Showing posts with label Horror. Show all posts
Showing posts with label Horror. Show all posts

Friday, September 14, 2012

विसर्जन - १


सगळीकडे गणेश मूर्ती बनवायची तयारी सुरु झाली होती. ग्लोबल वॉर्मिंग मुळे 'ग्रीन गणेशा प्रोजेक्ट' सगळीकडे जोम धरत होते. पेपरच्या रद्दीपासून, घरातल्या अडगळीतल्या  सामानापासून गणेशा बनवायची जणू काही स्पर्धाच सुरु होती. खेतावाडीच्या गणपतीची यावर्षीपण जोरात उंचच्या उंच मूर्ती साकारत होती.
          खेतावाडी चाळ क्र. ९- नारू, बगल्या, जीरम्या आणि शोमन या चाळीतल्या पोरांची दादा मंडळी. चाळीतून त्यांची सरळ वाट चौपाटी ला जावून मिळते. रोज रात्री शोमन त्याच्या बापाला चढली कि त्याच्या दारूच्या २-३ बाटल्या पळवून आणत असे आणि मग त्यांची मैफिल त्या चौपाटीच्या उत्तरेला असलेल्या खोपच्यामध्ये रंगत असे. पैकी फक्त शोमनलाच घरदार होते, त्याच्या बापाच्या मेह्मुद्च्या दारूचा गुत्ता जोरदार गल्ला करत आणि शोमंसुद्धा रोज दुपारी गल्ल्यावर बसून आपली कमाई बाजूला ठेवत. शोमन - पांढरे शुभ्र वेगवेगळे शर्ट घालणार, खाली नेहमी निळी जीन्स. गोरापान रंग, कपाळावर सकाळ पासूनच कुंकवाचा नाम लावून फिरणार, आठवड्याला सिद्धिविनायक चे दर्शन. उंच आणि धडधाकट. त्याच्या नावाखेरीज त्याच्यात मुस्लीम जाणवण्यासारखे काहीच नव्हते. बगल्या मुळचा यु.पी.चा, सातव्या वर्षी पळून मुंबईला हिरो व्हायला आलेला. त्याचा आदर्श अमिताभ  बच्चन. पिक्चरचे सगळे डायलॉग पाठ. उंच पण हडकुळा, चेहरा तुकतुकीत. थोडा चांगला राहिला असता तर त्याला कोरस मध्ये तरी डान्स करायला घेतले असते, पण जितका शोमन नीट राहायचा तितकाच बगल्या गचाळ. अंघोळ पण चार दिवसाला करायचा. जीरम्या त्याच्या झोपडीतल्या घरात एकटाच राहायचा. आई होती, ती त्याला न कळत्या वयातच सोडून देवाघरी गेली होती. त्याच्या शेजारच्या रामाकाकुनीच त्याला लहानपणी सांभाळले होते. आता रमाकाकू पुण्याला राहायला गेल्या होत्या. कधी मधी त्यांचा फोन यायचा, बस तेवढंच.  बगल्या ची आणि जीरम्याची भेट स्टेशन ला झाली होती, तेव्हा पासून त्यांची जिगरी यारी होती. बगल्या जीरम्याला 'विरू' आणि स्वताला 'जय' म्हणायचं. दारू चढल्यावर तर बगल्याच्या डायलॉग ला उत यायचा. सर्वजणच चौथी पाचवी नंतर शाळा सोडलेले, फक्त नारू ने नववी गाठलेली. नारूला काही ठाव ठिकाणा नव्हता. भरपूर वेळा तर तो त्याच्या मामाकडे माहीम ला असायचा. गेला तरी रात्री झोपायला जायचा आणि सकाळी सकाळी शोमन सोबत चौपाटी वर लोळत पडलेला असायचा. कधी राहिला तर जीरम्याच्या झोपडीत मुक्काम असायचा. नाहीतर मग रात्र चौपाटीवर काढायचा. दुपारी शोमन सोबत गल्ल्यावर बसायचा. तो कसली कसली पुस्तक घेवून बसायचा. बाकी त्याला काशाच वेड नव्हत पण पुस्तकच भारी वेड. पुरण कथा, इतिहास, काठ-कादंबऱ्या भरपूर वाचायचा. तो काम काही करायचा नाही पण पाकीट मात्र खूप सफाई ने मारायचा. त्यातच त्याचा गुजरा होत असे. बगल्या आणि जीरम्या तर स्टेशनवर मिळेल ते काम करायचे. 
         गणपतीचे दिवस सुरु झाले कि मात्र सर्वांची चंगळ असायची. गणपतीपासून ते नवरात्री पर्यंत ए चौघे इतर बरेच धंदे करून बराच माल कमवून दिवाळी साजरी करायचे. त्यात जीरम्या गणपतीच्या मुर्त्या छान बनवायचा. त्याच्या त्या झोपडीमध्ये आदल्या वर्षीच्या विसर्जित केलेल्या मुर्त्यांचा खच पडलेला असायचा. त्यांनाच डागडुजी करून तो विकायचा. त्याला मदत नारू आणि बगल्या करायचे. गिऱ्हाईक मिळवून द्यायचं काम शोमनच असायचं. सर्व कार्टी १५-१६ वर्षे वयाच्या आसपासची होती. 

       जुलै महिना संपत आला होता तरीही पावसाचा पत्ता नव्हता. हे आता दर वर्षीच झालेलं, कधी पावूस आवाक्याच्या बाहेर जावून पडायचा तर कधी रुसून ढगांच्यावर कुठेतरी लांब लपून बसायचा. पावसाळ्याच्या सुरुवातीला थोडी जमीन ओली करून गेला पाऊस ते परत आलाच नाही. त्या दिवशी शोमन ने चार बाटल्यांची व्यवस्था केली होती. भटाच्या चंपीने त्याच्याकडे बघून smile केल होत त्याची पार्टी म्हणून. कधीतरीच असा चार बाटल्यांचा योग यायचा. नाहीतर २ किंवा ३ बस्स. नेहमीप्रमाणे नारू ने आपल्या हिस्स्याची दारू बगल्याला दिली. बगल्या आधीच खूप तर्रर होता त्यात अजून नारुने तेल ओतले. 

जीरम्या पण जोश मध्ये येवून बोलू लागला, "बागुल, ए बागुल. तू तो मेरा जिगरी यार  है  रे. ये ले मेरी बोतल भी पी ले. "
बगल्या फुल्ल मोठ्ठ्या आवाजात, "ओये, मै आज भी फेकी हुई दारू नही पिता... आय ... ले वो बोतल. और अपनी जेब मी रख, दम है तो मै खुदही निकाल लुंगा... है कोई मै का लाल..."
नारू शांतपणे तिथल्या लाईट च्या प्रकाशात कधीच कुठले तरी पुस्तक वाचण्यात मग्न झाला होता. शोमन बारीक डोळे करून समुद्राकडे पाहू लागला, "आरे दोस्त, ते काय तरंगत आहे?"
"तुला खूप चढलीये शोम्या " - बगल्या. 
"नाही, ते पांढर काहीतरी उंच पाण्या वर  तरंगत आहे. शोमन बरोबर बोलतोय." - जीरम्या.
"विरू, तुझे भी चढ गयी. कोई गल नही." - बगल्या असा बोलतो आणि समुद्राकडे तोड करून उभा राहतो. 
आणि एकदम बोलतो, "आरे हे काही तरंगत नाहीये. पाण्यावर चालत आहे कोणीतरी. हा हा हा.."
यांचा गोंधळ ऐकून नारू त्यांच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकतो आणि परत पुस्तकात डोक घालतो. 
"ए नारू, तू पण बघ... अरे पण तुला कस दिसणार. असले देखावे दिसायला तुम्हाला प्यावी लागते. " - शोमन. 
"ए नारू मोशाय. जरा इधर ये नजरा तो देख." - बागुल.
त्यांच्या या परत नारू च्या जयघोशामुळे नारू नाखुशीनेच त्यांच्याकडे पुन्हा एकदा बघतो आणि बागुल ने बोट केलेल्या दिशेकडे बघतो.
एकदम दचकतोच तो.