Wednesday, March 21, 2012

चांदणं - ५


आदित्य लायब्ररी मध्ये काही पुस्तक शोधात होता. अगस्ती प्रश्नपत्रिकेच्या ढिगाऱ्यात बुजून गेला होता. अगस्तीच तेवढा त्यांच्यामध्ये एकदम किडू होता. खूप रट्टा मारायचा, आणि मार्क्स पण मिळवायचा. बाकी सर्व जण म्हणजे मधल्या फळीतले. धड स्कॉलर पण नाही आणि ढ पण नाहीत. श्रेयू मात्र हुशार होती ती बाकीच्या कलागुणांमध्ये. ती कॉलेजच्या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी असायची. आणि आभा ! आभा तर आपली फक्त आदित्य आदित्य करत रहायची. शेवटच्या वर्षाला असताना आदित्य ने C. A . करायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्याने अभ्यासाची तयारी चालू केली. तसा तो अभ्यासक्रम खूपच अवघड होता. पण आदित्य ने ठरवलं होत कि कसही करून हि परीक्षा पास व्हायची. दोन-चार वर्ष इथे नोकरी करून परदेशामध्ये जायचं. शेवटच्या वर्षी पूर्ण ग्रुपनेच आप आपली दिशा ठरवली होती. श्रेयू एम.कॉम. करणार होती. अगस्ती तर पी.एच.डी ची तयारी करायला लागला होता. संजय सायकोलॉजी मध्ये उच्च शिक्षण घेणार होता. पण आभा ची अशी काही दिशा ठरेना. आणि तशी तिला काही काळजी पण नव्हती. तिचे वडील एकदम श्रीमंत होते, त्यामुळे तिला ज्या कोर्स ला अडमिशन घ्यायचं असेल तिथे त्यांनी  तिला घेवून दिल असता.
पण त्या दिवशी सर्व जण लायब्ररी मध्ये होते. आभा आणि श्रेया त्यांच्या एका सरांकडे पुस्तक घेण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा तिथे सरांचे एक मित्र आले होते - प्रोफेसर चंद्रचूड.  ते नाटक- शोर्ट फिल्म-डोक्युमेंट्री यामध्ये काम करत असत. तर त्यांना एका सह-नायिकेचा शोध होता. त्यासाठी ते आपल्या मित्राच्या कॉलेजमध्ये काही नवीन talent सापडत का ते पाहायला आले होते. आणि तेवढ्यात श्रेयू आणि आभा तिथे पोचल्या. प्रोफेसर चंद्रचूड ला आभा बघताच क्षणी  भावली. त्यांनी तिला लगेच विचारलं कि तू माझ्या एका नाटक्मध्ये सह-नायिकेच काम करशील का? ती एकदम शॉकच झाली आधी. पण नंतर तिच्या सरांनी शांतपणे बसून चर्चा करण्याविषयी सुचवलं.
आभा आणि श्रेया, दोघीनिसुद्धा बरेच प्रश्न विचारले. कथनक काय आहे, काम कशा प्रकारच आहे, ते आउट डोअर आहे कि तिथेच होणारे,आणि मग त्याच्या वेळा वगैरे वगैरे. प्रोफेसर ने पण तिच्या अक्टिंग च्या अनुभवाविषयी विचारलं. जेव्हा त्यांना कळाल कि तिने पुरुषोत्तम मध्ये लीड रोल केला होता आणि त्यांना ४ थ्या क्रमांकच बक्षीस मिळालं तेव्हा ते खूपच खुश झाले. त्यांनी लगेच सांगितलं कि यावेळी पुरुषोत्तम मध्ये स्त्री वाडी खूप नाटके होती आणि त्यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या कोलेज ने जे नाटक सदर केल त्याची नायिकाच माझ्या नाटकाची नायिका आहे. सर्व गप्पा झाल्यावर प्रोफेसर ने तिला स्वताच कार्ड दिल आणि विचार करून काय ते संग असाही सांगितलं.

अभाच्या घरी तसा तिला विरोध बिलकुल झाला नसता आणि तिची दिशासुद्धा ठरली नव्हती. पण तिला ह्या नाटक-सिनेमा क्षेत्रामध्ये जवस वाटत नव्हता. पण शेवटी ग्रुप मध्ये चर्चा करून सध्या जोपर्यंत काही ठरत नाही तोपर्यंत हे नाटक time pass म्हणून कराव असा ठरलं. त्याप्रमाणे तिने प्रोफेसर ना फोन करून तिची मंजुरी कळवली. आणि परीक्षा झाल्या झाल्या ती काम चालू करायला तयार आहे असाही सांगितलं.
प्रोफेसर ने तिला पुढल्या भेटीमध्ये बाकीची माहिती देण्याविषयी सांगितलं. 
यथावकाश सर्वांच्या परीक्षा संपल्या. सर्व जण आपआपल्या मार्गी लागले. अभाच सुद्धा नाटक सुरु झाल. हळू हळू सर्व जण पांगले. आधी आठवड्याला भेटायचे मग एक महिन्याला.. नंतर तर कोणाच्या वेळसुद्धा जमत नसत. पण आभा आणि आदित्य एकमेकांच्या संपर्कात होते. भेट नाही व्हायची पण फोन मार्फत नेहमीच ते संपर्कात होते. ती नेहमी त्याला तीच नाटक पाहायला बोलवायची पण त्याचा  C . A . चा अभ्यासक्रम त्याला बाहेर पडू देत नव्हता. 
दरम्यान आभाने सुद्धा आपल कॅरिअर नाटक-सिनेमा क्षेत्रामध्ये करायचं ठरवून टाकलं होत आणि ती तीच काम एन्जोय करत होती.
C . A . ची पहिली परीक्षा झाली आणि काबुल केल्याप्रमाणे आदित्यने आभाच नाटक पाहायला जायचं ठरवलं. खूप दिवस झाले सर्व जण भेटले नव्हते, म्हणून आदित्य ने सर्वांनाच जमवल यावेळी. फुल धम्माल करायची ठरली.  

नाटक सुरु झाल. आभाच्या एन्ट्री नेच नाटकाची सुरुवात होती. खरच आभा खूपच कसलेल्या कलाकारासारखी काम करत होती. सर्वांनाच चांगल वाटत होत. इंटर्व्हल नंतर मुख्य नायिका प्रवेश करणार होती. पोपकोर्न, कोक घेवून सर्व जण परत उर्वरित भाग पाहायला बसले. मुख्य नायिकेची एन्ट्री झाली आणि आदित्य एकदम आवाक झाला. मुख्य नायिका जान्हवी होती.


Sunday, March 4, 2012

रेशीम


काठगोदाम स्टेशनला तिची ट्रेन थांबलीती उतरायच्या तयारीतच होतीदोन मोठमोठ्या सुटकेसएक पर्स आणि हातामध्ये कागदाच्या सुरुळ्या सावरत ती फलाटावर उतरलीगुलाबी आणि आकाशी रंगाचा पंजाबी सूट आणि  त्यावर काळ्या रंगाच लेदरच  जकेट घातलं होतती समान सावरत स्टेशनच्या बाहेर गेलीतिने बुक केलेल्या कार ला यायला अजून बराच वेळ होतातिथून अल्मोरा ला पोचायला कमीत कमी तास दीड तास तरी लागत होतासकाळची वेळ होतीहिरव्या हिरव्या डोंगर रांगा धुक्यातून डोकावत होत्याअल्मोराच्या सौदर्याचा एक ट्रेलर तिला इथेच बघायला मिळत होतातिने टुरीस्ट कंपनीला फोन  लावायचा प्रयत्न केला पण फोन काही उचलला नाहीती तिथेच एका बाकावर टेकली आणि डोळे मिटले.
एक आठवणींचा स्लाईड शो तिच्या डोळ्यासमोरून झर्र्र कन निघून गेलातिच्या आयुष्यातला तो खूप महत्वाचाकलाटणी देणारा आणि सर्वांच्या दृष्टीने वाईट निर्णयत्या दिवशी ती पूर्ण एकटी होतीआणि त्या नंतर बऱ्याच वेळा एकटीच.. पण या सर्वांचा विचार तिने आधीच करून ठेवला होताचार वर्षांचा तो पाश शब्दशः झुगारून ती मोकळी झाली होती. 'झुगारूनया अर्थाने कि तिला त्या निर्णयापासून परावृत्त ती स्वताच जास्त करत होतीबंधनं, रूढी, चाली, धर्माधर्म यामुळे बटबटलेला समाज आणि त्या समाजाचा विचार करून तिने स्वतानेच तो विचार आजवर ढकलला होता. पण प्रत्तेकाच्या परिसीमा असतात - सहन करण्याच्या आणि ओलांडण्याच्याही. जेव्हा दोनही सीमा पार होतात तेव्हा काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागतो. आणि तिने तो निर्णय घेतला होता.
तिची नजर त्या हिरव्याशार डोंगरावर भिरभिरत होती. मनाला आसीम शांतता आणि डोळ्याला सुख मिळत होते. अर्धा एक तास गेला असेल, तिने पुन्हा एकदा टूरिस्ट कंपनीला फोन केला. यावेळी फोन उचलला. तिकडून एक सोज्वळ स्त्रीचा आवाज होता, त्या स्त्रीने उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि अर्ध्या तासामध्ये कार येण्याची व्यवस्था केली. तिथेच टपरीवर कॉफी घेवून ती जवळची काही पुस्तक चाळत बसली. अर्धा तास व्हायच्या आधीच तिची कार आली. समान सावरत ती कार मध्ये बसली, आज हवामान छान होते त्यामुळे ती एका तासातच अल्मोराला पोचली. 
तिच्या त्या रेसिडेन्शिअल हॉटेल मधल्या रुमच्या बाल्कनीतून पुढे दरीच दरी आणि डोंगररांगांचा पसारा दिसत होता. अजूनही वातावरण पहाटे प्रमाणेच आल्हाद दायक होते. स्टेशन वरच्या निसर्गापेक्षाही पेक्षाही जास्त मनमोहक इथला नजरा होता. ती फ्रेश होवून, बाहेर एक फेरी मारायला निघाली. भूरभुरते केस, काळी कमीज आणि शुभ्र पांढरी चुडी सलवार, गळ्यात कॅमेरा आणि खांद्यावर झोळीसारखी पर्स. तिची स्वारी निघाली. निघण्यापूर्वी तिने माहिती पत्रक घेतलेच होते. त्यात जवळच्या एका शंकराच्या मंदिराचा नंबर पहिला होता. आणि ते जवळ पण होते मग स्वारी तिकडेच निघाली. मंदिराच्या आवारात पोचल्यावर पहाते तो सगळीकडे असंख्य घंटा. इतक्या घंटा एकत्रित पणे तिने पहिल्यांदाच पहिल्या होत्या. तिथली एक प्रथा होती. भक्तगण आपल्या इच्छा किंवा आपली संकटं एका पत्रामध्ये लिहून ते पत्र मंदिरामध्ये टांगतात आणि जेव्हा त्यांचे मनोरथ पूर्ण होतील तेव्हा तिथे मंदिरात येवून घंटा बांधतात. आणि देवाने असंख्य लोकांच्या इच्छा पूर्ण केल्या होत्या हे त्या घंटानवरूनच कळत होत. तिनेपण पटकन कागद काढून २-४ पान भरवली. शंभर एक इच्छा त्या कागदावर उतरवल्या. ते पत्र तिथे टांगलं. मंदिराच्या जवळच्या एका दुकानातून शंभर घंटा विकत घेतल्या आणि दुकानातल्या नोकराच्या मदतीने तिने त्या घंटा टांगून पण दिल्या. मंदिरातल्या पुजाऱ्याने तिला टोकल सुद्धा कि लग्गेच पत्र टांगून लग्गेच घंटा नाहीत बांधत. इच्छा पूर्ण झाल्यावर घंटा बांधतात. तिने लगेच त्याला उत्तर केल " पुजारीजी, सही कहा अपने. मगर मेरी तो इतनी इच्छाये भगवानने पुरी कि ही. और जो भी कूच बची कुची ही - वो तो पुरी होणेही वाली है. इसलिये मैने सब घंटाये अभी बांध ली. मुझे पुरा विश्वास ही कि मेरी सभी इच्छाये पूर्ण होगी और अगर कोई इच्छा पूर्ण नाही होती तो वो इच्छा गालात ही ऐसा मी समझ लुंगी." पुजारी बोले - "सही कहा बेटी. तुने एस जीवन को सही मी समझा है."