फिरत होती. त्या दिवशीसुद्धा ती अशीच एका छोट्याशा कंपनीमध्ये interview साठी गेली होती. टेस्ट झाली आणि त्या कंपनीच्या लॉबी मध्ये ती रिझल्ट ची वाट पाहत बसली होती. टेन्शन ने तीच मन खूप जड झाल्या सारख वाटत होत. तिथे समोरच कृष्णाची मूर्ती होती, त्या मूर्तीकडे पाहून डोळे झाकले.
ती त्या ब्लेझर मध्ये खूपच मस्त वाटत होती. भराभर पायऱ्या चढून तिने दुसरा मजला गाठला. जेवढी ती बाहेरून मस्त वाटत होती तेवढाच तिला आतूनपण खूप मस्त मस्त वाटत होत. ऑफिसमध्ये जायच्या आधी ती वॉशरूम मध्ये गेली, तिच्या पर्स मधून तिने परफ्युम काढाल आणि मस्त पैकी मारलं. थोडस पावडर लावून ती बाहेर आली. गळ्यातल्या आय डी कार्ड ने तिने ऑफिस च दार उघडल. ती आत गेली आणि सर्वाना गुड मोर्निंग म्हणत आपल्या क्युबिकल मध्ये जावून बसली. फायलींचा पसारा आणि भरपूर काम यात तिला वेळेच भानही राहील नाही. आज तिला जॉब मिळून एक महिना झाला होता आणि तिचा पगार होणार होता. ऑफिस वरून येताना ती जवळच्याच मॉल मध्ये गेली. पप्पांना वॉच, मम्मी ला साडी, बहिणीला ड्रेस, शेजारच्यांना वाटायला स्वीट्स, मित्र-मैत्रीणीना एक एक डेरी मिल्क अशी पहिल्या पगारातली शोप्पिंग करून घरी आली. घरी आईने पहिला पेढा देवापुढे ठेवून नमस्कार करायला सांगितला. तिने देवासमोर दिवा लावला, पेढा ठेवला आणि हा संपन्न दिवस दाखवला म्हणून देवाला आभार मानण्यासाठी डोळे झाकले. 
प्रार्थना करून तिने डोळे उघडले. तिला आता जरा हलक हलक वाटू लागल. घड्याळात तिने पाहिलं तर दीड तास वगैरे होवून गेला होता. अजून कोणीच रिझल्ट बद्दल काही सांगत नव्हत. पण टेन्शन ने जड झालेलं तीच मन आता बरच हलक झाल होत.     

तिला आज पाहायला येणार होते. ती तयार होत होती, तिची एक मैत्रीण तिला मेक-अप करून देत होती. आय लायनर लावून घ्यायला तिने डोळे झाकले.
बाहेर मुलगा, त्याचे आई वडील, भावू ,काका, काकू, आत्या सर्व जन आले होते. चहा पाणी झाल्यावर तिला बाहेर बोलावले. थोडे फार प्रश्न झाले, मुलाच्या आई ने तिला जवळ बसवून घेतले. अगदी अनौपचारिक पणे तिच्याशी बोलताना एकदम मुलाच्या आई म्हणाली, " ए तुला पिक्चर पाहायला आवडत का?" ती एकदम शॉक झाली. पण त्यानंतर तिची आणि त्या मुलाच्या आईची गट्टी जमली. तिने हळूच मुलाकडे पाहिले तर तोही तिच्याकडे पाहत होता. तिने गोड हसून प्रतिसाद दिला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी "killing smile " अस तिला सांगून गेले. तीच मन सुखावलं.
 जाता जाता त्या मुलाच्या आई ने तिचा फोन नंबर घेतला आणि म्हणाली, "लग्न जमल नाही तरी आपण दोघी पिक्चर पाहायला सोबत जावू बर का." आणि सर्व घर हास्य कल्लोळाने भरून गेल. तेवढ्यात तिची मैत्रीण म्हणाली, "डोळे उघड आता, झाल लावून आय लायनर." तिने डोळे उघडले. ती तयार झाली. तेवढ्यात तिच्या बहिणीने येवून सांगितलं कि पाहुणे आले.
तिला अनुरूप वर पाहून मम्मी-पप्पानी लग्न ठरवलं. तिचा लग्नाचा दिवस उजाडला. सगळीकडे गडबड होती, त्या गडबडीत ती बुजून गेली होती. तिच्या मैत्रिणींची तिला आठवण येत होती. हातावरची मेहंदी तिने एकटीनेच एन्जोय केली होती. तिच्या मैत्रीणीना जॉब मुळे येता आलं नव्हत, कोणाला सुट्टी मिळाली नव्हती. नाही म्हणायला दोघीजणी अक्षतेच्या वेळी आल्या होत्या. लग्न लागल. जेवताना नवरदेवाने भरवला तेवढाच घास तिच्या पोटात गेला होता. विदाई च्या वेळी ती जेव्हा आई ला भेटायला आली तेव्हा आई आत्त्याला आहेर करत होती. ती तशीच उभी राहिली तिथे. पण ती पारदर्शक असल्याप्रमाणे त्या रूम मधले सर्व वावरत होते. तिच्या बहिणी पण लांब बसून होत्या. तीला अजूनच दाटून आल. तिने तसाच सर्वांचा निरोप घेतला. गाडीतून तिच्या आयुष्याच्या साथीदाराबरोबर जाताना ती खूप रडत होती. आणि कशासाठी हेच तिला कळत नव्हत. नवीन घरात प्रवेश केल्यावर लक्ष्मी पूजन वगैरे आटोपून ती तिच्यासाठी असलेल्या खोलीमध्ये गेली तिच्या करवलीसोबत. गादीवर पडल्यावर तिने डोळे झाकले. दुसऱ्यादिवशी संध्याकाळी तिचा नवरा आणि ती दोघे फिरायला गेले. तेव्हाच मम्मी पप्पांचा फोन आला, त्यांना त्यांच्या लाडकीची आठवण येत होती. त्यांनी तिला २ मि. येवून भेटून जाण्याची विनंती केली पण तिच्या नवऱ्याने ते मान्य केले नाही. तिने उदासवाणे तिचे डोळे मिटून घेतले.
लग्नाचा दिवस उजाडला. तिच्या मैत्रिणी, तिची लाडली बहिण, आत्या मामा सर्व जन जमले होते. हळदीचा डाग तिच्या आवडत्या रूमलाला लागला म्हणून तिला वाईट वाटत होत. तिच्या नवऱ्याने तिच्याकडे आणि रुमालाकडे पाहून हळूच स्वताचा पांढरा शुभ्र रुमाल तिच्या हाती टिकवला.तिच्या मैत्रिणी जॉब मधून अगदी चार दिवस सुट्टी काढून आल्या होत्या, ती सगळ्यांसाठी खूप खास अशी होती ना. मेहंदीच्या दिवशी तिच्या मैत्रिणी तिला इतक्या चिडवत होत्या. ती लाजून चूर होत होती. सर्व जणींनी डान्स केला, तिनेही नंतर डान्स केला. तिची आई अगदी कौतुकाने लेकीकडे बघत होती. मेक अप साठी पार्लर मध्ये गेली होती तेव्हा तिच्या नवरोबाचा सारखा फोन येत होता. आणि तिच्या मैत्रीणीना अजून चेव चढत होता. 
नटून थटून नवरी पाटावर चढली. अंतरपाट पडला, तिने गोड हसून नवरोबाला हार घातला आणि आणि त्याने तिला. तिच्या जीवनाची गोड सुरुवात झाली होती. जेवताना तिच्या नवऱ्याने कौतुकाने पूर्ण ताट संपेपर्यंत खावू घातलं आणि तिनेही त्याला खावू घातलं. सर्व विधी आटोपले, निरोपाची वेळ जवळ आली. तिच्या आई ने तीच सुवासिनिच रूप डोळे भरून पाहून घेतलं. आनंदान पण अश्रू भरल्या डोळ्यांनी सर्वांनी तिचा निरोप घेतला. नवरोबासोबत सासरी जाताना ती जेव्हा रडत होती, तेव्हा तीच हात तो अखंडपणे आपल्या हातात घेवून थोपटत होता. जणू काही त्याला म्हण्याचाय कि सखे हे तुझे अखेरचे अश्रू असतील, इथून पुढे तुझ्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त हसू असेल, सदाफुलीच हसू.तिने तिच्या नवीन घरात वाजत गाजतच प्रवेश केला. लक्ष्मी पूजन होवून ती तिच्या करवलीसोबत खोलीत आराम करण्यासाठी गेली. तेवढ्यात तिचा नवरोबा तिची कृष्णाची मूर्ती घेवून हजर झाला. तिला त्या मूर्तीकडे पाहून खूप बर वाटल. ती त्या मूर्तीसमोर नतमस्तक झाली आणि डोळे उघडले तेव्हा ती गाडीत होती नवऱ्यासोबत. ती आणि तिचा नवरा फिरून घरी गेले.  
क्रमशः 

Sunday, June 10, 2012

कृष्ण उवाच



"ती पुनः भेटली मला. वर्षानु वर्षांपूर्वी ती मला मीरा म्हणून भेटली होती. आणि त्याही आधी युगांपूर्वी राधा म्हणून. आणि आता ती वेडी पुनः भेटली. राधे इतकी आतुर नक्कीच नाही, ना मीरेइतकी थोरही नाही ती. पण तीच गोड हसू मात्र तसंच आहे. यमुनेच्या प्रवाहासारख. एकदा आली होती द्वारकेला, आणि तीच वेड मलाही देवून गेली. तेव्हापासून तिच्याविना काही सुचेना. खरतर त्या आधीच कधीतरी तिने मला तिच्या आयुष्याच सारथ्य दिलेलं होत, तिच्या स्वताच्याही नकळत. "
"मी एक पती झालो, भ्राता झालो, सखा बनलो, मित्र बनलो, पुत्र बनलो, मार्गदर्शक बनलो, सारथी झालो, वडील झालो, माझ्या राज्याला सांभाळायचे होते मला - एक राजाही होतो ना मी. सर्वांकडून आयुष्यभर प्रेम गोळा केले. माझ्या चुकानाही प्रजेने 'लीला' म्हणून पदरात घेतले. जे काही आधीच होते, तेच मी सर्वाना वाटल्याबद्दल मला खूप उच्च स्थान दिले. पण यात मी माझे स्वताचे काही केले नाही. जे काही होते ते इथेच होते आधीपासून, मी फक्त मार्ग दाखवला. म्हणून मला 'देव' संबोधले. पण या सर्वांमध्ये नक्कीच थोर राधा होती. तिने तर तिच्या जवळचे सर्वस्व दिले आणि त्यापलीकडेही जावून देत राहिली. माझ्याजवळ करण्यासारखे भरपूर होते, मी संसारात पूर्ण गुरफटून गेलो पण राधेजवळ तर फक्त माझ्या आठवणी होत्या, मीसुद्धा नव्हतो. पण त्या देवीने कधीच खंत म्हणून कशाची बाळगली नाही. नंतर आली ती 'मीरा' ! ती आली अन सारा आसमंत तिच्या ओवीनी उजळून गेला. तिची थोरता तर मलाही भारावून गेली. कधीकधी वाटत कि मी स्वतः बनून राधेला जवळ केल असतं, मीरेला आपल्या गाठी बांधल असतं तर खूप बर वाटल असत मलाही. "

"पण म्हणूनच कि काय ती वेडी पुनः भेटली मला. तिच्या ठायी मोह आहे, इच्छा आहेत , आकांक्षा आहेत. पण मला बोलते कशी, 'कृष्णा तूच सांग बर. जर मला मोह नसता तर तुझा मोह कसा धरला असता. मी स्वार्थी नसते तर स्वताच्या स्वार्थासाठी मी तुझ्यावर प्रेम कसे केले असते.' असे प्रश्न तिने विचारला सुरुवात केली कि मग माझी उत्तरे संपतात. आणि मग ती गोड हसू लागते. मग सारी सृष्टी या नारीच्या त्या हास्यापुढे फिकी पडते. मग वाटते कि प्रत्तेक प्रियकराने आपल्या प्रेयसीला असंच हसू दिल, एखाद्या पतीने त्याच्या रुक्मीणीला असंच सुखी केल तर माझ राधेला एकट टाकल्याच दुख थोड कमी होईल."

"मी तिला माझी गीता ऐकवायला गेलो एकदा तिला 'कोणत्या गोष्टीचा मोह धरू नये, मोहाने आपण संसारात अडकत जातो. फळाची अपेक्षा ना करता कर्म करत रहावे. सृष्टीतल्या सर्व गोष्टी अशाश्वत स्वरुपात आहेत, सर्वकाही नश्वर आहे म्हणून कशाच्या मोहात पडू नये.' तर लगेच तिचे उत्तर हजर, ' देवा, जर का चराचरात तू सामावले आहेस, जर का कणा-कणा मध्ये तुझे अस्तित्व आहे ; तर का त्या कणा-कणाचा मोह धरू नये? आणि फळाची अपेक्षा धरो वा ना धरो कर्म तर करायचेच आहे, पण फळ म्हणून जर तुझी इच्छा धरली तर ? ' आणि मग पुन्हा ती मला अनुत्तरीत करते. तिच्या ठायी राग आहे लोभ आहेत, स्वार्थ आहे; पण तरीही ती माझी आहे, माझा अंश आहे. तिच्या मनामध्ये मी भरून उरलो आहे. त्यामुळे तिच्या मनात येणाऱ्या प्रत्तेक मोहाचा, स्वार्थाचा मी साक्षीदार आहे. ती जेव्हा स्वताशी बोलते तेव्हा ती माझ्याशीच बोलत असते नकळतपणे. खरच ती वेडी आहे. जेव्हा मी तिच्या आणि तिने माझ्या गळ्यात माळ घातली तेव्हा मला वाटले खरच मी तृप्त झालो. पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पहिला तर तो माझ्या तृप्तीपेक्षाही कित्तेक पटींनी जास्ती होता. माझे समाधान तर राधेला प्राप्त केल्यासारखे होते, पण तिचा आनंद तर विश्वाच्या सर्वे सर्वा असलेल्या विश्व्कार्त्याच्या प्राप्तीचा आनंद नव्हता तर तिच्या प्रेमाचा, वेडेपणाचा विजय होता तो. ती कितीक सुंदर हळवी, रागीट. मग काय झाले, राग तर देवाधिदेव महादेवाला पण आहे. तिला भेटल्यावर वाटल कि गीता परत एकदा लिहावी, ज्यामध्ये खरच तिच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी तिला देवू शकेल." 

" माझ्या प्रिय वेडीला प्राणाहून प्रिय बनवले आहे - या प्राणहीन कृष्णाने."


Wednesday, June 6, 2012

भूर्रर ....


तिचा नवरा तिला स्टेशन वर सोडायला आला होता. खर तर त्याला AirPort वर जायचं होत सोडायला, पण तिनेच मनाई केली होती. तिची ऑफिसची टूर होती - जर्मनी ला. ती स्टेशन वरून ट्रेन मध्ये बसली. AirPort वर पोचेपर्यंत तिच्या मनात हेच होत कि आपण जे करतोय ते चुकीच तर नाही न ? केवळ आपल्या इच्छेसाठी आपण ईशान ला फसवत तर नाही ना, पण लगेच तिच्या दुसऱ्या मानाने समजूत काढली कि, 'जरी तू तुझ्या मनाची इच्चा पूर्ण करत आहेस तरीही त्यात तुझ पाऊल कुठेहीवाकड पडणार नाहीये. तू फक्त आणि फक्त निर्भेळ आनंद घेण्यासाठी हे टूर च नाटक केलंस. त्यामध्ये कोणाला फसवण्याचा उद्देश तर येतंच नाहीये. '
'पण मग कोणी मला पाहिलं तर?' 'कस पाहील अगं, म्हणून तर तू जर्मनी निवडलस ना जायला.' 'पण माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या नवऱ्याने कधीच नाही म्हंटल नसतं मला असा आनंद घ्यायला'
'पण मग त्यामध्ये मज्जा आली नसती ना. तुला तो आनंद कदाचित मिळाला नसता' 'पण तरीही कुठेतरी मनामध्ये वाईट वाटतंय' ' अगं वाईट वाटण्यासारख काहीच नाहीये त्यात, तू तिथून आलीस ना परत कि तुला वाटेल कि आपण केल ते बरोबरच केल. आणि पुन्हा कधीतरी दहा बारा वर्षांनी सांगून तक ना ईशान ला' 
शेवटी तिच्या एका मनाने दुसऱ्या मनावर विजय मिळवला आणि तिच्या मनातले सर्व वाईट विचार निघून गेले. खर वाईट विचार नेमके कोणते हेसुद्धा एक कोडंच होत तिच्यासाठी.
ती घरी ना सांगता जातीये हे वाईट होत कि ती स्वतासाठी जातीये हे वाईट होत तिलाच काळात नव्हत. म्हणूनच हा दोन मनांचा झगडा सारखाच चालू होता तिच्या मनात जेव्हापासून तिच्या मनात ती आईडिया आली होती.
*   *   *   *
त्या दिवशी ऑफिसवरून येताना  तिने तो कॉलेजचा ग्रुप पाहिला आणि मनोमन तिच्या कॉलेजच्या कट्ट्या पर्यंत जावून पोचली.  तो कट्टा, त्या खुसखुशीत गप्पा, ती कच्छी दाबेली, ती कैलास ची शेवपुरी, तो कॉलेज जवळचा टनेल. सगळ काही क्षणात तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेल होत. आणि नाही म्हणायला तिचा कॉलेजचा ग्रुप किंवा शाळेचा ग्रुप काही लीप वर्षाला नाही भेटायचे तर आठवड्या दोन आठवड्याला त्यांची एखादी भेट ठरलेली असायची. पण तरीही तो आठवड्याचा काळ म्हणजे सर्व मित्र मंडळीसाठी लीप यीअर सारखाच असायचा. कितीही भेटा, मज्जा करा तरी सर्वाना कमीच पडायचं.
आणि तिथेच तिला हि भन्नाट आईडिया सुचली. कि सर्वांनी मिळून जर्मनी ट्रीप करायची तेही न सांगता.  कोणालाही न सांगता. 
त्यानंतर वर्ष भरातच सर्वांच गलबत होवून जर्मनीचा प्लान तयार झाला होता. डॉन नेही केला नसेल इतका भारी प्लान केला होता सर्वांनी.
*  *  *  *
तीच स्टेशन प्लान मध्ये पहिलं होत. पुढच्या स्टेशन वरून निमो आणि बबली दोघीजणी चढल्या. पुढे दगडूशेठ बाबा, सिंघम, पांडा, सिल्क, जादूची मम्मी, एक्शन काका, लकी मावशी, एच के, मि. बिन सार्वजन ठरल्याप्रमाणे आपल्या आपल्या जागेवरून स्टेशन वर बसले.
ट्रेन AirPort जवळच्या स्टेशन वर थांबली. तशी सर्वजण आपल्या आपल्या सुटकेस घेवून उतरली. तसं AirPort जवळ होत, चालत जाण्या इतक जवळ. सर्वजण तिकीट खिडकी ला जावून तिकीट दाखवून आत शिरली. सर्वांनी  चेक इन केल आणि वेटिंग लॉबी मध्ये येवून बसले. आपापल्या घरी फोन करून AirPort वर पोचल्याचा निरोप दिला. ज्यांची बच्चे मंडळी होती त्यांनी त्यांना चोकलेट चे प्रोमीस करून फोन ठेवून दिले. तेवढ्यात सर्वांच्या फोन  वर मेसेज आला - "Gate No 7 ". सर्वांनी एकंच रिप्लाय केला "Roger that ".

सर्व जणांनी एकदम गलका केला गेट नंबर ७ वर.  आणि त्याचं विमान आकाशात झेपावल जर्मनी कडे. 
भुर्र्रर्रर ......