Saturday, July 23, 2011

..याला जीवन ऐसे नाव..



खूप पूर्वी अगदी हजार शतकांपूर्वी ची हि गोष्ट आहे. त्या काळी स्त्रिया आणि पुरुष हे प्रकार नव्हते. खर तर त्यावेळी पुरुष आणि स्त्री हे दोन वेगळे प्राणी अशी समजूत होती. त्या वेळी हि दोन प्राणी वेगवेगळे राहायचे, त्यांचे वर्ग सुद्धा वेगवेगळे असायचे. पण हळू हळू बुद्धी या नैसर्गिक देणगीमुळे त्यांना एकमेकांना  लक्षात येवू लागले कि काही कामे हा दुसरा प्राणी चांगली करतो. उदा. शिकार करणे पुरुष प्राण्याला चांगले जमते तर त्या शिकारीला खाण्यायोग्य बनवणे हे स्त्री या प्राण्याला चांगले जमते. मग या दोन प्राण्यांनी संगनमताने एकत्र राहायचा निर्णय घेतला - आत्म वृद्धीसाठी ! हळू हळू सृजनशीलता वाढू लागली तशी त्यांना नियमांची गरज भासू लागली. सुरुवातीला भाषा वगैरे काही नव्हती जे काही संभाषण व्हायचे ते फक्त वेगवेगळे आवाज खाणा खुणा किवा काही इशारे वापरूनच.  कधीतरी शिकार भरपूर मिळे कधी खूपच कमी मिळे, मग तेव्हा हे दोन प्राणी हिंसक बनू लागले. एकमेकांच्यात हाणामारी होऊ लागली,त्यांच्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी त्या दोन प्राण्यांनी काही नियम आखले. काही नियम दोन्ही प्राण्यांसाठी होते, आणि काही नियम वेग वेगळे बनवले गेले. स्त्री प्राणी आधी एकटा होता तेवा त्यांना शिकार करणे आणि ती खाण्यायोग्य करणे हि दोनही कामे करावी लागत. पण जेवा पासून त्यांनी या नवीन मनुष्य प्रण्यासोबत हात मिळवणी केली होती तेवापासून त्यांच्याकडे दिवसाचा खूप वेळ रिकामा पडत असे. मग या वेळात त्यांनी वस्त्र निर्मिती, निरनिराळे अलंकार बनवणे, रहायची जागा नीटनेटकी ठेवणे हि अवांतर कामे चालू ठेवली.  नैसार्किक प्रक्रिया म्हणून प्रजनन त्यांना समजू लागले. हळू हळू काही काळा नंतर होणारे मृत्यू समजू लागले. मग आपल्याला लोक हवीत हि भावना जागृत झाली. आणि मग प्रजननाची प्रक्रिया त्यांना खरी लक्षात आली कि यामुळे आपल्याला आपली लोक वाढवता येतात आणि हि शक्ती स्त्री प्राण्यात आहे हे लक्षात आले. पण पुरुष प्राण्याशिवाय हे होऊ शकत नाही हेसुद्धा स्त्री प्राण्याला समजले. पुढे कोणता स्त्री प्राणी कोणत्या पुरुष प्रण्यासोबत राहणार यावरून वादावादी होऊ लागली तेवा कुटुंब पद्धती निर्माण झाली. "लग्न " हि संस्कृती निर्माण केली. मग त्यांची त्यांची मुलं, त्यांची नातवंड, त्यांचे घर वेग वेगळे बनू लागले. सुरुवातीला स्वखुशीने स्वीकारलेली कामे आता स्त्री प्राण्याला जबरदस्तीने करावी लागू लागली. स्त्री प्राण्याला बाहेर पडायला आणि पुरुष प्राण्यासोबत शिकार करण्यास जायला तिचे मन प्रवृत्त करू लागले पण पुरुष प्राण्याला हि फक्त आपलीच सत्ता असे वाटू लागले. हळू हळू सोयीसाठी, सुरक्षिततेसाठी निर्माण केलेली बंधने जाचक आणि हिंसक बनू लागली. 

आज समाज का निर्माण झाला, याचे मूळ करणाच आपण विसरून चाललो आहोत. आपल्या पूर्वजांनी समाज हा प्रगतीसाठी, आत्मवृद्धीसाठी साठी बनवला होता आणि आज याच समाजामुळे कितीतरी मनुष्य प्राण्याला स्वताची प्रगती तर सोडाच पण साधे जगणेही मुश्कील झाले आहे.  स्त्रीला एक प्राणी म्हणून अस्तित्व द्यायचे सोडून तिची दया येवून तिला ३३% आरक्षण दान दिल्यासारखे दिले आहे. समाज सुरळीत पणे चालण्यासाठी हे दोनही प्राणी आवश्यक आहेत.  तेव्हा या दोनही प्राण्यांनी समान हक्काने, समान अधिकाराने समाजात वावरले पाहिजे. एक शोभेची वस्तू म्हणून स्त्री ला गणले जावू नये, किवा फक्त कवितेतून नाजूक वाटणाऱ्या ह्या स्त्री ला नाजूक समजुसुद्धा नये. खूप पूर्वी समाजच्या हितासाठी काही कामे स्त्री आणि पुरुषाने वाटून घेतली होती याचा अर्थ असा होत नाही कि स्त्री ने तीच कामे केली पाहिजेत. आज खूप कुटुंबामध्ये स्त्री ला समानतेची वागणूक दिली जात आहे, आणि सगळीकडे हळू हळू हे संस्कार रुजतील अशी नक्कीच आशा आहे पण त्यासाठी स्त्री ने दुसऱ्या स्त्री ला सन्मान दिला पाहिजे, आई ने आपल्या मुलीला, बहिणीने बहिणीला, आजीने नातीला आणि सुनेने सासूला आदर सत्कार सन्मान दिला पाहिजे. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला आदर दिला तरच पुरुषांकडून आदर मिळेल. 
एका स्त्री ला "पुरुष " हि जी उंची ठरवून दिलेली आहे ती सर्वांनी मोडली पाहिजे. का एका स्त्री ने पुरुषाप्रमाणे काम केले म्हणजे तिचे कौतुक होते ? का कंडक्टर म्हणजे पुरुषच ? आणि मग कोणी स्त्री कंडक्टर झाली कि सर्व तिचे कौतुक करताना म्हणतात "बघा, कशी पुरुषासारखी कंडक्टर चे काम करते आहे. कमाल आहे तिची." म्हणजे एका स्त्री ने पुरुषाची कामे केली म्हणजे ती खूप भारी का?  असं नकोय. स्त्री ने पुरुषाची बरोबरी करण्याचा अट्टहास सोडून दिला पाहिजे. स्त्री हि स्त्री आहे आणि पुरुष हा पुरुष. ते कधीच एकमेकांची जागा घेवू शकत नाहीत. आणि एकमेकांची बरोबरीसुद्धा नाही करू शकत. जरी एकच असतील तरी या दोन्ही प्राण्यांच्या जाती वेग वेगळ्या आहेत. वाघाची आणि सिंहाची बरोबरी होऊ शकत नाही तशीच स्त्री ची आणि पुरुषाची सुद्धा नाही. काही कामे स्त्री शिवाय दुसर कोणीच चांगल करू शकत अन्ही आणि काही कामे पुरुषाशिवाय दुसर कोणीच चांगल करू शकत नाहीत. त्यामुळे एकमेकांची बरोबरी, एकमेकांचा अपमान करण्या पेक्षा आपण सोबत मिळून प्रगतीकडे वाटचाल करूयात. जशी आजवर प्रगती केलीत तशीच पण थोडी वेगळी. स्त्री हक्काचे कायदे करण्यात आज आपल्या समाजाचा वेळ जात आहे तोच वेळ जर आपण गरीब, अनाथ, अशिक्षित, अपंग, निसर्ग, रोगी या सर्वाना आनंद देण्यात, यांची काळजी घेण्यात आणि यांच्यासोबत  घालवला तर आपण नक्कीच समाधानाने जगू आणि आपल्या पुढच्या पिढीलाही कदाचित हि पृथ्वी सुरक्षित देवू असा विश्वास वाटतो.

(हा विषय इतका विस्तृत आहे कि उत्तरार्ध अजून बाकी आहे.)

Friday, July 15, 2011

अडगुल मडगुल ... पाऊस !

जून महिना सुरु व्हायचा आणि पावसाची चाहूल लागायची. नवीन वर्ग, नवीन दप्तर, नवीन वह्या पुस्तक. कधीतरी नवीन गणवेश सुद्धा. मृग नक्षत्र भरून वाहायचा आणि पावूस राजा ४ महिने च्या कंत्राटावर कामाला यायचा.
शाळेमध्ये मैदानात चिखल चिखल वाहायचा. तसा मला पावसाला कधीच आवडायचा नाही, तो आवडायला लागला ते college मधेच आणि तेही जेवा डोंगरा-डोंगरातून आमच्या साफाऱ्या चालू झाल्या तेवाच. शाळेमध्ये असताना असा वाटायचं कि पावूस डांबरी रस्त्यावर पाडवा, मातीवर पडून चिखल करू नये. पावसाळ्यातल्या रविवारची दुपार अशीच माझी बाल्कनीमध्ये उभी राहून पावसाकडे निखार्ण्यात जायची. तेव्हा पावसाच नात इतकाच असायचं कि जाम भिजायला आवडायचं. मग पुन्हा कधी तरी मोठे झाल्यावर पावसामध्ये प्रेमाचा ओलावाही असतो हे कळायला लागल. "पावूस असा रुणझुणता, पैजाने सखीची स्मरली" किवा "आता पुन्हा पावूस येणार, पुन्हा तुझी आठवण येणार" वगैरे गाणीही भारी वाटायला लागली ती मोठे झाल्यावरच. पण लहानपणी एकाच आणि एकाच गाणं माहिती होत आणि तेच खूप आवडायचं, ते म्हणजे - "ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा .." या गाण्यातली सर मला नेहमी शाळेत शिकवणारे सर का असा संभ्रम असायचा. तशी गाण्यांची मोड तोड करण्यात मी फार भारी होते.
असाच पावसाला ये ये म्हणत रोज छत्री विसरून जायचे आणि घरी जावून आई चे धपाटे खायचे. सर्व दप्तर, पती पुस्तक सर्व भिजून जायचं. मग त्याला तव्यावर गरम करा, पंख्या खाली ठेवा, हे करा ते करा चालू व्हायचं. अगदीच लहानपणी गडगडात चालू व्हायला लागला आणि आम्ही प्रार्थनेसाठी मैदानावर असलो कि म्हणायचो - "म्हातारी दळण दळते आहे ". वीज चमकली कि म्हण्याचो देवाने battery चामकावली वाटत.
अजून एक कल्पना होती माझ्या मनात कि छोटे असताना आपण जर का मेलो तर देव भेटतो आणि त्याच्या घरी घेवून जातो.
पावसाची गम्मतच भारी होती पण तेव्हा, खूप पावूस पडायला लागला कि शाळेला बुट्टी मारायची - आई कधीतरी गरम गरम भजी करायची. संपूर्ण दुपार मस्त पांघरुणात घालवायची आणि दुपारभर Tom & Jerry  ची पारायण करायची.
जरा मोठे झालो तेवा पाऊस चालू व्हायची लक्षणं दिसली कि आमचा क्लास आहे, किवा बाहेरून काहीतरी आणायचं आहे हे आठवायचं. अशा वेळी उशीर होण आणि मग पावसात भिजण ठरलेल असायचं.
खरच पाऊस तोच राहिला - रिमझिम, जोरदार, भुरभूर. बदललो ते आपण. वयानुरूप आभाळ भरून यायचे अर्थही बदलले. आधी आभाळ भरून आल कि मस्त झोप यायची आणि नंतर जे प्रेमी आहेत आणि दूर आहेत, त्यांचा जीव कासावीस व्हायचा, जे प्रेमी जवळ आहेत ते पावसातल्या त्या दुर्मिळ क्षणांची मजा लुटायचे. जे मित्र आहेत त्यांच्या गप्पांचे कट्टे रंगायचे - आता पाऊस येणार खूप भिजणार म्हणून मग कुठे चहा मारायचा, कुठे पकोडे खायचे याचे plan चालू व्हायचे.
मला मात्र माझी एका  अडगुल-मडगुल type कवितेच्या काही ओळी आठवतात. फारच बालिश आहे, कारण  शाळेत असतानाच केलेली आहे. तेव्हा फक्त शब्दांची जुळवणी म्हणजे कविता असा वाटायचं.
आला रे आला पाऊस  आला
पाऊस आला रे पाऊस आला
टपोऱ्या टपोऱ्या गारा लेवून ,
सोसाटी वारा अन धारा घेवून..
बाकी पावसावर तशी भरपूर गाणी हिंदी-मराठी-इंग्रजी मध्ये आहेत.
पण सर्वात भावतं ते मराठी गाणंच. आणि तेसुद्धा सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच.

आता पुन्हा पाऊस येणार,
पुन्हा तुझी आठवण येणार...

Thursday, July 14, 2011

सावळा गोंधळ

आमचे सर म्हणायचे कि सावळा गोंधळ करू नका रे.. सावळा गोंधळ म्हणजे नक्की काय किवा गोंधळ हा सावळा - गोरा - काळा असतो हे माहितीच नव्हतं.. माहिती होत ते फक्त गोंधळ करणे, मज्जा करणे, खूप गप्पा मारणे.. इति ... बरयाच वेळा बेंच वाजवणे, मोठमोठ्याने गाणी म्हणणे असेही यामध्ये येत असे. पण कुलकर्णी सर इतक्या मऊ पणे "सावळा गोंधळ करू नका रे " असा म्हणायचे कि आम्हाला अजूनच चेव चढायचा .
असा गोंधळ मी अजून कुठे पहिला असेल तो म्हणजे संसदेमध्ये. विरोधीपक्ष नेते काय चेव येवून मोठमोठ्याने बोलतात कि हे पाहून मला आमचा शाळेतला सावळा गोंधळ आठवायचा नेहमीच. मी पप्पांना म्हणायचे देखील हे लोक आमच्यासारखे करत आहेत. पण तो सावळा गोंधळ करताना किती आनंद व्हायचा हे आज कळतंय .. आपण खर तर लहानपणीच खूप मोठे असतो आणि मग जसे जसे आपण मोठे होतो खर तर आपण मोठे नाहीत होत, तर लहान होत जातो. लहानपणी शेजारच्या काकूंच्या स्वयंपाक घरामध्ये जावून थेट त्याच्या डब्ब्या कडे बोट दाखवून त्यातले लाडू पाहिजेत असे सांगायचो. तेव्हा किती सहजता आणि किती मोकळीक असायची वागण्यामध्ये. मी असा नाही म्हणत कि आजही आपण थेट स्वयंपाक घरामध्ये जावून डब्ब्या मधून लाडू घ्यावेत काढून पण त्यावेळी बजावलेल्या हक्कासारख आपण काकुना direct  लाडू मागून खावू शकत नाही का ? कि त्यांनी विचारण्याची वाट पहायची असते.
कोणाशी भांडण झाल कि त्यात सर्वात महत्वाच कट्टी आणि बट्टी इतकाच असायचं. पण आता त्या भांडणातले धागे दोरे निष्णात पोलीसाप्रमाणे लक्षात ठेवून आपण पुढच्या भांडणात जुळवायचे प्रयत्न करतो.
खरच तुकारामांच्या त्या ओळींचा अर्थ आता मला समजत आहे - "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा ". म्हणजे खर तर लहानपणीच आपण सुज्ञ असतो, मोठेपणी आपण मोह - राग - मत्सर यामध्ये इतके गुरफटत जातो आणि जगाच्या रिती रिवाजाचे इतके अवडंबर माजवतो कि पावसामध्ये भिजल्यावर सर्दीच नाही तर आनंदही होतो हेच विसरून जातो आपण. चांदण्याचे मोजता येत नसल्यातरी त्या मोजताना आपण एकत्र व्हायचो हेच विसरून जात आहे. आणि खर तर काय मिलता मोठ होवून - हेवे दावे च न ! खूप कमी लोक गोष्टी आहेत तशा स्वीकारत असतात आणि बाकीचे ९० % लोक ते बदलण्याच्या प्रयत्नामध्ये अडकून पडलेले असतात . दुसर्या गोष्टी बदलण्यापेक्षा स्वतामध्ये बदल करण्याची गरज असते हे कोणालाच लक्षात येत नाही. कोणालाच स्वतामध्ये बदल केलेले आवडत नाहीत पण दुसऱ्यांनी थे बदलाव, तिथे बदलाव, हे बदलाव, ते बदलाव असा मात्र नेहमी वाटत असत.
लहानपणीचे गोळे खाणे, पावसात भिजणे आणि आईचे धपाटे खाणे, वाहत्या पाण्यामध्ये कागदी बोट करून सोडणे, विमानाचा आवाज आला कि आकाशामध्ये पाहणे हे मोठेपणी सर्वाना बावळट पणा वाटतो.
स्वताशीच विचार केला कि वाटत कि आपण आपल्याभोवती अदृश्य अशी किती तरी बंधन लादतो कि त्यामुळे आपल जगतो तर खर पण मारतेवेळी काय जगलो हा मोठा प्रश्न पडतो.
आयुष्यामध्ये निरंतर सावळा गोंधळ असायला हवा. आपण दृश्य बंधामध्ये अडकून राहण्यासाठी नाही जन्म घेतला आहे, तर मुक्त पणे श्वास घेवून जगण्यासाठी आणि आनंदात राहण्यासाठी आहे. अडचणी आणि संकट हीतर नेहमीच असतात पण तरीही ज्या गोष्टीमुळे आनंद मिळतो त्या गोष्टी करायलाच हव्यात . कारण आयुष्य खूप छोट आहे, आणि जीवन खूप मोठ आहे.
स्वताला कमी लेखू नका, स्वताची मनाची  काळजी घ्या, हसा आणि हसत रहा. तुम्ही जगत आहात म्हणजेच तुम्ही लायक आहात . स्वताची तुलना करू नका, स्वत बदला पण  दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका - तुम्ही स्वतामध्ये बदल करावा असा कोणी बोलाल त तुम्हाला कस वाटेल ?
आयुष्य खूप सुंदर आहे, चांदण्या पहा , चंद्र पहा , सूर्योदय पहा, फुले पहा , निसर्ग जगा...
लहान बाळाच हसण पहा - खरच हसण इतका का अवघड आहे ?




काल माझ्या स्वप्नात मी बर्फ बनले होते ,
पण वीतळायाच्या  आधीच मी झोपेतून उठले होते..
लहानपणीच्या गोष्टीतली म्हातारी मला भेटली,
मला भीती दाखवू लागली,
पण त्याच गोष्टीतली परी येवून तिला फटके देवून गेली ..
चालत चालत दूर वर जाताना आजोबांची तुकाराम गाडी आठवली,
प्रत्येक थांब्यावर आजोबा म्हणत कि - अगं पुढच्या स्टेशनावर येणारे ती गाडी ..
ती गाडी कधी यायची नाही, पण चालत चालत घर यायचं..
कदाचित हीच तुकाराम गाडी असेल ..
आईची मैत्रीण घरी आली कि खावू घेवून यायची,
म्हणुनतर तिच्या सामानाची पिशवी आम्ही दारातूनच पळवायची ..
तिला मात्र कौतुक भारी - मुल मोठी झाली..
काल स्वप्नामध्ये मी माणूस बनले होते,
खूप हसत  आणि हसवत होते ..
पण चिंता नको,
खरच माणूस बनायच्या आधी मी झोपेतून उठले होते ...
                             
                          - प्रिया


खरच आपण माणूस नाहीच आता - आता आपण एक मशीन बनलो आहोत. जी पावसात भिजल्यावर short  circuit  होते .. जिला खूप काम केल्यावर बंद पडते... जी खूप आनंदी राहू शकत नाही, जी कंपनीतून बाहेर पडू शकत नाहीत.
खरच माणूस बनुयात का ? सावळा गोंधळ करू यात का ?
आयुष्य पुन्हा जागुयात का ? लोळून लोळून  पोट धरून हसुयात का?


-Written by  प्रिया