Showing posts with label चांदणं. Show all posts
Showing posts with label चांदणं. Show all posts

Tuesday, August 7, 2012

चांदणं - ८


"मराठी पुस्तक प्रदर्शन आणि संमेलन - नवोदित लेखक आणि लेखिकेंसाठी. "
जान्हवी pamplet वरची जाहिरात मोठ्याने वाचून दाखवत असते.
"ए आपण जायचं का? शनिवारी आहे. पण आदी तुला सुट्टी घ्यायला जमेल का? कारण तू नवीन जॉईन झालास ना."
"खर तर नाही जमणार मला आता. ट्रेनिंग आहे ना त्यात अजून. सुट्टी घेण म्हणजे आपल्या पायावर दगड मारून घेण. आणि आई येणारे या शुक्रवारी. चार पाच दिवस असेल ती. मग नाहीच जमणार. काय वेळ काय आहे प्रदर्शनाची ?"
"जावूदेत ना तुला जमणार नाही तर कशाला हवीये वेळ. सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आहे. मी हाफ डे घेवून २.३० वाजता जाईन. तुला कोणता पुस्तक हव असेल तर सांग घेवून येते. " 
"अग नको, सध्या वेळच नाही वाचायला. तू ये जावून."
(जान्हवी स्वागत - 'जस काही जॉब यालाच लागलाय आणि जगामध्ये हा एकटाच जॉब करतो. आई येणारे तर साध घरी पण बोलावलं नाही. जावूदे. मीपण बघ तुला दाखवते कशी बिझी असते ते.')
.........

"हेलो जानु, अगं आज प्रदर्शन आहे ना? तू जातीयेस ना? "
"हो मी पोचालीये तिकडेच. का रे? "
"अग मला एक पुस्तक हवाय, तुला तिथे सापडलं तर पाहशील का?"
जान्हवी प्रदर्शनाच्या दाराकडे चालता चालता विचारते - "कोणत पुस्तक?"
"आम्ही दारात उभे आहोत तुमच्या स्वागतासाठी "
"हे कसले पुस्तक?"
"अगं कवितेच पुस्तक आहे. बघ सापडताय का ते."
आणि फोन वर बोलता बोलता ती एका माणसाला जोरात धडकते. सॉरी म्हणायला ती वर बघते तर - आदित्य साहेब.
ती एक क्षण आश्चर्याने तर दुसर्या क्षणी रागाने बघू लागते. 
"अच्चा हे आहे का तुझ पुस्तक."
प्रदर्शनामध्ये भूश्या, अडीच बी.कॉम. चा मित्र भेटतो. कॉलेजनंतर इतक्या दिवसानंतर आदीच्या आणि भूश्याच्या खूप गप्पा रंगतात. त्या पुरुशोत्तामच्या नाटकाची, त्या कवितेची आणि जान्हवीची ओळख या सर्व गप्पा होतात. जान्हविचीही ओळख होते भूषण सोबत. 
"मग आदि पुढचे प्लान आहेत काय तुम्हा दोघांचे ?"
आदी आणि जानु एकमेकांकडे पाहून नुसते हसतात. 

प्रदर्शनातून जानूच्या स्कुटी वरून दोघ घरी यायला निघतात. जानु गाडी चालवत असते, तिचे केस वाऱ्यावर भुरभुरत आदीच्या चेहऱ्यावर गुदगुली करत असतात. आणि असे क्षण आदिला जगातल्या सर्वांत सुखाच्या क्षणांसारखे वाटत. तो स्वताशीच मंद मंद हसत असतो. जानुची मात्र अखंड बडबड सुरु होती. आदीच मात्र त्याकडे अजिबात लक्ष नव्हत, त्याच्या कानावर तिचे शब्द पडत होते आणि चेहऱ्यावर वाऱ्याच्या तालावर ताल धरणारे केस,  मधूनच तिची ओढणी. तेवढ्यात ती विचारते, "तुझी मम्मी कधी पर्यंत आहे घरी?" आणि आदीच लक्ष नसल्यामुळे तो काहीच बोलत नाही. ती परत तोच प्रश्न विचारते पण त्याला लक्षातच येत नाही. तो असाच गाल्यातल्या गालात हसत असतो. ती गाडीच्या आरश्यामध्ये त्याला हसताना पाहते आणि जाम भडकते. त्याला गाडी चालवत असतानाच जोरात चिमटा काढून विचारते कि का हसतोस म्हणून. मग आदिला लक्षात येत कि ती काहीतरी विचारात होती. पण आता वेळ निघून गेलेली असते, कारण जानु काही शांत होणार नाही हे त्याला लक्षात येत. मग तो तिच्यासाठी काही ओळी गुणगुणतो -

तुझ्या चिडण्याचे प्रकार निराळे,
प्रेमाचीही तीच गम्मत,
केसांच्या बटामध्ये गुंतून जावे,
अन बोलण्यातले लक्ष थिजावे..
क्षणो-क्षणी का भिरभिरते मन माझ माझे - अर्थ काही उमगले नाही...   
ओढ कशी लागली तुझी मजला कळले नाही,
खंत आता हीच फक्त कि तू जवळ नाहीस,
उगाच काहूर का माजे सांजवेळी,
समोर तू असूनही कासावीस मन माझे - कारण मात्र समजले नाही..

त्याच शेवटच वाक्य संपत आणि ती खळखळून हसायला लागते. "बाकी काही म्हण हा तू आदी, तुझी हीच अदा आपल्याला जाम आवडते."
"ए , अदा हि मुलीना असते. मुलांना style असते. हे अदा बिदा असलं मला म्हणायचं नाही." 

चांदणं - ७



"हे बर आहे, आमच्या जोरावर तुम्ही पुस्तक पण छापायला लागलात, हं ??" स्टेज वर चढता चढताच गर्दीतून मागून कोणीतरी आदित्य ला हटकल  होत. तो मागे वळून त्या गोंगाटातून येणाऱ्या ओळखीच्या आवाजाच्या दिशेने पाहतो तर जान्हवी होती मागे. तेवढ्यात गर्दीतून धक्काबुक्की करत प्रेस वाले लोक आले, आदित्य स्टेजवर गेला. त्याच्या पहिल्या कवितेच्या पुस्तकाला पुरस्कार भेटला होता. पुरस्कार घेवून, आणि आभाराचे दोन शब्द बोलून तो लागलीच खाली आला. स्टेजच्या मागे जान्हवी त्याची वाट पाहत होती. तो येताच तिने तिच्या पर्स मधून एक गुलाबाचे फुल आणि एक ग्रीटिंग कार्ड काढले. "अभिनंदन आदी."
"काय हे जानु, तू पण ना. पण तू तर अजिबात येणार नव्हतीस ना. मग कशी आलीस? मी इतका वाईट आहे कि तू इतकी चिडलीस आणि इथे माझ्यासाठी येण्यास नकार पण दिलास. मग अशी कशी उगवलीस?"
"तू गप्प बैस आता. मी येणार नाही असं कस होईल. बर हे घे तुझ्यासाठी आणलंय." 
आदित्य फुल घेतो. "thanks ".
पुरस्कार सोहळा संपताच दोघे सोबतच निघतात.
"खर तर आज सेलिब्रेशन पाहिजे. चल आपण पाणीपुरी खावूयात. "
"ओ बाईसाहेब, तुमच्या दहाव्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला तरी पार्टी दिली नव्हती तुम्ही आणि आता माझ्या पहिल्याच पुस्तकाला पुरस्कार मिळाला आर लग्गेच त्या पुस्तकच क्रेडीट पण तुम्हालाच आणि वरून पार्टी पण तुम्हालाच. हे चांगल आहे."
"खरच .. मला खर वाटत नाहीये. त्यादिवशी आपण पावसात भेटलो नसतो आणि तुला त्या दिवशी एखादा जोब भेटला असता तर आपण असे भेटत राहिलो नसतो. ना मी माझी पुस्तक लिहायची हौस पुढे नेली नसती ना आज माझे इतके सारे पुस्तक प्रकाशित झाले असते." जान्हवी एकदम भूतकाळात मग्न होते...
तेवढ्यात आदित्य तिची तंद्री तोडत म्हणतो,"आणि ना आज माझ्या कवितेच्या नायिकेला घेवून मी इथे पाणीपुरी खाल्ली नसती."
"खरच जानु , तुला पाहिलं ना कि मला कविता सुचू लागते. हे अगदी पहिल्यापासूनच आहे पण मला खूप उशिरा कळलं कि माझ्या कवितेचा उगम तुझ्यामध्ये आहे ते. खरच माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर. "
"खूप म्हणजे किती?"
"खूप म्हणजे ... म्हणजे २५ किलो. २५००००० किलो.. "
दोघेही हसू लागतात.
"ए आपण आभाला खूप दिवसात भेटलो नाही बघ. या सुट्टीच्या दिवशी आपण पक्का भेटूयात हं."
"अगं आत्ताच नाही जमायचं, आता माझी परीक्षा पण आहे दोन आठवड्यावर. असं करूयात माझी परीक्षा झाली कि आपण सर्वांनाच भेटूयात. छान प्लान करू. अगस्तीपण येतोय दीड वर्षानंतर ओस्ट्रेलिया तून. आपण संजूला फोने करून बोलवून घेवू. श्रेयू तर आहेच इथे. ती येईल. आभाशी तू बोलून घे ."
"ओके ."
.......
"हेलो, काकू आभा आहे का? "
"अग ती बाहेर गेलीये. तू ?"
"काकू मी जान्हवी बोलतेय. आभाला सांगा या रविवारी सर्वांनी भेटायचा प्लान केलाय ते. आणि तिला फोन पण करायला सांगा."
"ठीक आहे. सांगेन तिला. ठेवते."

"हेलो .."
"बोला जान्हवी madam , मग फिक्स झाला का वेन्यु? कुठे जमायचं ?"
"अग हो हो... तू तर लगेच सुरु होतेस. श्रेयू मला सांग तुला रविवारी तर सुट्टी असतेच, पण यावेळी सोमवारी-मंगळवारी पण सुट्टी घे. ३ दिवस आपण धम्माल करणार आहोत. संजू बाबा आलाय कालच."
"काय्य्य .. संज्या आला? आणि मला सल्याने एकपण फोन नाही केला. चंपक. थांब मी त्याला फोन लावते."
"अग अग, चिडू नकोस. त्याच्या आई पप्पा सोबत तो मुलगी पाहायला जाणार होता आज. म्हणून त्याने तुला फोन केला नसेल ग. आणि त्याच आणि माझ पण बोलन नाही झालाय. ते तर मी त्याच्या फेसबुक वर स्टेटस पाहिलं. म्हणून सगतीये. आणि मुलगी पाहायचं मला आदित्य बोलला. कदाचित आदीच आणि त्याच बोलन झालाय. चिल. तो भेटणारे ना तेव्हा त्याची खेच हवी तेवढी."
"हो तुला बर इतका पुळका आलाय त्या संजूचा. पण वेट वेट ... संजय कर्वा आणि मुलगी पाहायला ?? अरेरे अडकला बिचारा. हा हा हा हा."
"तू हसू नकोस. हे मारवाडी लोकांमध्ये मुलगा-मुलगी भेद नाही करत. दोघांची लग्न लवकर करून टाकतात. हे हे. पण खरच संजू अडकला बिचारा. "
"ए जानु, बर तुझ आणि आभाच बोलन झाल का? ती येतीये ना ? "
"हो. म्हणजे आधी तिच्या मम्मी सोबत झाल होत बोलन पण नंतर तिने फोन केला होता. तीपण येतीये."
"आभा तर एकदम हिरोईन झाली आता. तीच काय बाबा.."
"श्रेयू , बस झाल बर का आता. किती खेचनारेस सर्वांची. बर चल मी ठेवते फोन नाहीतर तू काही थांबणार नाहीस. "

गुरुवारी सकाळी अगस्ती ओस्ट्रेलिया तून निघतो ते शुक्रवारी पोचतो. शनिवारी संध्याकाळी सर्व जन दिवे आगार ला जायला निघतात. सुमो मध्ये नुसता सर्वांचा धिंगाणा चाललेला असतो. आदी आणि अगस्ती दोघ सुरात सूर मिळवून संजूच्या मुलगी पहायच्या प्रोग्राम ची बातमी विस्तृत पाने सर्वांसमोर मांडत असतात. आणि बाकी सर्व त्याला चिडवण्यात कमी सोडत नसतात. ३ दिवस भरपूर मज्जा करून सर्व जन परत येतात.
अगस्तीच पी.एच.डी. च सबमिशन झालेलं असत. त्यामुळे त्याला आता रिझल्ट ची वाट पाहण्यात दिवस घालवायचे असतात. बाकी आभा आपल्या शुटींग मध्ये बिझी होवून जाते. जान्हवी पण तिच्या जॉब, प्रोजेक्ट आणि पुस्तक लेखनामध्ये. संजू दिल्ली ला निघून जातो. श्रेयू मात्र बर्यापैकी रिकामी असते. ऑफिस सुटल कि ती, अगस्ती, आणि आदित्य भटकत असतात. 

आदित्यचा पण रिझल्ट लागतो, तो यावेळी सी.ए. च्या सर्व परीक्षा पास होतो.  आणि त्याला मोठ्या कंपनीतून ऑफर येते. तो तिथे जॉईन होतो तसा श्रेयू आणि अगस्तीच भटकायला उरतात.




Tuesday, June 5, 2012

चांदणं - ६

आदित्य अवाक होवून जान्हवीच काम बघत राहिला आणि नाटक कधी संपलं याचा पत्तापण लागला नाही त्याला. नाटक झाल्या झाल्या तो पळतच जान्हवीच्या रूम कडे जायला निघाला. संजय ला ५ मिनिटात येतो म्हणून आदित्य जान्हवीला शोधात निघाला खरा पण वाटेत त्याला अभाच भेटली. आभा शी एक दोन शब्द बोलून ती काय बोलते आहे याकडे लक्ष न देता त्याने तिलाच विचारलं, " अग ती तुझी मुख्य नायिका कुठे आहे. तीच माझी बारावीची मैत्रीण. आपल नाटक झाल होत न, त्यामध्ये मी ती कविता घेतली होती त्या कवितेची लेखिका." अभाने प्रश्नांचा भडीमार करायच्या आधीच आदित्य ने सारा निबंध सुनावला. अभाने त्या कोपऱ्यातल्या खोलीकडे बोट केल आणि समोर बघते तो तो कधीच त्या रूम कडे झेपावला होता. आदित्य ला तिने इतका आसुसलेलं कधी पाहिलं नव्हता, पण जास्ती विचार न करता ती तिच्या रूम मध्ये आवरायला गेली.
आदित्य ने रूम च दार ठोठावल. जान्हवीने आतूनच कोण आहे, आत या म्हणून सांगितलं. 
तो आत गेला, जान्हवीने आरशातूनच आदित्य कडे पाहून एक मोठ्ठ स्मित केल आणि त्याला बोलायला वळली तेवढ्यात वळताना तिचा धक्का लागून तिथला काचेचा flower pot पडला. आणि ती हसायलाच लागली. आदित्य ला कळेना कि काय झाल नेमक, पण तिला हसताना पाहून त्याच्या मनात सहजच ओळी स्फुरल्या,

"आज अचानक मला कळेना,
उदय कुणाचा- सूर्याचा कि तुझा 
रात्र कोणाची चंद्राची कि तुझी 
मग तुझ्याच ठिकाणी उषःकाल अन 
कसा चांदण्यांचा पसारा ?
पावूस कोणाचा ढगाचा कि तुझा
पण तुझ्याच ओठी गडगडात सारा .. "

एकदम जान्हवीच्या आवाजाने तो जागेवर आला, "आरे सॉरी हं, माझ्याकडून हे नेहमीच घडत. मी आत्तापर्यंत शंभर एक flower pot तरी फोडले असतील, तरी मी सरांना सांगितलं होत कि माझ्या रूम मध्ये तुम्ही ते फुलांना कोंडून नका ठेवत जावू."
इतक बोलेपर्यंत आदित्य त्याच्या कवितेच्या विश्वातून पूर्ण बाहेर आला होता. आणि एकदम ओशाळून पण गेला होता, कारण जान्हवी कडून एकदम असा मोकळेपण त्याला अपेक्षित नव्हतं. 
तिची बडबड मात्र चालूच होती. 
"हो पण आदित्य राव , तुम्ही माझी कविता चोरली याबद्दल तुम्हाला शिक्षा तर झालीच पाहिजे. "
आदित्य एकदम गडबडून गेला आणि बोलू लागला - "अग मी त्यावेळी नाटक सुरु व्हायच्या आधी मुद्दामूनच प्रस्तावनेत सांगितलं होत तसं. पण तुला वाईट वाटल असेल तर मी .."
त्याच वाक्य मधेच तोडून ती लग्गेच बोलली "हो मला वाईट तर खूपच वाटलाय आणि त्याची नुकसान भरपाई म्हणून तू पुढच्यावेळी येताना माझ्यासाठी चोकलेट चा मोठा बॉक्स आणि फोडायला एक flower pot घेवून ये ."
"पुढच्या वेळी ??" आदित्य एकदम बोलला. 
"का ?? आपण आता इथेच बाय करणारे का? आता आपण भेटत राहणारे. आणि हो तुझा फोन नंबर पण दे मला."
"घ्या जान्हवी बाई इथेच आहेत अजून. आम्ही मात्र पूर्ण गाव शोधून आलो. आणि तू इथे काय करतीयेस." इति अक्षय जान्हवीचा सहकलाकार आणि मित्रसुद्धा.
"अरे अक्षु हा आदित्य माझा बारावीचा मित्र. म्हणायला मित्र आत्ताचा जेव्हा त्याने माझी कविता चोरली तेव्हापासूनच. कारण कॉलेजमध्ये कधी आम्ही बोललोही नाही."
"आरे हाय आदित्य आणि please तू जानू कडे लक्ष देवू नकोस ती अशीच खेचत असते सर्वांची. खर तर तुझ्या त्या नाटकामध्ये तिची कविता ऐकून ती अशी वेड्यासारखी पळत सुटली होती स्टेज कडे. ती एकदम शोक झाली होती कि ती कविता तिला सापडली म्हणून."
"सापडली ??? म्हणजे ?", आदित्य.
"अरे तुला तिने सांगितलं नाही का अजून? तिच्या कविता संग्रहामध्ये ती कविताच तिला सापडत नव्हती."
"आरे अक्षय तो त्यानंतर आत्ता मला भेटलाय. पण अरे हो मी विसरलेच आदित्य तू कसा काय नाटक पाहायला? तुला नाटकांची आवड आहे का?"
"अग तुझ्यासोबत काम करते न ती आभा, ती माझी मैत्रीण आहे. आज तिच्यासाठी आम्ही आलो होतो आणि .."
"आणि काय ?", जान्हवी.
"अरे हो मी विसरलोच. मला आता लवकर गेल पाहिजे, कारण आज आम्ही कॉलेजची मित्रमंडळी खूप दिवसांनी एकत्र भेटलो आहोत आणि आम्ही आभा सोबत बाहेर जायचा प्लान केलाय. त्यामुळे मी आता निघतो." हे बोलता बोलताच तो रूम मधून बाहेर पडतो.
"ठीक आहे, पण भेट नक्की. बाय." जान्हवी.
"बाय जान्हवी आणि अक्षय तुलापण बाय."

त्यानंतर त्यादिवशी सर्व जणांनी खूप दिवसानंतर धम्माल केली. सर्व जनाच खूप खुश होते. एकटी आभा सोडून, तिला आदित्य ने जान्हवीला असा इतका वेळ जावून भेटलेल मुळीच आवडलं नव्हत. 
' आदित्य माझ्यासाठी आला होता न नाटक पाहायला मग तो इतका वेळ असा का तिच्याबरोबर गप्पा मारत होता कोणास ठावूक." हाच विचार पूर्ण वेळ आभा करत होती. पण नंतर मजा करता करता तीसुद्धा हे विसरली.

नंतर बरेच दिवस  आणि सर्वच जन आपल्या कामामध्ये बिझी होती. इतके कि कोणाचा कोणाला पत्ता नव्हता.
श्रेयू ला एका कंपनीत चांगला जॉब मिळाला होता, ती आता पार्ट टाइम कॉलेज करत होती. परीक्षेपुर्तच कॉलेजला जायचं होत तिला. 
संजय ला दिल्लीच्या एका विद्यापीठाचा कॉल आला होता सायाकोलोजी मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी, त्यामुळे तो तिकडे जायची तयारी करत होता.
अगस्ती च्या पी एच डी च पाहिलंच वर्ष होत, पण तो खूपच नेटाने अभ्यास करत होता. त्याला ऑस्ट्रेलियामधून तिथे त्याच पी एच डी पूर्ण करण्यावाषयी विचारणा झाली होती.
आदित्य मात्र मागे पडत होता. CA च्या पहिल्या परीक्षेमध्ये नापास झाला होता. अभासुद्धा मुंबई ला शिफ्ट झाली होती, आताशा तिला मराठी हिंदी मालिकेमध्ये काम करण्याविषयी विचारणा झाली होती आणि एका मराठी मालिकेमध्ये ती कामही करू लागली होती. तिने नाटक कारण सोडून दिल होत. पण ती महिन्याचा एका रविवारी खास आदित्य ला भेटण्यासाठी घरी येवून जायची. हल्ली तिला आदित्य बद्दल वेगळ फिलिंग येत होत. तिलाच काळात नव्हत, पण तो आता मित्रापेक्षाही जास्त कोणीतरी बनू लागला होता. आदित्य मात्र त्याच्या अपयशामुळे सर्वांपासून दूर राहू लागला होता. 
आदित्य ने आता नोकरी शोधायला चालू केल होत. 
पावसाळा सुरु झाला होता. एके दिवशी असाच क्लास वरून रात्री उशिरा येताना आदित्य बस स्टोप वर थांबला होता. एकदमच पावसाला सुरुवात झाली, आधी रिमझिम आणि दहा पंधरा मिनिटातच धो धो पडायला लागला होता. तेवढ्यात दूरवरून कोणीतरी पळत पळत स्टोप कडे येताना त्याला दिसलं. आदित्य पूर्ण भिजला होता पण बस येवूपर्यंत त्याच्याकडे दुसरा पर्यायाच नव्हता.
ती पळत येणारी व्यक्ती आता दृष्टीक्षेपामध्ये आली होती. आणि आदित्यने चमकून पाहिलं तर ती जान्हवीच होती. 
ती आली स्टोप वर आणि स्टोप च्या एका कोपऱ्यात आडोशाला उभी राहिली. तीच लक्ष नव्हता आदित्य कडे. स्टोप वर अजून एक दोन जन होते. 
आदित्य तिच्या जवळ जावून थांबला आणि बोलला " सॉरी मी चोकलेट आणि flower pot नाही आणलाय. " आणि जान्हवीने आश्चर्य भरल्या नजरेने शेजारी पाहिलं.
दोघेही एकदमच बोलले " कुठे आहेस तू ??"
जान्हवीने हात करून आदित्य ला थांबवलं आणि तिने बोलायला सुरु केल , "आरे काय हे कुठे होतास इतके दिवस. मी नाटक सोडलं आणि त्यामुळे अभाकडून तुझा पत्ता घ्यायचा सुद्धा राहिला. तू तेव्हा फोन नंबर द्यायाचाही विसरून गेलास. .."
आणि आदित्य ला कळलं कि आता हिची बडबड काही थांबणारी नाहीये. आणि त्याला ती थांबू नये असंही वाटू लागल. कारण त्या दिवशी त्याने चार पाच ठिकाणी नोकरी साठी interview दिले होते सगळीकडे निराशा होती. आणि मग त्यामुळे त्याच लक्ष क्लास मधेही लागत नव्हत. आणि त्याला जान्हवी दिसली इथे, त्याला इतकं बर वाटल कि बस्स तिची बडबड ऐकत राहावी. 
आणि जान्हवी होतीच तशी. बडबडी.
त्या पावसामध्ये आदित्यला पुन्हा काही ओळी सुचल्या -
"मुसळधार पावूस आहे कि हिची बडबड
मलाच उमजेना,
ठाव मनीचा घेत 
तिचे शब्द मनातून परत फिरेना,
"
आणि आदित्य एकदम थबकला. कारण त्याला जाणवलं कि जान्हवी जेव्हा जेव्हा समोर येते तेव्हा तेव्हा तिच्यासोबत ती हि कविता आणि कवितेचे शद्बही घेवून येते.

एव्हाना पाऊस निवळला होता. रस्त्यावरच्या दिव्यात ते रात्रीचे रंग सुरेख दिसत होते. रस्त्यावरचे दिवे जणु पावसात धुतले गेल्यामुळे अजून शुभ्र प्रकाश फेकत होते.

Wednesday, March 21, 2012

चांदणं - ५


आदित्य लायब्ररी मध्ये काही पुस्तक शोधात होता. अगस्ती प्रश्नपत्रिकेच्या ढिगाऱ्यात बुजून गेला होता. अगस्तीच तेवढा त्यांच्यामध्ये एकदम किडू होता. खूप रट्टा मारायचा, आणि मार्क्स पण मिळवायचा. बाकी सर्व जण म्हणजे मधल्या फळीतले. धड स्कॉलर पण नाही आणि ढ पण नाहीत. श्रेयू मात्र हुशार होती ती बाकीच्या कलागुणांमध्ये. ती कॉलेजच्या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी असायची. आणि आभा ! आभा तर आपली फक्त आदित्य आदित्य करत रहायची. शेवटच्या वर्षाला असताना आदित्य ने C. A . करायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्याने अभ्यासाची तयारी चालू केली. तसा तो अभ्यासक्रम खूपच अवघड होता. पण आदित्य ने ठरवलं होत कि कसही करून हि परीक्षा पास व्हायची. दोन-चार वर्ष इथे नोकरी करून परदेशामध्ये जायचं. शेवटच्या वर्षी पूर्ण ग्रुपनेच आप आपली दिशा ठरवली होती. श्रेयू एम.कॉम. करणार होती. अगस्ती तर पी.एच.डी ची तयारी करायला लागला होता. संजय सायकोलॉजी मध्ये उच्च शिक्षण घेणार होता. पण आभा ची अशी काही दिशा ठरेना. आणि तशी तिला काही काळजी पण नव्हती. तिचे वडील एकदम श्रीमंत होते, त्यामुळे तिला ज्या कोर्स ला अडमिशन घ्यायचं असेल तिथे त्यांनी  तिला घेवून दिल असता.
पण त्या दिवशी सर्व जण लायब्ररी मध्ये होते. आभा आणि श्रेया त्यांच्या एका सरांकडे पुस्तक घेण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा तिथे सरांचे एक मित्र आले होते - प्रोफेसर चंद्रचूड.  ते नाटक- शोर्ट फिल्म-डोक्युमेंट्री यामध्ये काम करत असत. तर त्यांना एका सह-नायिकेचा शोध होता. त्यासाठी ते आपल्या मित्राच्या कॉलेजमध्ये काही नवीन talent सापडत का ते पाहायला आले होते. आणि तेवढ्यात श्रेयू आणि आभा तिथे पोचल्या. प्रोफेसर चंद्रचूड ला आभा बघताच क्षणी  भावली. त्यांनी तिला लगेच विचारलं कि तू माझ्या एका नाटक्मध्ये सह-नायिकेच काम करशील का? ती एकदम शॉकच झाली आधी. पण नंतर तिच्या सरांनी शांतपणे बसून चर्चा करण्याविषयी सुचवलं.
आभा आणि श्रेया, दोघीनिसुद्धा बरेच प्रश्न विचारले. कथनक काय आहे, काम कशा प्रकारच आहे, ते आउट डोअर आहे कि तिथेच होणारे,आणि मग त्याच्या वेळा वगैरे वगैरे. प्रोफेसर ने पण तिच्या अक्टिंग च्या अनुभवाविषयी विचारलं. जेव्हा त्यांना कळाल कि तिने पुरुषोत्तम मध्ये लीड रोल केला होता आणि त्यांना ४ थ्या क्रमांकच बक्षीस मिळालं तेव्हा ते खूपच खुश झाले. त्यांनी लगेच सांगितलं कि यावेळी पुरुषोत्तम मध्ये स्त्री वाडी खूप नाटके होती आणि त्यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या कोलेज ने जे नाटक सदर केल त्याची नायिकाच माझ्या नाटकाची नायिका आहे. सर्व गप्पा झाल्यावर प्रोफेसर ने तिला स्वताच कार्ड दिल आणि विचार करून काय ते संग असाही सांगितलं.

अभाच्या घरी तसा तिला विरोध बिलकुल झाला नसता आणि तिची दिशासुद्धा ठरली नव्हती. पण तिला ह्या नाटक-सिनेमा क्षेत्रामध्ये जवस वाटत नव्हता. पण शेवटी ग्रुप मध्ये चर्चा करून सध्या जोपर्यंत काही ठरत नाही तोपर्यंत हे नाटक time pass म्हणून कराव असा ठरलं. त्याप्रमाणे तिने प्रोफेसर ना फोन करून तिची मंजुरी कळवली. आणि परीक्षा झाल्या झाल्या ती काम चालू करायला तयार आहे असाही सांगितलं.
प्रोफेसर ने तिला पुढल्या भेटीमध्ये बाकीची माहिती देण्याविषयी सांगितलं. 
यथावकाश सर्वांच्या परीक्षा संपल्या. सर्व जण आपआपल्या मार्गी लागले. अभाच सुद्धा नाटक सुरु झाल. हळू हळू सर्व जण पांगले. आधी आठवड्याला भेटायचे मग एक महिन्याला.. नंतर तर कोणाच्या वेळसुद्धा जमत नसत. पण आभा आणि आदित्य एकमेकांच्या संपर्कात होते. भेट नाही व्हायची पण फोन मार्फत नेहमीच ते संपर्कात होते. ती नेहमी त्याला तीच नाटक पाहायला बोलवायची पण त्याचा  C . A . चा अभ्यासक्रम त्याला बाहेर पडू देत नव्हता. 
दरम्यान आभाने सुद्धा आपल कॅरिअर नाटक-सिनेमा क्षेत्रामध्ये करायचं ठरवून टाकलं होत आणि ती तीच काम एन्जोय करत होती.
C . A . ची पहिली परीक्षा झाली आणि काबुल केल्याप्रमाणे आदित्यने आभाच नाटक पाहायला जायचं ठरवलं. खूप दिवस झाले सर्व जण भेटले नव्हते, म्हणून आदित्य ने सर्वांनाच जमवल यावेळी. फुल धम्माल करायची ठरली.  

नाटक सुरु झाल. आभाच्या एन्ट्री नेच नाटकाची सुरुवात होती. खरच आभा खूपच कसलेल्या कलाकारासारखी काम करत होती. सर्वांनाच चांगल वाटत होत. इंटर्व्हल नंतर मुख्य नायिका प्रवेश करणार होती. पोपकोर्न, कोक घेवून सर्व जण परत उर्वरित भाग पाहायला बसले. मुख्य नायिकेची एन्ट्री झाली आणि आदित्य एकदम आवाक झाला. मुख्य नायिका जान्हवी होती.


Thursday, February 23, 2012

चांदणं - ४

ती झाडाखाली बसलेली असते. 

कॉलेज भरायला अजून बराच वेळ असतो आणि अशावेळी त्या झाडाखाली बसून घोळक्याकडे बघून तिला तिच्या डायरीची पण भरवायला जाम मजा येते. अशीच नेहमीप्रमाणे ती त्या झाडाखाली बसलेली असते.
तो तिथून लांब असलेल्या कट्ट्यावरून तिला निरखत बसलेला असतो. तीच मग्न होवून डायरीमध्ये लिहिण तो न्याहाळत असतो. तसा लिहायचा नाद त्यालाही होताच, पण तिच्या इतका तो खोल कधी लिहायचा नाही. किंबहुना त्याच लेखन म्हणजे विडंबन कविता, फुटकळ विनोदी कथा यापलीकडे जायचं नाही. पण जेव्हापासून त्याने तिला ऐकल होत ना तेव्हापासून त्याला तीच लेखन म्हणजे खूपच भावलं होत. 
त्याला तिला भेटून बोलायचं होत पण हिम्मतच होत नव्हती. 
तिने चार पाच डायरीची पान भरवली होती एव्हाना. तिच्या मैत्रिणी आल्या तशी ती आवरून निघाली.  त्याचा आणि तिचा वर्ग वेगळा होता. तो पडला कॉमर्स चा विद्यार्थी आणि ती आर्टस ची.
त्याची आणि तिची पहिल्यांदा ओळख झाली ती पुरस्कार वितरण सोहळ्याला. बारावीचा निकाल लागला. ती कॉलेजमध्ये ७ वी आली होती. त्याला जेमतेम फर्स्ट क्लास मिळाला होता. त्या समारंभात त्याने धीर करून तिला जावून अभिनंदन केले होते. तेव्हा त्या दोघांची पहिली ओळख आणि भेट. तिने हसून त्याला प्रतिसाद दिला. पुढे काय करणार वगैरे थोडीफार बोलणी झाली आणि अशाप्रकारे त्या भेटीची सांगता झाली. पुढे भेटू केव्हातरी म्हणून एक आश्वासनही देईल गेल. पण ती भेट होण्याची काहीच शाश्वती नव्हती.
पुढे त्याने बी. कॉम. ला अडमिशन घेतलं. बी. कॉम च्या शेवटच्या वर्षाला असताना तो आणि त्याची मैत्रीण आभा यांची फार चं मैत्री जुळली होती. तो, आभा, भूश्या, संजय, श्रेयू आणि अगस्ती. धम्माल मजा करायचे. त्याच लेखन तर आताशा पूर्ण बंदच होत. पण तेव्हा पुरुषोत्तमच जाहिराती भिंतीवर लागल्या. तो आणि त्याच्या मित्र मंडळीनी पुरुशोत्तामचा घाट घातला. 
झाल त्यांची तयारी सुरु झाली. स्क्रिप्ट लिहायचं काम संजय कडे, डायलॉग लिहायचं काम त्याच्याकडे. कारण अजून कोणाला माहितीच नव्हत कि तो कधीतरी कथा-कविता लिहित होता ते आणि त्याने कोणाला काही संगीतालाही नव्हत. पण जेव्हा त्यांची कथा तयार झाली आणि संजय ने ती सर्वाना ऐकवली तेव्हा ती कोणाच्या मनाला टच होत नव्हती. काहीतरी गडबड होती पण कोणालाच कळेना. 
कथा होती कृष्णावर. पण त्यातला तोच तोचपणा लग्गेच जाणवत होता.
कथा कशी असावी यावर आता सर्वांची चर्चा होणार होती. सर्व जण जमले.
आभा - "स्टोरी अशी पाहिजे ना कि त्यामुळे प्रेक्षक एका वेगळ्याच वातावरणामध्ये जातील. आणि आपली सध्याची हि गोष्ट म्हणजे एकदम कॉमन आहे रे भूश्या . संजू तू काहीतरी वेगळ लिही ना जरा."
श्रेयू - "माझ्याकडे एक कल्पना आहे. अगस्ती ला तर मुझिक येत. आपण कृष्णाची मुझीकाल स्टोरी करूयात का? "
आभा - "अये यार नाही बर का. यात काही मजा नाहीये "
संजू - "ठीक आहे. मलाही कळतंय कि काहीतरी वेगळ करायचं. पण मला काहीतरी हिंट द्या ना राव तुम्ही लोक."
आभा - "आरे तू लेखक आहेस, आम्ही तुला काय हिंट देणार?"
अगस्ती - "मुझीकाल स्टोरी ची कल्पना तशी छान आहे. आपण मध्ये मध्ये कविता पण टाकू शकतो."
आणि अगस्तीच्या कविता या शब्दामुळे त्याला काहीतरी सुचत. पुढे काहीतरी चर्चा वाढून दुसर्या दिवशी पुन्हा उर्वरित चर्चा पुढे नेण्यासाठी भेटायचं ठरत.

तो घरी जातो. गेल्या गेल्या त्याच्या जुन्या डायर्या शोधतो. खूप शोध-शोध केल्यावर त्याला ते कवितेच पान भेटत. जेव्हा अगस्ती कविता टाकायची असा बोलतो, त्यावेळी त्याला तिच्या त्या पहिल्या कवितेही आठवण होते. आणि त्याच्या डोक्यामध्ये कहाणी फिक्स होते. घरी येवून तो तिचीच ती कविता शोधतो आणि त्याला सापडतेसुद्धा. 
तो स्टोरी लिहायला बसतो. स्टोरी आता कृष्णावर नाही तर राधेवर तो लिहिणार असतो.
४-५ तास पान खाराद्ल्यावर त्याच्या मनासारखी स्टोरी तयार होते. आणि तिची ती कविता तो त्यामध्ये टाकतो.
दुसर्या दिवशी त्याची ती नवीन स्टोरी सर्वाना इतकी आवडते कि पात्र, डायलॉग, स्टेज डेकॉर, कॉस्चुम सर्व काही फटाफट ठरून जात. श्रेयू राधेच पात्र साकारणार असते. त्यामध्ये एक खूप छान कन्सेप्ट त्याने टाकलेली असते ती म्हणजे - राधेची सावली. राधेच्या सावलीच पात्र अर्थात आभा करणार असते. सर्वाना ती कविताही खूपच आवडते. पण तो कोणाला सांगत नाही कि ती कविता त्याची नसते. 
झाल. सर्व तयारी होते. आणि स्पर्धेचा तो दिवस उजाडतो. त्यांचा नंबर सतरावा असतो. त्यांचा नंबर येतो. नाटक सादर करण्यापूर्वी, निवेदनामध्ये तो स्टोरी बद्दल थोडफार सांगतो -
"हि कथा आमच्या मनाला भावली म्हणून आम्ही इथे सादर करत आहोत. इथे आम्ही 'राधा' साकारणार आहोत. पण हि राधा काही कृष्णाची राधा नाहीये. हि राधा म्हणजे प्रत्तेक स्त्रीच्या मनातली आकृती आहे. इथे कुठेच कृष्ण नाहीये. का नाहीये? तर आपण नेहमीच राधेबद्दल बोलतो तेव्हा ती कृष्णाची राधा म्हणूनच बोलतो. किंवा तिच्या आयुष्यात कृष्णाशिवाय दुसरं काही नाहीये असाच आपण बोलतो. पण आज जी राधा आम्ही इथे सादर करत आहोत ती पूर्णपणे कृष्णाशिवाय. तिला तीच स्वतंत्र अस्तित्व आहे विचार आहेत, स्वप्न आहेत. हि राधा कदाचित पूर्वीच्या राधेशी मिळती जुळती नसेल. पण हि 'राधा' हि आजच्या प्रत्तेक स्त्रीच एक प्रतिबिंब असेल. आम्ही नाटकामध्ये एक कविता ऐकवणार आहोत. त्याबद्दल मला आधीच खुलासा करावासा वाटत आहे. ती कविता माझ्या बारावीच्या एका मैत्रिणीची आहे. आणि तिच्या परवानगीशिवाय आम्ही हि कविता इथे सादर केली आहे कारण तिच्याशी मला संपर्क साधता आला नाही. त्यामुळे तिची माफी मागून मी हे नाटक इथे सादर करत आहे. धन्यवाद."
नाटक संपले. टाळ्यांचा अक्षरशः कडकडाट झाला. तो आणि त्याचे मित्र या प्रतिसादाने भारावून गेले. पडद्यामागे सर्व जण आपला मेक-अप आवरत असताना तिथे एक मुलगी आली आणि त्याच्याबद्दल विचारू लागली.
"तो आदित्य आहेत का इथे." 
श्रेयू - "नाही तो रेपोर्ट करायला गेला आहे. येईलच इतक्यात. तू?"
ती - "मी त्याची मैत्रीण आहे - जानव्ही. तुम्ही आदित्यला सांगा कि मी इकडेच आहे. आमचा नाटक सुरु व्हायला अगदी थोडाच वेळ आहे. तर मी आत्ता जाते. मी नंतर भेटेन नक्की."
श्रेयू - "ठीक आहे."
आणि ती लगबग करत निघूनही जाते.
तीच नाटक होवून जात. त्याच नाटक होत. श्रेयू गडबडीत तिचा निरोप त्याला सांगायचं विसरून जाते.
त्याला आणि त्याच्या ग्रुप ला ४ थ्या नंबरच बक्षीस मिळत. सर्व जण खूप खुश होतात. एकाच जल्लोष होतो.
तो आनंद साजरा करण्यासाठी ते सारसबागेमध्ये जमले. तिथे भेळ, रगडा खावून झाल्यावर त्यांचा घोळका बागेमध्ये विसावतो. तिथे त्या कवितेचा विषय निघतो.
आभा - "या कवितेबद्दल तू काही बोलला नाहीस आधी. आणि अजून एक गोष्ट, गडबडीमध्ये म्हणा किंवा या नाटकाच्या नादात एक गोष्ट मी बोलायचे विसरूनच गेले. तू खूप छान लिहितोस. आणि  आम्हाला आत्तापर्यंत कधी समजलाच नाही."
सर्व - "हो हो. हा आदी एकदम छुपा रुस्तम निघाला. खूपच भारी स्टोरी होती तुझी. आणि ती कवितेची भानगड काय आहे काय."
एवढ्यात श्रेयूला ती मुलगी आठवली.
श्रेयू - "ए आद्या, अरे एक पोरगी तुला भेटायला आली होती तिथे. ते नाटकाच्या गडबडीत मी सांगायचं विसरले. काय बर तीच नाव. हा जान्हवी. हो हेच नाव होत."
आदित्य - "जान्हवी ??? ती आली होती. कधी कुठे???" 
श्रेयू - "आपल नाटक झाल्यावर, आपण जेव्हा सर्व जण स्टेज च्या मागे होतो ना रूम मध्ये. तेव्हा ती आली होती. तू रेपोर्ट करायला गेला होतास तेव्हा. तिच्या कॉलेजच नाटक होत म्हणून ती गडबडीत निघूनही गेली."
आदित्य - "आर्रे यार, तीच माझ्या कवितेची लेखिका. जान्हवी. म्हणजे ज्या कवितेबद्दल मी बोललो होतो ती कविता माझ्या एका बारावीच्या मैत्रिणीने लिहिलेली आहे. नाटकामध्ये ती कविता घेण्याआधी मी तिचा म्हणजे - जान्हवीचा पत्ता शोधायचा प्रयत्न केला होता. पण माझा आणि तिचा काही संपर्क झाला नव्हता. आणि कोणाची कविता मला चोरून वापरायची नव्हती. म्हणून निवेदनामध्ये मी त्याबद्दल कल्पना दिली. पण तिची भेट मात्र हुकली."


* * *
पावसाची एक सर,
दवाचा एक बिंदू,
तशीच एक आठवण तुझी.
अलगद आणि हळुवार
अगदी तुझ्या कवितेसारखी.


Monday, January 2, 2012

चांदणं - ३



ती कशी नेहमीच अलगद अलगद, हवेवार स्वार असते,
झुळूके ची दोर तिच्या हाती दिलेली असते,
कदाचित म्हणूनच  वेडे मन हे उगाच त्या वादळात उडी मारू पाहते..
तिच्या मनाच्या तळाशी जावू बघते..
ती अशीच अलगद अलगद, हवेवर स्वार असते..
बाकी कशाशी तिचे घेणे देणे नसते,
उगाच जगणे तिला मान्य नसते,
ती हसते तेव्हाही पाण्यावरती तरंग उमटते..
ती अशीच येते आणि झुळूक बनुनी जाते,
एका क्षणाची तिची मिठी त्या हवेत विरघळून जाते ...
ती त्याच हवेवर स्वार होवून अलगद निघून जाते ...
स्पर्श हवेचा आजही तिची कहाणी वदतो,
ती होती हा भासही मजला हुलकावणी देवून जातो,
ती कमळ आणि मग शब्द माझा भुंगा बनून जातो,
तिच्या भोवती गिरकी घेवून लांबूनच परतू येतो,
ती आपल्या पाकळ्या मिटून मूक निरोप घेते,
मजसोबत त्या हवेलाही ती वेड लावून  जाते...
ती मात्र अलगद अलगद स्वप्नात विरून जाते ....

तिची कविता संपते आणि प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात बुजून जाते. त्या स्टेज वर जायच्या आधी आणि आत्ता कविता वाचून झाल्यावर तिच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास शिरला होता. तिच्या कवितेमधल्या नायिकेप्रमाणेच ती अलगद हवेवर स्वार झाली होती. आणि एक आकाशामध्ये उंच झेप घ्यायला सज्ज झाली होती. तो जल्लोष तिच्या रोमारोमामध्ये भरून उरत होता. टाळ्यांच्या त्या गजराला पूर्णविराम लागेपर्यंत तिने वाट पहिली. सगळीकडे शांत झाल्यावर तिने बोलायला चालू केल.

' मी, माझी मैत्रीण, माझी आई, माझी बहिण, मामी, अत्त्या, काकू, आजी, वाहिनी, शेजारची शालू, काकूंची माणिका, शाळेतल्या बाई, कॉलेजच्या टीचर - अशा कितीतरी रूपांमध्ये मी तिला पाहिलं आहे. माझ्या कवितेतल्या नायिकेला पाहिलं आहे. या सर्व जणींमध्ये आणि अशा अनेक जणींमध्ये अशीच एक परी लपलेली असते. जिला आयुष्य बेदरकार पणे जगायला आवडत. बेदरकार पणे म्हणजे उद्धटपणे नाही, किंवा उगाच फालतू नाही. हवेसोबत वाहत जाणं किंवा प्रवाहासोबत जाणं ज्याप्रमाणे असत त्याप्रमाणे.हे झाल कवितेच्या भाषेमध्ये. पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आपण हवेसोबत कसे वाहू शकतो ? तर, त्यासाठी एक किस्सा सांगते. आमच्या इथे एक काकू होत्या. त्या अगदी असाच आयुष्य जगायच्या. त्यांच्या आयुष्याचे किस्से त्या नेहमीच सांगायच्या आणि तेही हसत हसत - मग ते सुखाचे असो कि दुखाचे. तर त्या काकूंची आई त्यांच्या लहानपणीच त्यांना सोडून गेली होती. सोडून गेली होती म्हणजे मेली नव्हती, तर तिच्या बाबांना सोडून गेली होती. त्या म्हणायच्या कि त्या वेळी त्या शेवटच्या कळवळून रडल्या, पण व्हायचं तेच झाल. त्यांची आई काही परत आल्या नाहीत. वडिलांची लाडकी असल्यामुळे त्यांना काही कमी नव्हत, पण आई सोडून गेली याच अपराधीपण त्यांनी कधीच आपल्या वडिलांवर येवू दिल नाही कि स्वताही त्यात अडकून पडल्या नाहीत. पुढे शाळा कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणेच दंग मस्ती करून आनंद लुटला. मग लग्न झाले. नवरा एकदम शामळू मिळाला, त्या मात्र एकदम जॉली. पहिली एक - दोन वर्ष त्यांची संसार, नवरा करण्यात गेली. पण नंतर त्यांना काही ते जीवन रुचेना. त्यांना नेहमी वाटायचं कि नवऱ्यान सोबत करावी, त्यांना आवडणाऱ्या गोष्टीमध्ये साथ द्यावी. पण तास झाल नाही. तास त्यांनी स्वताला बदललं. एका ठिकाणी पार्ट टाइम नोकरी चालू केली. गल्लीतल्या गणपतीपासून त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची आयोजक म्हणून पाहण्यास सुरुवात केली, आणि आता त्या पूर्ण नगर पालिकेमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची आयोजक आहेत. सोबत त्यांनी त्या वेळी गाण शिकायला चालू केल, मागच्या वर्षीच संगीताच्या सर्व परीक्षा पूर्ण पास झाल्या त्या. तबला, गिटार वाजवायला शिकल्या आणि एक-दोन कार्यक्रमामध्ये वाजवूनही झाल त्याचं. नवीन संगणक आले तेव्हा त्यांनी संगणकाच्याही परीक्षा दिल्या. आज त्यांच्याकडे त्यांचा स्वताचा नोटबुक आहे आणि त्या रोज वापरातातही. हे सर्व करताना त्यांनी त्यांच्या मुलानाही सोबत घेतलं. दोन मुलांसोबत त्यांनी कत्थक चे क्लास, गिटार चे क्लास केले. आज त्या ६५ वर्षांच्या आहेत त्यांना एका कार्यक्रमात विचारलं कि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप खुश कधी होता आणि कोणामुळे होता आणि तुमच्या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देता ? त्याचं उत्तर अगदीच पटणार होत. त्या म्हणाल्या कि मी खुश माझ्या मनामुळे होते आणि जेव्हा झाले तेव्हा दुखीसुद्धा मनामुळेच झाले. माझ्या यशाचं श्रेय आईपासून ते माझा खूप लाड केलेल्या वडिलांना, माझ्या नवऱ्यापासून ते माझ्या मुलांना, माझ्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वच जणांना आहे. कारण माझ्या आयुष्यातल्या प्रत्तेक क्षणामध्ये कोणी न कोणी सामावलेलं होत आणि आहे. राहिली गोष्ट रागाची आणि लोभाची - तर मी जेव्हा खुश असायचे तेव्हा माझ्या आजूबाजूचे सर्व जन देवासारखे वाटायचे. पण जेव्हा मी दुखी असायचे तेव्हा सर्वांचा मला इतका राग यायचा कि एकेकाचा खून करुसा वाटायचा. पण या दोन्ही गोष्टी कायमस्वरूपी नाहीत. कायमस्वरूपी एकाच गोष्ट होती - मी माझ्या आयुष्यामध्ये अखंड समाधानी आहे. माझ समाधान कोण एका व्यक्तीवर अवलंबून नाहीये. किंवा कोणाच्या वागण्यामुळे माझ दुख नाहीये. जे काही तो फक्त एक मनाचा खेळ आहे. तो खेळ म्हणून हसत रडत खेळायचा कि युद्ध म्हणून जिंकण्यासाठी मरायचं-मारायचं ते आपणच ठरवायचं. खरच त्या काकुनी म्हंटल तर अगदी सामान्य आयुष्य जगलं आहे. पण अंमलबजावणी करायचं म्हंटल कि कळत. प्रत्तेकन स्वच्छंदी आयुष्य जगायला हव, कोणा एकावर आपला आनंद दुख विसंबून ठेवण्यापेक्षा आपल समाधान कशात आहे हे जाणून घ्यायला हव. बस मला एवढाच बोलायचं होत.'

अजून एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला, पण यावेळी त्या टाळ्यामध्ये एक विचाराची लाट जाणवली. त्यावेळी पहिल्यांदा त्याने तिला ऐकले होते, पहिले होते. त्याला एक क्षण असे वाटले कि - तिला हव असलेल आपण सर्व तिला द्यावं. पण परत त्यालाच लक्षात आलं. तिला हवं असलेल देणारे आपण कोण? ती स्वताच ते मिळवू शकते.

Friday, December 23, 2011

चांदणं - २

ती सकाळी लवकरच उठली होती एकदम, विशालला डब्बा द्यायचा होता ना शाळेला. विशुची आवडती भाजी, काकडी, टोमाटो, पोळी डब्ब्यामध्ये भरून विशुच आवरून ती खाली त्याला सोडायला आली. विशुची बस अजून यायला ५ मिनिट होते. विशू एका काडीने मातीमध्ये रेघोट्या ओढत होता. 
तेवढ्यात ते दोघे आले. जया आणि मना. 
विशूने लग्गेच त्याच्या ताई ला हाय केला. तिने पण त्याच्या गालाची पापी घेतली.
ती खाली थांबली होती. बहुदा त्यांची गाडी येणार होती. पण तेवढ्यात जया परत वरती घरी गेला आणि मिनिटा-दोन-मिनिटा मधेच  हातामध्ये फुलांचा गुचछ घेवून आला. एका रिक्षा ला बोलावून दोघे त्यामध्ये बसून गेले. तेवढ्यात विशुची बस आली आणि तोही शाळेत गेला.
ती वर आली, येताना चार फुले घेवून आली. पूजा करून, विशुचा पसारा आवरून ती बसली. 
लिहायला बसली - 

"ओढ कुणाची तेच कळत नाही,
खंत कशाची होते समजत नाही,
उगाच काही होत नाही - हे उमगते,
पण कारण मात्र कशाचे काहीच कळत नाही..."

तेवढ्यात बेल वाजली. आता कोण असेल म्हणून ती उठली तर शेजारच्या कांबळे काकू होत्या. त्यांना त्यांच्या घराची चावी देवून ती पुन्हा लिहायला बसली.

"जमेची बाजू एवढीच कि खुश राहायला शिकले,
पर्वत चढायला नाही तरी पण रस्त्यावर चालायला शिकले,
कोण कुणाचे शोधात नाही बसले,
दुख जर्जर झाले तरी, उगाच रडत नाही बसले.
पण तू नसता तर,
हसणे इतके सोप्पे असते हे कदाचित कधीच नसते वाटले ..."

खाली भाजीवाल्याचा आवाज ऐकून ती एकदम भानावर आली. भाजीची पिशवी घेवून निघाली. भाजीवाल्याच्या भोवती खूप बायका गराडा घालून होत्या. आणि तिथे ती पण होती - मना ! 
तेव्हा तिने मनाला जवळून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज होत. मना भाजी घेवून निघून गेली. ती सुद्धा भाजी घेवून वरती आली. 
तिने हळूच खिडकीमधून डोकावून मनाच्या घरातली हालचाल टिपायचा प्रयत्न केला. पण मना बाल्कनी मध्ये उभी होती. तिची ओढणी अशी उडत होती. 

————
तिची ओढणी अशीच वाऱ्यावर भुरभुरत होती. ती गाडी चालवत होती आणि तो मागे बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर तिचे केस उडत होते. आणि हा क्षण त्याला जगातला सर्वात सुखाच क्षण वाटे. तो आपला शांतपणे मंद मंद स्वताशीच हसे. तिची बडबड सुरु असे आणि हा मात्र त्या उडणाऱ्या बटा चेहऱ्यावर घेत स्वर्गीय आनंद घेत असे. मग मधूनच तिने काही प्रश्न विचारला कि याच लक्ष नसे. मग ती जाम चिडे. आणि तिच्या रागात येण्याची हा अजून मजा लुटे.  मग ती खूप चिडल्यावर तो तिच्यासाठी काहीतरी गुणगुणे - 

ओढ कशी लागली तुझी मजला कळले नाही,
खंत आता फक्त हीच कि तू जवळ नाही,
उगाच काहूर का माजे सांजवेळी,
समोर असूनही कासावीस मन माझे - कारण मात्र समजले नाही...


Monday, October 10, 2011

चांदणं - १

कुकरची शिट्टी झाली आणि तिची तंद्री तुटली. फटाफट लसून सोलायला तिने सुरुवात केली. तेवढ्यात समोर खिडकीतून तिला एक ट्रक उभा दिसला, २-४ माणस त्यामधून समान उतरवून तिच्याच बिल्डींगमध्ये घेवून येताना दिसली. तिला लक्षात आला कि साने काकूंच्या घरी कोणीतरी नवीन किरायदार आला आहे ते. साने काकुनी तशी कल्पना तिला फोनवर दिली होतीच, पण इतक्या पटकन तिथे त्यांना नवीन भाडेकरू मिळेल असं वाटल देखील  नव्हत. पण असो, तिच्या किचनच्या खिडकीतून साने काकूंच्या किचन ची खिडकी आणि हॉल ची ग्यालरी दोन्ही नीट दिसत असल्याने तिला नवीन करमणूक मिळणार होती. मागचे भाडेकरू म्हणजे कोलेजच्या ३-४ मैत्रिणी होत्या. तिला त्या आधीच्या चार जणींचा पहिला दिवस आठवला.
नवीन होत्या शहरामध्ये आणि डॉक्टर चा कोर्स ला शिकत होत्या एवढंच तिला कळाल होत - तेही त्यांच्या गळ्यातल्या स्टेथोस्कोप मुळे. ती कधीच त्यांना बोलली नव्हती पण त्या जणू काही तिच्या जिवलग मैत्रिणीच होत्या. पहिल्या दिवशी त्या चारही जनी ग्यालारीमध्ये च दिवसभर गप्पा मारत बसल्या होत्या. त्यांची खरी नाव तिला माहिती नव्हती पण टोपण नाव तिला २ वर्षांच्या कालावधीमध्ये पाठ झाली होती - मणी, कुकी, शिल्पी आणि रोशा. त्यांची खरी भाषासुद्धा तिला कधी काढता आली नाही कारण कधी त्या हिंदीमध्ये बोलत कधी मराठीमध्ये कधी इंग्रजी मध्ये तर कधी भोजपुरी-बिहारीमध्ये. त्यांच्या ग्यालारीमध्ये त्यांनी दिवाळीला दिवे, तर ख्रिसमस ला बेल्स तर ईद ला लाइटिंग केलेली असायची म्हणून त्यांचा धर्मही तिला कधी समजला नाही पण जेवा त्या ग्यालारीमध्ये मस्त गप्पा टाकत उभ्या असायच्या ना तेव्हा तिला आपल्या किचनमध्ये मनोमन आनंद व्हायचा. तिला त्याचं स्वच्छंदी जीवन त्या किचनमधून पाहायला खूपच आवडायचं. हाकेच्या अंतरावर त्या चौघींच किचन आणि ग्यालरी असल्यामुळे ती जणू त्यांच्या प्रत्येक ख्सानामध्ये सोबत होती. 
"मम्मी मम्मी" करत विशाल आला आणि तिची तंद्री परत एकदा तुटली. विशाल ने हैप्पी मदर्स दे म्हणून तिच्या हातामध्ये एक फुल टिकवल. आणि एक गोड पापी गालात देवून निमूट उभा राहिला. 
ती - काय झाल, असं का उभा आहेस? काही हवाय का तुला?
विशाल - मला रिटर्न गिफ्ट कुठे दिलास तू!
ती विशाल च्या गालावर तिचे ओठ टेकवत म्हणाली - घ्या साहेब तुमच रिटर्न गिफ्ट, खुश आता.
विशाल - अग मम्मी तुला माहितीये, साने काकूंकडे नवीन ताई दादा आलेत. ताई ने आम्हा सर्वाना चोकलेट पण दिले. मी पण तिला लगेच आपल रिटर्न गिफ्ट देवून आलो.
ती - हो, मगाशी मी मोठी गाडी पहिली खिडकीतून पण पाहिलं नाही कोण होत ते. बर तू तुझा होमवर्क केलास का?
विशाल - हो केला.
ती - कधी केलास ? शाळेतून आल्यापासून तर बाहेरच आहेस.
विशाल - म्हणजे नाही केला, तू मला पूर्ण वाक्यच बोलू देत नाहीस. मला भूक लागलीये आधी जेवायला दे आणि मग अभ्यास.
ती - ठीकेय. जेवण झाल्यावर आपण दोघेपण अभ्यासाला बसुयात.

एव्हाना तिचा स्वयंपाक पूर्ण बनवून झाला होता. जेवण करून आवरून ती किचन साफ करत होती, सहज बघावं विशाल चे नवीन कोण ताई-दादा आहेत असं विचार मनात आला म्हणून तिने किचनची खिडकी उघडली. तर त्यांच्या किचनची लाईट सुरूच होती. ती थोडावेळ पाहत राहिली कि कोणी दिसेल म्हणून पण दिसलं नाही. ती खिडकी लावणार एवढ्यात तिने आवाज ऐकला, मना म्याडम कॉफी तयार आहे. आणि तो दिसला. काळा शर्ट, केस विस्कटलेले तरीही मधून भांग आहे हे स्पष्टपणे दिसत होत, हातामध्ये २ कॉफीचे मग घेवून निघाला. तेवढ्यात तिचे लक्ष ग्यालारीकडे गेले. तिथे ती दिसली. गुलाबी पंजाबी ड्रेस मध्ये केस मोकळे, रात्र झाल्यामुळे चेहरा नीट दिसत नव्हता पण तिच्या आकृतीकडे पाहूनच तिचे मन प्रसन्न झाले. तेवढ्यात तो ग्यालरी मध्ये अवतरला. 
तो - "घ्या  म्याडम तुमचा चंद्र ढगांच्या पलीकडे जायच्या आधी तुमची कॉफी तयार आहे." 
ती - "जया थांकू थांकू. आम्ही आपले आभारी आहोत. "

तिला त्या दोघांची ओळख झाली अगदी पहिल्या दिवशीच. त्यांच्या त्या घरातल्या पहिल्या दिवशी. तो जया आणि ती मना. तिला कळाल नवीन जोडप आलंय राहायला ते, आणि कदाचित हि त्यांची लाडाची नाव असतील. ती विचार करू लागली - कदाचित त्याच नाव जय असेल. किंवा जयेश, जयपाल, जयकुमार किंवा अजून असंच काहीतरी. आणि तीच मोनाली, मनिका, मंदाकिनी. नाही नाही मंदाकिनी नसेल. मंजुश्री, असू शकेल किवा अजून दुसरच काहीतरी असेल. 
ती विचारच करत होती तेवढ्यात मना ओरडली - " ए आला आला, परत चंद्र बाहेर आला ढगांमधून "
जया - "मना माझी शर्त तर मी पूर्ण केली, तुझा चंद्र ढगामध्ये जायच्या आधी कॉफी बनवली आता तुलासुद्धा तुझी शर्त पूर्ण करावी लागेल. जा जावून कचरा टाकून ये."
मना विचित्र तोंड करत करत निघून गेली आणि तो ढगामधल्या चंद्राकडे पाहण्यात मग्न झाला. कॉफीच्या वाफा हवेमध्ये विरून गेल्या होत्या.

तिने खिडकी लावून घेतली, शेवटच फडक मारलं किचनमध्ये आणि झोपायला गेली. आज तिची रात्र खूप सुंदर होणार होती - तिच्या स्वप्नात चंद्र येणार होता. तिने लाईट बंद केला, अंधारामध्ये स्वताला एक मंद स्मित दिलं आणि पापण्या मिटल्या.