Sunday, March 4, 2012

रेशीम


काठगोदाम स्टेशनला तिची ट्रेन थांबलीती उतरायच्या तयारीतच होतीदोन मोठमोठ्या सुटकेसएक पर्स आणि हातामध्ये कागदाच्या सुरुळ्या सावरत ती फलाटावर उतरलीगुलाबी आणि आकाशी रंगाचा पंजाबी सूट आणि  त्यावर काळ्या रंगाच लेदरच  जकेट घातलं होतती समान सावरत स्टेशनच्या बाहेर गेलीतिने बुक केलेल्या कार ला यायला अजून बराच वेळ होतातिथून अल्मोरा ला पोचायला कमीत कमी तास दीड तास तरी लागत होतासकाळची वेळ होतीहिरव्या हिरव्या डोंगर रांगा धुक्यातून डोकावत होत्याअल्मोराच्या सौदर्याचा एक ट्रेलर तिला इथेच बघायला मिळत होतातिने टुरीस्ट कंपनीला फोन  लावायचा प्रयत्न केला पण फोन काही उचलला नाहीती तिथेच एका बाकावर टेकली आणि डोळे मिटले.
एक आठवणींचा स्लाईड शो तिच्या डोळ्यासमोरून झर्र्र कन निघून गेलातिच्या आयुष्यातला तो खूप महत्वाचाकलाटणी देणारा आणि सर्वांच्या दृष्टीने वाईट निर्णयत्या दिवशी ती पूर्ण एकटी होतीआणि त्या नंतर बऱ्याच वेळा एकटीच.. पण या सर्वांचा विचार तिने आधीच करून ठेवला होताचार वर्षांचा तो पाश शब्दशः झुगारून ती मोकळी झाली होती. 'झुगारूनया अर्थाने कि तिला त्या निर्णयापासून परावृत्त ती स्वताच जास्त करत होतीबंधनं, रूढी, चाली, धर्माधर्म यामुळे बटबटलेला समाज आणि त्या समाजाचा विचार करून तिने स्वतानेच तो विचार आजवर ढकलला होता. पण प्रत्तेकाच्या परिसीमा असतात - सहन करण्याच्या आणि ओलांडण्याच्याही. जेव्हा दोनही सीमा पार होतात तेव्हा काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागतो. आणि तिने तो निर्णय घेतला होता.
तिची नजर त्या हिरव्याशार डोंगरावर भिरभिरत होती. मनाला आसीम शांतता आणि डोळ्याला सुख मिळत होते. अर्धा एक तास गेला असेल, तिने पुन्हा एकदा टूरिस्ट कंपनीला फोन केला. यावेळी फोन उचलला. तिकडून एक सोज्वळ स्त्रीचा आवाज होता, त्या स्त्रीने उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि अर्ध्या तासामध्ये कार येण्याची व्यवस्था केली. तिथेच टपरीवर कॉफी घेवून ती जवळची काही पुस्तक चाळत बसली. अर्धा तास व्हायच्या आधीच तिची कार आली. समान सावरत ती कार मध्ये बसली, आज हवामान छान होते त्यामुळे ती एका तासातच अल्मोराला पोचली. 
तिच्या त्या रेसिडेन्शिअल हॉटेल मधल्या रुमच्या बाल्कनीतून पुढे दरीच दरी आणि डोंगररांगांचा पसारा दिसत होता. अजूनही वातावरण पहाटे प्रमाणेच आल्हाद दायक होते. स्टेशन वरच्या निसर्गापेक्षाही पेक्षाही जास्त मनमोहक इथला नजरा होता. ती फ्रेश होवून, बाहेर एक फेरी मारायला निघाली. भूरभुरते केस, काळी कमीज आणि शुभ्र पांढरी चुडी सलवार, गळ्यात कॅमेरा आणि खांद्यावर झोळीसारखी पर्स. तिची स्वारी निघाली. निघण्यापूर्वी तिने माहिती पत्रक घेतलेच होते. त्यात जवळच्या एका शंकराच्या मंदिराचा नंबर पहिला होता. आणि ते जवळ पण होते मग स्वारी तिकडेच निघाली. मंदिराच्या आवारात पोचल्यावर पहाते तो सगळीकडे असंख्य घंटा. इतक्या घंटा एकत्रित पणे तिने पहिल्यांदाच पहिल्या होत्या. तिथली एक प्रथा होती. भक्तगण आपल्या इच्छा किंवा आपली संकटं एका पत्रामध्ये लिहून ते पत्र मंदिरामध्ये टांगतात आणि जेव्हा त्यांचे मनोरथ पूर्ण होतील तेव्हा तिथे मंदिरात येवून घंटा बांधतात. आणि देवाने असंख्य लोकांच्या इच्छा पूर्ण केल्या होत्या हे त्या घंटानवरूनच कळत होत. तिनेपण पटकन कागद काढून २-४ पान भरवली. शंभर एक इच्छा त्या कागदावर उतरवल्या. ते पत्र तिथे टांगलं. मंदिराच्या जवळच्या एका दुकानातून शंभर घंटा विकत घेतल्या आणि दुकानातल्या नोकराच्या मदतीने तिने त्या घंटा टांगून पण दिल्या. मंदिरातल्या पुजाऱ्याने तिला टोकल सुद्धा कि लग्गेच पत्र टांगून लग्गेच घंटा नाहीत बांधत. इच्छा पूर्ण झाल्यावर घंटा बांधतात. तिने लगेच त्याला उत्तर केल " पुजारीजी, सही कहा अपने. मगर मेरी तो इतनी इच्छाये भगवानने पुरी कि ही. और जो भी कूच बची कुची ही - वो तो पुरी होणेही वाली है. इसलिये मैने सब घंटाये अभी बांध ली. मुझे पुरा विश्वास ही कि मेरी सभी इच्छाये पूर्ण होगी और अगर कोई इच्छा पूर्ण नाही होती तो वो इच्छा गालात ही ऐसा मी समझ लुंगी." पुजारी बोले - "सही कहा बेटी. तुने एस जीवन को सही मी समझा है."

No comments:

Post a Comment